शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दादाजी भूसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:08 IST

कोरोना तसेच उद्भवणाऱ्या विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर रानभाज्याचे विशेष महत्व आहे. या रानभाज्या सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 500 रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

पालघर- विविध आजाराचा सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी म्हटले आहे. हुतात्मा स्मारक प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होत.

यावेळी जिल्हा परिषद अध्याक्ष वैदेही वढाण, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे तसेच कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

कोरोना तसेच उद्भवणाऱ्या विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर रानभाज्याचे विशेष महत्व आहे. या रानभाज्या सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 500 रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. कोणत्याही रसायानाचा वापर न करता नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी उपयुक्त असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बाधवांनी पारंपारिक पध्दतीने रानभाज्यांचे जतन केले आहे. या रानभाज्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक परीस्थिती उंचावेल, असा विश्वास पालकमंत्री दादाजी भूसे यांनी यावेळी व्यक्त केला.

रानभाज्या जास्तकाळ टिकूण राहाव्यात यासाठी शीतगृह कोल्डट्रान्सपोर्ट, गोडाऊन उपलब्ध करून देण्यात येईल. रानभाज्यांच्या माध्यमातून प्रक्रीया उद्योगांना चालणा देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतकरी गट, औषध कंपन्या यांनी पुढाकार घेऊन रानभाज्याचे महत्व नागरिकांपर्यत पोहचहविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही भूसे यांनी यावेळी केले.

रानभाजी महोत्सवांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवाना उत्पनाचे स्रोत निर्माण करणे या करिता रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते. या  प्रदर्शनास स्थानिक नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.

पालकमंत्री भूसे यांनी लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पालघर जिल्ह्यातील नागरिकांना रानभाज्या खरेदी करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :vegetableभाज्याpalgharपालघर