शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात अजिबात सत्ता जाणार नाही, मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 07:27 IST

महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले.

ठाणे : कर्नाटक निकालाबाबत बोलले जाते; पण त्याचवेळी उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल भाजपच्या बाजूने आला. तेथे १०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागूनही त्याबाबत कोणी बोलत नाही. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात सत्ताबदल होणार नसल्याचा दावा  पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी केला. 

महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. याचदरम्यान ठाणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी यापूर्वी २० कोटींपेक्षा जास्त निधी दिला असून, यंदा विशेष योजना राबविण्यात येणार असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

फेरीवाला योजनेबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लोढा यांनी टीका केली. तसेच खासदार संजय राऊत यांच्याकडून केलेल्या आरोपांना उत्तर देणेही टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘मोदी @ ९’ कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देण्यासाठी भाजपच्या ठाणे खोपट येथील कार्यालयात ते आले होते.

पर्यटनस्थळांसाठी आराखडाशहरात महाजनसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्ताने शहरातील चार लाख घरांपर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचून पंतप्रधान मोदींनी केलेल्या कार्याची माहिती देतील. ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात येत आहे. सागरमाला योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील बंदरांमधून प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे लोढा यांनी सांगितले. याशिवाय जागतिक दर्जाच्या रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर ठाणे स्थानकाच्या विकासासाठी मोदी सरकारने ८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी