शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मानेखिंड ग्रामस्थांना बसत आहेत पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:56 IST

टँकरने दिवसाआड पाणीपुरवठा : पाणी गोळा करण्यातच दिवस खर्च

वसंत पानसरेकिन्हवली: शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकेश्वर परिसरातील मानेखिंड ग्रामपंचायतीतील सर्वच गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाण्याच्या टंचाईमुळे महिला तसेच इतर ग्रामस्थांचा संपूर्ण दिवस केवळ पाणी भरण्यासाठी जातो. यामुळे रोजगाराची इतर कुठलीही कामे न करता फक्त पाणी भरण्यासाठी वणवण फिरणे हेच काम त्यांच्यामागे लागले आहे.

काही सेवाभावी नागरिकांमार्फत येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या वतीने कूपनलिका बसवण्यात आल्या आहेत. परंतु, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाणी कमीच येत आहे.

शहापूर तालुक्यात किन्हवली जिल्हा परिषद गटातील मानेखिंड, साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, आंबेखोर पठार, कुंभाईचीवाडी, टाकीचीवाडी आणि मधलीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई असून महिलांना रात्रभर जागून तीन ते चार किमी अंतरावरून पाणी आणावे लागतेआहे. याबाबत, जिल्हा परिषद सदस्या कांचन साबळे, पंचायत समिती सदस्या शारदा रसाळ, पंचायत समिती कनिष्ठ सहा. किशोर गायकवाड यांच्या प्रशासकीय स्तरावरील प्रयत्नाने येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. परंतु, टँकर दिवसाआड येत असल्याने नागरिकांना टंचाई भेडसावते आहे. जनावरांनादेखील पाण्यासाठी भटकावे लागत असून काही जनावरांचा पाण्याअभावी मृत्यूदेखील झाला.

साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, टाकेश्वर येथेही कूपनलिका बसवल्या आहेत. आदिवासी जनतेला पाणीटंचाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. येथील मानेखिंड ग्रामपंचायत परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी कूपनलिका मारून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. - किशोर गायकवाड, कनिष्ठ सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर पंचायत समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणी