शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मांजर्ली, हेंद्रे्रपाड्याला बसला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:52 IST

प्रशासनाकडून वेळेत मदत नाही : १४ वर्षांनंतर पुराचा अनुभव, घरांमधील अनेक वस्तूंचे नुकसान

ठळक मुद्देशुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शनिवारी पहाटे बदलापूरमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली होती

बदलापूर : महापुरात बदलापूरमधील हेंद्रेपाडा आणि मांजर्ली भागातील नव्या वस्तीला सर्वाधिक फटका बसला आहे. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर पुन्हा १४ वर्षांनी बदलापूरकरांनी २७ जुलै २०१९ च्या पुराचा अनुभव घेतला. मात्र पूर्वीपेक्षा बदलापूरमध्ये नदीपात्राजवळ सर्वाधिक इमारती झाल्याने त्याच इमारतींना सर्वात मोठा फटका बसला आहे. बॅरेज रस्त्यावरील रितू वल्ड या संकुलातील पहिला मजलाही पाण्याखाली आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तर मदतीच्या नावावर प्रशासनाने रस्ते बंद करण्यापलिकडे कोणतेच काम केले नाही. प्रशानाकडून वेळेत मदत न आल्याने नागरिकांनी स्वत:ची सोय स्वत:च केली होती.

शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शनिवारी पहाटे बदलापूरमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. दिवसभर पावसाचा कहर सुरू राहिल्याने शनिवारचा दिवस नागरिकांनी इमारतीवरील वरच्या मजल्यावर काढला. रात्री ८ नंतर पाण्याची पातळी कमी झाल्यावर नागरिकांनी पुन्हा आपल्या घराचा ताबा घेतला. मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान हे पाण्यात भिजले होते. अनेकांच्या महागड्या वस्तू या पुरात नादुरुस्त झाल्या. पाण्यासोबत चिखलही मोठ्या प्रमाणात आल्याने संपूर्ण घरात चिखल झाला होता. त्यातच पाणी आणि वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना आपल्या घरातील गाळ काढण्यातही अडचणी आल्या.शनिवारचा दिवस आणि शनिवारची रात्र अंधारात काढल्यावर रविवारी प्रत्येकाने घराची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले. पालिकेची यंत्रणा ही केवळ बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने नागरिकांनी आपल्याच इमारतीमधील सहकाऱ्यांची मदत घेत घराची स्वच्छता केली.शहरातील पाणी पुरवठा बंद राहिल्याने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी टँकरची मदत घेण्यात आली. पुरात बाधित झालेल्या परिसरात टँकरनेच दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला. तर सकाळी वीजपुरवठाही सुरळीत झाल्याने नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते त्या घरांची अवस्था बिकट झाली होती. घरातील धान्य आणि वापरातील सर्व साहित्यही पाण्यात भिजले होते. याच भागातील दुकानदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानातील सर्व साहित्य भिजल्याने दुकानदारांनी शिल्लक राहिलेल्या सामानाची आवराआवर करण्यात दिवस घालवला.

वालीवली भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने त्या घरातील नागरिकांच्या वस्तुंचे नुकसान झाले. टीव्ही, फ्रीज, एसी नादुरूस्त झाले. विद्यार्थ्यांची पुस्तकेही पाण्यात भिजल्याने शैक्षणिक नुकसान झाले. हेंद्रे्रपाडा भागातील अनेक प्राण्यांना देखील पुराचा फटका सहन करावा लागला. नागरिकांनी शक्य झाले तेथे प्राण्यांची मदत करुन त्यांना वाचविण्याचे काम केले.रस्तेवाहतुकीसाठी खुलेशनिवारी दिवसभर हेंद्रेपाडा, रमेशवाडी, बॅरेज रोड आणि वालिवली भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यावर रविवारी सकाळी हे सर्व मार्ग पुन्हा खुले करण्यात आले. त्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली.बालकाश्रमालाही फटकासत्कर्म बालकाश्रमालाही या पुराचा फटका सहन करावा लागला. या ठिकाणी असलेली २५ मुले सुखरुप असली तरी त्यांचे नियमित वापराच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना घालण्यासाठी कपडेही शिल्लक राहिले नाही.सामाजिक संस्थांची मदतरमेशवाडी भागात पुराचा सर्वात जास्त फटका बसल्याने या भागातील नागरिकांना मदतीसाठी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी पुढे सरसावले. तर राजकीय पुढाºयांनीही या भागात खाद्यपदार्थ, जेवण आणि दैनंदिन वापराचे साहित्य पुरवठा केला.

टॅग्स :badlapurबदलापूरambernathअंबरनाथ