शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

प्रवास करण्याआधीच मनसैनिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:04 AM

पाच मिनिटे प्रवासाची मागणी फेटाळली : सर्वांची जामिनावर सुटका, जिल्ह्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले होते. ठाणे रेल्वेस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. ती पोलिसांनी फेटाळली. नंतर सर्र्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.मनसैनिकांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रविवारी पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तरीही, सकाळी ८.३० वाजता मनसैनिक रेल्वेप्रवासासाठी ठाणे स्थानकावर पोहोचले. त्याआधीच मोठा पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी हे आंदोलन करू नये, असे त्यांना बजावले.परंतु, जाधव यांनी पाच मिनिटे तरी प्रवास करू द्या, अशी विनंती पोलिसांना केली. त्यांनी ती विनंती नाकारून जाधव यांच्यासह रवींद्र मोरे, महेश कदम, आशीष डोके, पुष्कर विचारे, अरुण घोसाळकर, विशाल घाग, राजेंद्र कांबळे यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून नंतर सुटका केली.‘सरकार पडण्याच्या भीतीनेच लोक वेठीस’पोलिसांवर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. बससेवा सुरू आहे तिथेही गर्दी असते, तिथे कोरोना पसरणार नाही का? रेल्वे सुरू झाल्यावरच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार का? सरकार घाबरले आहे. सरकारला पडण्याची भीती वाटत असल्यामुळे ते लोकांना वेठीस धरत असल्याचे जाधव पुढे म्हणाले.भार्इंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखलमीरा रोड : लोकल सेवा नागरिकांसाठी सुरू करा या मागणीसाठी भार्इंदर रेल्वेस्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. त्यांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी मनसेच्या २१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग एकीकडे वेगाने वाढत असताना दुसरीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सामान्य नागरिकांसाठी सुरु करा अशी मागणी मनसेने केली. त्यासाठी मनसे कडून लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले गेले. परंतु सोमवारी मीरा भार्इंदरमधील मनसेचे पदाधिकारी - कार्यकर्ते हे लोकलने प्रवास करण्यासाठी म्हणून भार्इंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर जमले असता नवघर पोलिस व रेल्वे पोलिसांनी मनसैनिकांना स्थानकात प्रवेशच करू दिला नाही. मनसैनिकांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.बंदोबस्त झुगारून यांनी केला प्रवासजाधव आणि इतर मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली, तरी दुसरीकडे ठाणे शहर सचिव निलेश चव्हाण यांनी तिकीट काढून ठाणे ते मुलुंड असा प्रवास करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश हितापे, जनार्दन खरिवले, हमराज जोशी हे तीन कार्यकर्ते होते. आम्ही तिकीट काढून प्रवास केला. आम्हाला कोणी अडविले नाही. रेल्वेमध्ये गेल्यावर डबा भरलेला होता. कोणतेही सुरक्षित अंतर पाळले गेले नव्हते. रेल्वे ही चाकरमान्यांची गरज आहे, हे दिसून आले. आत असलेल्या सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :MNSमनसे