शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मराठा मोर्चा : दंगलीतील संशयितांना ठाणे पोलिसांची मारहाण : नितेश राणे यांनी केली चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:45 IST

आंदोलनातील अनेक संशयितांना नाहक अडकवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता यांचाही समावेश आहे. सनील राजिवडे (२३) या ठाण्याच्या चंदनवाडीतील तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केली असून याप्रकरणी पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी आमदार नितेश राणे यांनी त्यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची घेतली भेट सनील राजिवडेला चौकशीसाठी बोलवून मारहाणआरक्षण सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून

ठाणे : ठाण्यात मराठा आरक्षणासाठी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेक तरुणांची धरपकड करून अनेकांना अटक केली. काहींना संशयावरून घरातून उचलून नाहक मारहाण केली जात आहे. या मारहाणीची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली. कलम ३०७ मुळे या तरुणांचे करिअर उद्ध्वस्त होणार असल्यामुळे हे कलमही मागे घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण्यात बुधवारी ‘ठोक मोर्चा’ काढला होता. यावेळी बंद आणि रास्ता रोकोही झाले. मात्र, अचानक नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावापैकी काहींनी पोलिसांवर दगडफेक करून अनेक वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी ठाण्यात आतापर्यंत ५४ जणांना अटक केली आहे. तर, ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. उर्वरित अनेकांची चौकशी करून सोडण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या आंदोलनातील अनेक संशयितांना नाहक अडकवण्यात येत आहे. यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता यांचाही समावेश आहे. जे आंदोलनाच्या दिवशी घरी दिवसभर होते, अशांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अगदी ३०७ सारख्या खुनाच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. अशा कलमाने या मुलांचे करिअरच उद्ध्वस्त होणार असल्यामुळे ते आधी मागे घेण्याची त्यांनी आयुक्तांकडे मागणी केली. त्यावेळी आयुक्त सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.................................सनील राजिवडे (२३) या ठाण्याच्या चंदनवाडीतील तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी आमदार राणे यांच्याकडे केली. याप्रकरणीही मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.........................आरक्षण सरकारच्या मानसिकतेवर अवलंबूनमराठा समाजाला आरक्षण देणे, हे राज्य सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. शिवसेनेने आतापर्यंत आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. आता नारायण राणे यांनी यात महत्त्वाची भूमिका घेतल्याने केवळ राणेंना श्रेय नको म्हणून शिवसेनेनेही आता आरक्षणाची मागणी केली आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे कसले आले शहाणपण, असा चिमटाही त्यांनी काढला. आरक्षण द्यायचेच झाले तर अनेक तोडगे आहेत. पण, राज्य सरकारने यात वेळकाढूपणा करूनये, अशी अपेक्षा आहे. समाजासाठी बांधीलकी असल्यामुळे आरक्षण मिळवून देण्याची राणे कुटुंबीयांचीही जबाबदारी असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस