शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

शहापूर तालुक्यात अनेक जण घरांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 04:02 IST

पंतप्रधान आवास योजना : दारिद्रयरेषेचे सर्वेक्षण चुकीचे असल्याचा बसला फटका

भातसानगर : शहापूर तालुक्यात आजही अनेक कुटुंबे पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असून केवळ दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा असल्याचा फटका अनेक लाभार्थ्यांना बसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तालुक्यात शेकडो घरकुले तयार झाल्याचे पुढे आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र ज्यांना त्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्यांना तो आजही मिळत नसल्याचे दिसते आहे.

तालुक्यात आदिवासींप्रमाणेच कातकरी या आदिम जमातीला त्याचा अधिक लाभ मिळणे आवश्यक असतानाही तो मिळत नसल्याचे दिसते आहे. ठाणे जिल्ह्यात तसेच खासकरून शहापूर तालुक्यात ही जमात अधिक संख्येने राहते. मात्र, त्या जमातीला हवा तितका लाभ मिळाला नाही. त्यांच्याबरोबर इतर दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होणे गरजेचे आहे. ही एक प्रकारची भटकी जमात असून यावर्षी या गावात तर पुढील वर्षी दुसऱ्या गावी, उन्हाळ्याच्या दिवसांत कामानिमित्त आठ महिने वीटधंद्यावर गुजराण सुरू असते. त्यामुळेच अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही.

२०१५-१६ मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६८४ घरकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी ६५९ पूर्ण करण्यात आली. त्यासाठी सहा कोटी २६ लाख पाच हजार रु पयांचे वाटप करण्यात आले. तर, २०१६-१७ मध्ये १२४१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ११४१ पूर्ण झाली. यासाठी १३ कोटी ६९ लाख २० हजार रुपयांचे वाटप केले. २०१७-१८ मध्ये ३८९ घरकुलांना मंजुरी मिळाली, त्यातील २७९ घरे पूर्ण झाली. यासाठी ३३ लाख ४८ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. २०१८-१९ मध्ये २४३ घरकुले मंजूर झाली असून अद्याप एकही पूर्ण झालेले नाही. यासाठी सहा लाख ७५ हजार रु पयांचे वाटपदेखील करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार २०१६ ते १९ पर्यंत १८७३ एवढ्या घरांचा उद्देश पूर्ण केला असून ९२७ शिल्लक असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. २०११ च्या सर्वेक्षणानुसार सात हजार लाभार्थी पात्र ठरले होते. त्यानुसार, क्षेत्रीय पाहणी करून २८०० चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.तालुक्यातील क्षेत्रीय सर्व्हेनुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ देण्याचा प्रयत्न असेल. - सुशांत पाटील, सहा. गटविकास अधिकारी

आदिवासी तसेच कातकरी या आदिम जमातींना कोणतेही निकष न लावता पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. खरेतर, करण्यात आलेला दारिद्र्यरेषेचा सर्व्हे चुकीचा आहे. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला, त्यांची माहिती मी घेणार आहे. खरे लाभार्थी मात्र यापासून वंचित राहिले आहेत.- पांडुरंग बरोरा, आमदार

टॅग्स :thaneठाणेPMRDAपीएमआरडीएHomeघर