शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मराठीमध्ये लिहिलेली बरीच आत्मचरित्रे खोटी; ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:22 IST

मराठीमध्ये लिहिलेली बरीच आत्मचरित्रे खोटी असतात. पण याला पुरावा नाही, असे वक्तव्य ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मराठीमध्ये लिहिलेली बरीच आत्मचरित्रे खोटी असतात. पण याला पुरावा नाही, असे वक्तव्य ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले. माजी मुख्याध्यापक अरुण जोशी यांनी लिहिलेले त्यांचे शैक्षणिक आत्मकथन ‘घडताना, घडविताना’ तसेच शिक्षिका आशा जोशी यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनपर व ललित लेख यांचा समावेश असलेले ‘जे पाहिलं ते, जे वाटलं ते’ या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवारी श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर येथे बागवे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, माजी शिक्षणाधिकारी एल्. पी. माळी, माजी सहसंचालक अरुण ठाकरे, वर्तकनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे आदी उपस्थित होते. शिक्षक निवृत्त झाला तरी त्याला प्रवृत्त करणारे शिष्य असतात हे नमूद करताना बागवे यांनी त्यांनी ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय सांगितला. 

ते पुढे म्हणाले,  मला शिक्षकांच्या कार्यक्रमाला जायला आनंद होतो तिथे लबाडी नसते. महाविद्यालयीन प्राध्यापकांपेक्षा मला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक जास्त आवडतात, या शिक्षकांकडे मातीचे गोळी आलेले असतात आणि त्याला आकार देण्याचे काम ते करतात. 

‘भटकंती ही मनातल्या मनात असते’जो विद्यार्थ्यांच्या मनाच्या शेतीची मशागत करतो तो शिक्षक असतो. विद्यार्थी कुठेही भेटला तरी तो शिक्षकाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही आणि हे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले संस्कार आहेत. पर्यटन हे आखून रेखून केले जाते. भटकंती ही मनातल्या मनात असते. पहिले पुस्तक हे त्या लेखकाचे अपत्य असते. शिक्षकाला कोणत्याही पद्धतीने अक्षर प्रवास थांबवू शकत नाही, असे त्यांनी शेवटी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे