शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

उल्हासनगरात शासनाचे आदेशाला केराची टोपली, अनेक शाळा सुरू, मनसे आक्रमक

By सदानंद नाईक | Updated: July 27, 2023 19:55 IST

शाळा प्रशासनाला मुलांना सुट्टी देण्यास भाग पाडले आहे. 

सदानंद नाईक, उल्हासनगर : शिक्षण विभागाने अतिवृष्टीची इशारा देऊन जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरवारी सुट्टी देण्यात आली. मात्र काही शाळांनी विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शाळा सुरू ठेवल्याचा प्रकार मनसेने उघड केला असून शाळा प्रशासनाला मुलांना सुट्टी देण्यास भाग पाडले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील एक शाळा ही शिक्षण विभागाने अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केल्यानंतरही सुरू ठेवल्याचा प्रकार मनसे विद्यार्थी संघटनेने उघड केला. मनसेचे प्रदीप गोडसे, विध्यार्थी सेनेचे वैभव कुलकर्णी आदींनी शाळेला धडक देऊन, शाळा सुरू ठेवल्या बाबत जाब विचारला. तसेच महापालिका शिक्षण विभागाला याबाबत माहिती दिल्यावर, शाळा प्रशासनाने मुलांना घरी सोडण्यात आले. शासनाच्या सुट्टीच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याबाबत शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी मनसे विध्यार्थी संघटनेने केली. तसेच संततधार पाऊस असतांना व शाळेला सुट्टी असतांना शाळा प्रशासन सक्तीने शिक्षकांना शाळेत बोलावीत असल्याने, अश्या शाळेवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. 

कॅम्प नं-४ येथील शाळेतील मुलांच्या पालकांनी मनसे विध्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुट्टी असताना, शाळा सुरू ठेवल्याचा प्रकार सांगितल्याची माहिती गोडसे यांनी दिली. याबाबत महापालिका शिक्षण विभागचे प्रशासन अधिकाऱ्यांना संपर्क केला असता झाला नाही. मात्र अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरSchoolशाळाMNSमनसे