शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

‘त्या’ जवानांना शहीद दर्जा; राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:06 IST

मुलांचा शिक्षण खर्च, मोफत घर मिळणार

कल्याण : केडीएमसीच्या अग्निशमन दलातील अनंत शेलार, प्रमोद वाघचौडे आणि जगन आमले या जवानांना नोव्हेंबर २०१८ मध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले होते. या जवानांना शहीद दर्जा द्या, अशी मागणी भारतीय कामगार सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच केडीएमसीच्या महासभेतही यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला होता. अखेर या तीन जवानांना शहीद दर्जा राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे विविध सवलती व फायदे त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासह मोफत घरही मिळणार आहे. तसेच या जवानांच्या वारसांना केडीएमसीच्या सेवेत घेण्यात आले आहे.कल्याण पूर्व येथील चक्कीनाका येथे १ नोव्हेंबर २०१८ ला विहिरीत पडलेल्या तिघांना वाचवताना फायरमन शेलार आणि वाघचौडे यांचा मृत्यू झाला होता. तर २९ नोव्हेंबरला कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथे दुकानांना लागलेली आग विझविताना लिडींग फायरमन आमले यांना मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वीरमरण आलेल्या या जवानांच्या वारसांना नोकरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यातील विविध महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील अग्निशमन दलातील जवानांचा कर्तव्यावर बचावकार्य करताना मृत्यू झाला तर त्याला शहीद दर्जा द्यावा, अशी मागणीही भारतीय कामगार सेना या युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.त्याचबरोबर घडलेल्या दोन दुर्घटनांकडे लक्ष वेधताना मृत जवानांच्या वारसदारांना सवलती अणि फायदे महापालिकेकडून मिळण्याबाबतचा नियम वा लिखित आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमधील अग्निशमन दलाकडे नसल्याचा मुद्दाही पत्रात मांडण्यात आला होता. त्यामुळे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जवानांना शहीद दर्जा राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर देण्याबाबत आपण आदेश द्यावा, अशी विनंती युनियनचे अध्यक्ष आणि माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.मृतांच्या वारसदारांना तसेच जखमी जवानांना सवलती व फायदे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळण्याबाबतचे धोरण स्पष्ट करावे, याकडेही महाडिक यांनी लक्ष वेधले होते. तर वीरमरण आलेल्या तीन जवानांना शहीद दर्जा देण्याबाबतचा ठराव केडीएमसीच्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनीही एकमताने मंजूर केला होता. त्यानुसार या तीन जवानांना शहीद दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतला असून त्याप्रमाणे अध्यादेश जारी करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांनी अध्यादेश निघाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.कोणत्या सवलती मिळणार?तीन जवानांच्या कुटुंबीयांना एक सदनिका मोफत देण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एकाला महापालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीही देण्यात येईल. दोन मुलांचा शाळा-महाविद्यालयाचा खर्च सरकारतर्फे दिला जाणार आहे. तीनही जवानांचे वेतन दरमहा त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे. जवानांच्या निवृत्तीच्या दिनांकापर्यंत हे पूर्ण वेतन कुटुंबीयांना दिले जाणार आहे.संबंधित व्यक्तीकडे मृत्यूच्या वेळी जे पद होते त्या पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठी ज्या ज्या वेळी पात्र असेल त्यावेळी ती व्यक्ती पदोन्नती झाली, असे गृहीत धरून त्या व्यक्तीचे वेतन निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार निवृत्तीच्या दिनांकापर्यंत वेतन मिळणार आहे. या कालावधीत नियमानुसार वार्षिक वेतनवाढही मिळणारआहे.

उशिरा का होईना घेतली दखलआम्ही आमचा माणूस गमावला याचे दु:ख आयुष्यभर आमच्याबरोबरच राहणार आहे. पण त्यांच्या मृत्यूपश्चात सरकारने उशिरा का होईना दखल घेतली, याबाबत समाधान आहे. याकामी शिवसेनेचे दीपक सोनाळकर, मनसेचे रूपेश भोईर आणि काँग्रेसचे भिवंडी तालुक्यातील विजय बाळाराम पाटील यांचेही मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले होते. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांचेही आभार, अशी प्रतिक्रिया दिवंगत प्रमोद वाघचौडे यांचे बंधू जगदीश यांनी दिली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका