शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मीरा भाईंदर काँग्रेसचे 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू; २४ चौकसभा, पदयात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद

By धीरज परब | Updated: March 20, 2023 18:01 IST

शहरात २४ चौकसभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भाजपा सरकारचे अपयश मांडले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर काँग्रेसच्या वतीने शहरात हाथ से हाथ जोडो अभियान सुरु करण्यात आले आहे. शहरात २४ चौकसभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भाजपा सरकारचे अपयश मांडले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले आहे. 

 काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पार पडल्यानंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉक मध्ये २ ते ३  पदयात्रा काढण्यात येत आहेत. भाजपच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल २४ चौकसभा घेऊन केली जात आहे. सदर अभियान दोन महिने चालणार असल्याचेच सामंत म्हणाले. 

उत्तन, भाईंदर पश्चिम व पूर्व, नया नगर, शांती नगर, हटकेश, मीरा रोड, काशीमिरा आदी ८ ब्लॉक मधील विविध भागात २४ प्रचार फेरी व चौकसभा घेऊन काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक पायी फिरून पत्रके वाटून जनतेशी थेट संवाद साधला. गेल्या ८ वर्षातील मोदी सरकारच्या राजवटीत महागाई, भ्रष्टाचार व बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे असा आरोप सामंत यांनी केला. 

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, महिला आदींसह सर्व घटक भाजपच्या कारभारावर नाराज असल्याने काँग्रेसने राज्यपातळीवर हाथ से हाथ जोडो अभियान सुरु केले आहे. भाजप दोन उद्योगपतींसाठी देश चालवित असून गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस भावना जैन यांनी केला. यावेळी सरचिटणीस आनंद सिंह, माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन सह माजी नगरसेविका गीता परदेशी, रुबिना शेख, महिला अध्यक्ष रूप पिंटो, वेलेरिन पांडरीक, प्रवक्ते प्रकाश नागणे सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण