शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मीरा भाईंदर काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू; २४ चौकसभा, पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद

By धीरज परब | Updated: March 20, 2023 18:01 IST

शहरात २४ चौकसभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भाजपा सरकारचे अपयश मांडले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर काँग्रेसच्या वतीने शहरात हाथ से हाथ जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. शहरात २४ चौकसभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भाजपा सरकारचे अपयश मांडले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले आहे. 

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पार पडल्यानंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉक मध्ये २ ते ३  पदयात्रा काढण्यात येत आहेत. भाजपच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल २४ चौकसभा घेऊन केली जात आहे. सदर अभियान दोन महिने चालणार असल्याचेच सामंत म्हणाले. 

उत्तन, भाईंदर पश्चिम व पूर्व, नया नगर, शांती नगर, हटकेश, मीरा रोड, काशीमिरा आदी ८ ब्लॉक मधील विविध भागात २४ प्रचार फेरी व चौकसभा घेऊन काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक पायी फिरून पत्रके वाटून जनतेशी थेट संवाद साधला. गेल्या ८ वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे असा आरोप सामंत यांनी केला. 

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, महिला आदींसह सर्व घटक भाजपच्या कारभारावर नाराज असल्याने काँग्रेसने राज्यपातळीवर हाथ से हाथ जोडो अभियान सुरु केले आहे. भाजप दोन उद्योगपतींसाठी देश चालवित असून गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस भावना जैन यांनी केला. यावेळी सरचिटणीस आनंद सिंह, माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन सह माजी नगरसेविका गीता परदेशी, रुबिना शेख, महिला अध्यक्ष रूप पिंटो, वेलेरिन पांडरीक, प्रवक्ते प्रकाश नागणे सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण