शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

मांजर्ली, हेंद्रे्रपाड्याला बसला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:52 IST

प्रशासनाकडून वेळेत मदत नाही : १४ वर्षांनंतर पुराचा अनुभव, घरांमधील अनेक वस्तूंचे नुकसान

ठळक मुद्देशुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शनिवारी पहाटे बदलापूरमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली होती

बदलापूर : महापुरात बदलापूरमधील हेंद्रेपाडा आणि मांजर्ली भागातील नव्या वस्तीला सर्वाधिक फटका बसला आहे. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर पुन्हा १४ वर्षांनी बदलापूरकरांनी २७ जुलै २०१९ च्या पुराचा अनुभव घेतला. मात्र पूर्वीपेक्षा बदलापूरमध्ये नदीपात्राजवळ सर्वाधिक इमारती झाल्याने त्याच इमारतींना सर्वात मोठा फटका बसला आहे. बॅरेज रस्त्यावरील रितू वल्ड या संकुलातील पहिला मजलाही पाण्याखाली आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तर मदतीच्या नावावर प्रशासनाने रस्ते बंद करण्यापलिकडे कोणतेच काम केले नाही. प्रशानाकडून वेळेत मदत न आल्याने नागरिकांनी स्वत:ची सोय स्वत:च केली होती.

शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे शनिवारी पहाटे बदलापूरमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. दिवसभर पावसाचा कहर सुरू राहिल्याने शनिवारचा दिवस नागरिकांनी इमारतीवरील वरच्या मजल्यावर काढला. रात्री ८ नंतर पाण्याची पातळी कमी झाल्यावर नागरिकांनी पुन्हा आपल्या घराचा ताबा घेतला. मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान हे पाण्यात भिजले होते. अनेकांच्या महागड्या वस्तू या पुरात नादुरुस्त झाल्या. पाण्यासोबत चिखलही मोठ्या प्रमाणात आल्याने संपूर्ण घरात चिखल झाला होता. त्यातच पाणी आणि वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना आपल्या घरातील गाळ काढण्यातही अडचणी आल्या.शनिवारचा दिवस आणि शनिवारची रात्र अंधारात काढल्यावर रविवारी प्रत्येकाने घराची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले. पालिकेची यंत्रणा ही केवळ बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने नागरिकांनी आपल्याच इमारतीमधील सहकाऱ्यांची मदत घेत घराची स्वच्छता केली.शहरातील पाणी पुरवठा बंद राहिल्याने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी टँकरची मदत घेण्यात आली. पुरात बाधित झालेल्या परिसरात टँकरनेच दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला. तर सकाळी वीजपुरवठाही सुरळीत झाल्याने नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. ज्या घरांमध्ये पाणी शिरले होते त्या घरांची अवस्था बिकट झाली होती. घरातील धान्य आणि वापरातील सर्व साहित्यही पाण्यात भिजले होते. याच भागातील दुकानदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानातील सर्व साहित्य भिजल्याने दुकानदारांनी शिल्लक राहिलेल्या सामानाची आवराआवर करण्यात दिवस घालवला.

वालीवली भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने त्या घरातील नागरिकांच्या वस्तुंचे नुकसान झाले. टीव्ही, फ्रीज, एसी नादुरूस्त झाले. विद्यार्थ्यांची पुस्तकेही पाण्यात भिजल्याने शैक्षणिक नुकसान झाले. हेंद्रे्रपाडा भागातील अनेक प्राण्यांना देखील पुराचा फटका सहन करावा लागला. नागरिकांनी शक्य झाले तेथे प्राण्यांची मदत करुन त्यांना वाचविण्याचे काम केले.रस्तेवाहतुकीसाठी खुलेशनिवारी दिवसभर हेंद्रेपाडा, रमेशवाडी, बॅरेज रोड आणि वालिवली भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यावर रविवारी सकाळी हे सर्व मार्ग पुन्हा खुले करण्यात आले. त्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत झाली.बालकाश्रमालाही फटकासत्कर्म बालकाश्रमालाही या पुराचा फटका सहन करावा लागला. या ठिकाणी असलेली २५ मुले सुखरुप असली तरी त्यांचे नियमित वापराच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना घालण्यासाठी कपडेही शिल्लक राहिले नाही.सामाजिक संस्थांची मदतरमेशवाडी भागात पुराचा सर्वात जास्त फटका बसल्याने या भागातील नागरिकांना मदतीसाठी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी पुढे सरसावले. तर राजकीय पुढाºयांनीही या भागात खाद्यपदार्थ, जेवण आणि दैनंदिन वापराचे साहित्य पुरवठा केला.

टॅग्स :badlapurबदलापूरambernathअंबरनाथ