शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भिवंडी शहर विकास आराखड्यात अनेक त्रुटी; आमदार रईस शेख यांचा आरोप

By नितीन पंडित | Updated: November 2, 2023 18:16 IST

नव्या विकास आराखड्याप्रमाणे शहर विकासकामांसाठीची निधी कुठून आणनार असा सवाल देखील आमदार शेख यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

भिवंडी : भिवंडी शहराचा विकास आराखडा मनपा आयुक्तांनी मागील महिन्यात जाहीर केला आहे, मात्र  हा विकास आराखडा बनवताना भिवंडीकरांसह विस्थापित नागरिकांचा विचार केला गेला नसून आराखड्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे गुरुवारी आमदार शेख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. विकास आराखड्यामध्ये बाधितांच्या पुनर्वसनासाठी पालिका प्रशासनाकडे कोणतीही योजना नसल्याने मागील वीस वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा देखील रखडला असून या आराखड्याप्रमाणे केवळ पाच टक्केच काम झाले हे शहराचे दुर्दैव असून आर्थिक डबघाईला आलेल्या मनपा प्रशासनाकडे नव्या विकास आराखड्याप्रमाणे शहर विकासकामांसाठीची निधी कुठून आणनार असा सवाल देखील आमदार शेख यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या घरांना व जमीन मालकांना बाजार भावा प्रमाणे मोबदला देणे बंधनकारक असतानाही भिवंडी मनपाकडून त्याबाबत कोणतेही आश्वासन अथवा घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्याचबरोबर या आराखड्यातील आरक्षणामध्ये देखील अनेक त्रुटी असून,जिथे रस्त्यांची गरज नाही अशा ठिकाणी रस्ते दर्शविण्यात आले असून, जेथे रस्त्यांची गरज आहे अशा रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार शेख यांनी केला आहे.       

शहर विकास आराखडा जाहीर झाल्यापासून अनेक दलालांनी नागरिकांकडे धावा घेतला आहे, मात्र नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये त्यासाठी नागरिकांना काही अडचणी अथवा प्रश्न असल्यास थेट मनपा प्रशासनाशी अथवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी आमदार शेख यांनी केले असून शहरातील बाधितांना केवळ टीडीआर नको तर बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा तसेच वन विभागाच्या जागेवर असलेल्या घरांना देखील मोबदला देण्यात यावा व विकास आराखड्याबाबत आक्षेप घेण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आमदार शेख यांनी केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी