शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Mansukh Hiren Murder Case: मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई एटीएसला ठाणे न्यायालयाचा झटका

By जितेंद्र कालेकर | Updated: March 24, 2021 21:14 IST

मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणे न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे दिले आदेश विनायक शिंदे आणि नरेश गोरचाही ताबा आता एनआयने घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणेन्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोन्ही आरोपींचाही ताबा एनआयएकडे देण्याचेही आदेश दिले.मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा असे आदेश केंद्र सरकारने २० मार्च २०२१ रोजी महाराष्टÑ एटीएसला दिले होते. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिली नसल्याचे कारण दाखवत एटीएसने हा तपास एनआयएकडे सोपविला नव्हता. त्यामुळेच २४ मार्च रोजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अनिल सिंग आणि अ‍ॅड. संदेश पाटील यांनी एनआयएची ही सर्व बाजू ठाणे न्यायालयात मांडली. एटीएसने हा मनसुख हत्या प्रकरणाचा तपास थांबवावा. तो एनआयए अ‍ॅक्टच्या सेक्शन ६ आणि ८ नुसार एनआयएकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयात केली होती. सेक्शन ९ नुसार राज्य सरकार अर्थात एटीएस यामध्ये केवळ सहाय्य करु शकते, असाही युक्तिवाद करण्यात आला. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्या. इंगळे यांनी मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एटीएसने थांबवून तो सर्व कागदपत्रांसह एनआयएकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एनआयए कडे सोपवावा, असेही आदेश दिले. एटीएसची बाजू अ‍ॅड. अनिता सुपारे यांनी मांडली. यावेळी एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम कलाटे, एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे आदी उपस्थित होते.* विक्रोळी येथून मनसुख हिरेन यांची मोटार चोरीचा गुन्हा, अंटालिया येथे मनसुख यांच्या मोटारीमध्ये मिळालेले जिलेटीन आणि मनसुख यांची हत्या अशा तीन गुन्हयांपैकी मोटार चोरीचा गुन्हा संपला. अंटालियाजवळ जिलेटीनची मोटार मिळाल्याचा तपास एनआयएकडे होता. याच गुन्हयाशी संलग्न असलेल्या मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडी येथे मिळाल्याने हाही तपास एनआयएकडे मिळावा, अशी मागणी एनआयएने न्यायालयात केली होती.दरम्यान, शिंदे आणि गोर या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना तसेच या गुन्हयाची कागदपत्रे एनआयएकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोनच दिवसांपूर्वी एटीएसने सचिन वाझे यांचा मनसुख हत्या प्रकरणात प्रमुख सहभाग असून त्यांचा ताबा एनआयएकडून घेण्यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे म्हटले होते. तत्पूर्वीच न्यायालयाने या तपासासह आरोपींनाही न्यायालयामार्फत आपल्या ताब्यात घेतल्याने एटीएसला ही मोठी चपराक असल्याचे बोलले जाते. 

‘केंद्र सरकारने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. परंतू, एटीएसने तो वर्ग केला नव्हता. अखेर मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेली स्फोटकांची मोटार आणि हिरेन खून प्रकरण एकमेकांशी निगडीत असल्याने या तपासाची मागणी एनआयएने केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.’अ‍ॅड. संदेश पाटील, एनआयएचे वकील, मुंबई. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय