शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विवाहयोग जुळला, पण ‘कचऱ्याचा राहू’ कुंडलीत कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 02:52 IST

शहराच्या पश्चिम भागातील आधारवाडी भागातील एका तरुणाचा विवाहयोग डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे उशिरा का होईना, अखेर जुळून आला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील आधारवाडी भागातील एका तरुणाचा विवाहयोग डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे उशिरा का होईना, अखेर जुळून आला आहे. येथील डम्पिंग ग्राउंडची समस्या मात्र कायम आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे अमोल जोशीचा विवाह होत नसल्याचा सामाजिक मुद्दा तीन वर्षांपूर्वी उघड झाला होता.

आधारवाडी डम्पिंगच्या ठिकाणी कचºयाचा २५ मीटर उंच डोंगर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो. अधूनमधून कचºयाला आग लागल्याने नागरिकांच्या नाकातोंडात धूर जाऊन त्यांचा श्वास गुदमरतो. डम्पिंगला आगीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ३१ मे २०१६ रोजी महापालिकेवर धडक दिली होती. या शिष्टमंडळात नीळकंठधारा इमारतीत राहणारा अमोल जोशी हा तरुणदेखील होता. डम्पिंगच्या त्रासामुळे आपल्याला कुणी मुलगी देत नाही. त्यामुळे लग्न जमत नसल्याचा आरोप त्याने त्यावेळी केला होता. त्यामुळे डम्पिंग हा केवळ आरोग्याचा नव्हे, तर तो एक सामाजिक प्रश्नही असल्याचे उघड झाले. नीळकंठधारातील महिलांनी अमोलच्या उपस्थितीत तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांना निवेदन दिले होते. त्यावेळी देवळेकर यांनी एका वर्षात डम्पिंग हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत झालेली नाही. समस्या न सुटल्याने अमोलचे लग्न जमण्यास विलंबच झाला. अखेर, अडीच वर्षांनंतर अमोलचे लग्न जमले आहे. दरम्यानच्या काळात त्याने काही मुली पाहिल्या. शेवटी, त्याला अंबरनाथच्या मुलीने पसंती दिली आहे. त्याने सोमवारी माजी महापौर देवळेकर यांची भेट घेऊन त्यांना लग्नाची पत्रिका दिली आहे. अमोलचे लग्न जमले असले, तरी डम्पिंगची समस्या सुटलेली नाही. आपल्यासारखी गत अन्य तरुणांची होऊ नये, अशी अपेक्षा अमोलने व्यक्त केली. तो पौरोहित्य करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.नीळकंठधारातील नागरिकांनी २0१५ मध्ये महापालिकेवर धडक दिली, त्यावेळी डम्पिंग बंद करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे वक्तव्य आयुक्त ई. रवींद्रन यांनी केले होते. त्यानंतर, आयुक्त पी. वेलारासू यांची नियुक्ती झाली. आताचे आयुक्त गोविंद बोडके यांचेही स्वागत डम्पिंगच्या प्रश्नावरूनच झाले होते. तेव्हा त्यांनीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. 

टॅग्स :marriageलग्न