शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भिवंडी शहर विकास आराखड्यात अनेक त्रुटी; आमदार रईस शेख यांचा आरोप

By नितीन पंडित | Updated: November 2, 2023 18:16 IST

नव्या विकास आराखड्याप्रमाणे शहर विकासकामांसाठीची निधी कुठून आणनार असा सवाल देखील आमदार शेख यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

भिवंडी : भिवंडी शहराचा विकास आराखडा मनपा आयुक्तांनी मागील महिन्यात जाहीर केला आहे, मात्र  हा विकास आराखडा बनवताना भिवंडीकरांसह विस्थापित नागरिकांचा विचार केला गेला नसून आराखड्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे गुरुवारी आमदार शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. विकास आराखड्यामध्ये बाधितांच्या पुनर्वसनासाठी पालिका प्रशासनाकडे कोणतीही योजना नसल्याने मागील वीस वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा देखील रखडला असून या आराखड्याप्रमाणे केवळ पाच टक्केच काम झाले हे शहराचे दुर्दैव असून आर्थिक डबघाईला आलेल्या मनपा प्रशासनाकडे नव्या विकास आराखड्याप्रमाणे शहर विकासकामांसाठीची निधी कुठून आणनार असा सवाल देखील आमदार शेख यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या घरांना व जमीन मालकांना बाजार भावा प्रमाणे मोबदला देणे बंधनकारक असतानाही भिवंडी मनपाकडून त्याबाबत कोणतेही आश्वासन अथवा घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्याचबरोबर या आराखड्यातील आरक्षणामध्ये देखील अनेक त्रुटी असून,जिथे रस्त्यांची गरज नाही अशा ठिकाणी रस्ते दर्शविण्यात आले असून, जेथे रस्त्यांची गरज आहे अशा रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार शेख यांनी केला आहे.       

शहर विकास आराखडा जाहीर झाल्यापासून अनेक दलालांनी नागरिकांकडे धावा घेतला आहे, मात्र नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये त्यासाठी नागरिकांना काही अडचणी अथवा प्रश्न असल्यास थेट मनपा प्रशासनाशी अथवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी आमदार शेख यांनी केले असून शहरातील बाधितांना केवळ टीडीआर नको तर बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा तसेच वन विभागाच्या जागेवर असलेल्या घरांना देखील मोबदला देण्यात यावा व विकास आराखड्याबाबत आक्षेप घेण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आमदार शेख यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी