शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दादाजी भूसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:08 IST

कोरोना तसेच उद्भवणाऱ्या विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर रानभाज्याचे विशेष महत्व आहे. या रानभाज्या सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 500 रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

पालघर- विविध आजाराचा सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी म्हटले आहे. हुतात्मा स्मारक प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होत.

यावेळी जिल्हा परिषद अध्याक्ष वैदेही वढाण, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे तसेच कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोरोना तसेच उद्भवणाऱ्या विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर रानभाज्याचे विशेष महत्व आहे. या रानभाज्या सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 500 रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणत्याही रसायानाचा वापर न करता नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बाधवांनी पारंपारिक पध्दतीने रानभाज्यांचे जतन केले आहे. या रानभाज्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक परीस्थिती उंचावेल, असा विश्वास पालकमंत्री दादाजी भूसे यांनी यावेळी व्यक्त केला.

रानभाज्या जास्तकाळ टिकूण राहाव्यात यासाठी शीतगृह कोल्डट्रान्सपोर्ट, गोडाऊन उपलब्ध करून देण्यात येईल. रानभाज्यांच्या माध्यमातून प्रक्रीया उद्योगांना चालणा देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतकरी गट, औषध कंपन्या यांनी पुढाकार घेऊन रानभाज्याचे महत्व नागरिकांपर्यत पोहचहविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही भूसे यांनी यावेळी केले.

रानभाजी महोत्सवांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवाना उत्पनाचे स्रोत निर्माण करणे या करिता रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते. या  प्रदर्शनास स्थानिक नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.

पालकमंत्री भूसे यांनी लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पालघर जिल्ह्यातील नागरिकांना रानभाज्या खरेदी करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :vegetableभाज्याpalgharपालघर