शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्यात अनेक जण घरांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 04:02 IST

पंतप्रधान आवास योजना : दारिद्रयरेषेचे सर्वेक्षण चुकीचे असल्याचा बसला फटका

भातसानगर : शहापूर तालुक्यात आजही अनेक कुटुंबे पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असून केवळ दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा असल्याचा फटका अनेक लाभार्थ्यांना बसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यात शेकडो घरकुले तयार झाल्याचे पुढे आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ज्यांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्यांना तो आजही मिळत नसल्याचे दिसते आहे.

तालुक्यात आदिवासींप्रमाणेच कातकरी या आदिम जमातीला त्याचा अधिक लाभ मिळणे आवश्यक असतानाही तो मिळत नसल्याचे दिसते आहे. ठाणे जिल्ह्यात तसेच खासकरून शहापूर तालुक्यात ही जमात अधिक संख्येने राहते. मात्र, त्या जमातीला हवा तितका लाभ मिळाला नाही. त्यांच्याबरोबर इतर दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे. ही एक प्रकारची भटकी जमात असून यावर्षी या गावात तर पुढील वर्षी दुसऱ्या गावी, उन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्त आठ महिने वीटधंद्यावर गुजराण सुरू असते. त्यामुळेच अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही.

२०१५-१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६८४ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी ६५९ पूर्ण करण्यात आली. त्यासाठी सहा कोटी २६ लाख पाच हजार रु पयांचे वाटप करण्यात आले. तर, २०१६-१७ मध्ये १२४१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ११४१ पूर्ण झाली. यासाठी १३ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांचे वाटप केले. २०१७-१८ मध्ये ३८९ घरकुलांना मंजुरी मिळाली, त्यातील २७९ घरे पूर्ण झाली. यासाठी ३३ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये २४३ घरकुले मंजूर झाली असून अद्याप एकही पूर्ण झालेले नाही. यासाठी सहा लाख ७५ हजार रु पयांचे वाटपदेखील करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार २०१६ ते १९ पर्यंत १८७३ एवढ्या घरांचा उद्देश पूर्ण केला असून ९२७ शिल्लक असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. २०११ च्या सर्वेक्षणानुसार सात हजार लाभार्थी पात्र ठरले होते. त्यानुसार, क्षेत्रीय पाहणी करून २८०० चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.तालुक्यातील क्षेत्रीय सर्व्हेनुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ देण्याचा प्रयत्न असेल. - सुशांत पाटील, सहा. गटविकास अधिकारी

आदिवासी तसेच कातकरी या आदिम जमातींना कोणतेही निकष न लावता पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. खरेतर, करण्यात आलेला दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा आहे. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला, त्यांची माहिती मी घेणार आहे. खरे लाभार्थी मात्र यापासून वंचित राहिले आहेत.- पांडुरंग बरोरा, आमदार

टॅग्स :thaneठाणेPMRDAपीएमआरडीएHomeघर