शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शहापूर तालुक्यात अनेक जण घरांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 04:02 IST

पंतप्रधान आवास योजना : दारिद्रयरेषेचे सर्वेक्षण चुकीचे असल्याचा बसला फटका

भातसानगर : शहापूर तालुक्यात आजही अनेक कुटुंबे पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असून केवळ दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा असल्याचा फटका अनेक लाभार्थ्यांना बसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यात शेकडो घरकुले तयार झाल्याचे पुढे आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ज्यांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्यांना तो आजही मिळत नसल्याचे दिसते आहे.

तालुक्यात आदिवासींप्रमाणेच कातकरी या आदिम जमातीला त्याचा अधिक लाभ मिळणे आवश्यक असतानाही तो मिळत नसल्याचे दिसते आहे. ठाणे जिल्ह्यात तसेच खासकरून शहापूर तालुक्यात ही जमात अधिक संख्येने राहते. मात्र, त्या जमातीला हवा तितका लाभ मिळाला नाही. त्यांच्याबरोबर इतर दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे. ही एक प्रकारची भटकी जमात असून यावर्षी या गावात तर पुढील वर्षी दुसऱ्या गावी, उन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्त आठ महिने वीटधंद्यावर गुजराण सुरू असते. त्यामुळेच अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही.

२०१५-१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६८४ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी ६५९ पूर्ण करण्यात आली. त्यासाठी सहा कोटी २६ लाख पाच हजार रु पयांचे वाटप करण्यात आले. तर, २०१६-१७ मध्ये १२४१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ११४१ पूर्ण झाली. यासाठी १३ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांचे वाटप केले. २०१७-१८ मध्ये ३८९ घरकुलांना मंजुरी मिळाली, त्यातील २७९ घरे पूर्ण झाली. यासाठी ३३ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये २४३ घरकुले मंजूर झाली असून अद्याप एकही पूर्ण झालेले नाही. यासाठी सहा लाख ७५ हजार रु पयांचे वाटपदेखील करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार २०१६ ते १९ पर्यंत १८७३ एवढ्या घरांचा उद्देश पूर्ण केला असून ९२७ शिल्लक असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. २०११ च्या सर्वेक्षणानुसार सात हजार लाभार्थी पात्र ठरले होते. त्यानुसार, क्षेत्रीय पाहणी करून २८०० चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.तालुक्यातील क्षेत्रीय सर्व्हेनुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ देण्याचा प्रयत्न असेल. - सुशांत पाटील, सहा. गटविकास अधिकारी

आदिवासी तसेच कातकरी या आदिम जमातींना कोणतेही निकष न लावता पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. खरेतर, करण्यात आलेला दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा आहे. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला, त्यांची माहिती मी घेणार आहे. खरे लाभार्थी मात्र यापासून वंचित राहिले आहेत.- पांडुरंग बरोरा, आमदार

टॅग्स :thaneठाणेPMRDAपीएमआरडीएHomeघर