शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मानेखिंड ग्रामस्थांना बसत आहेत पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:56 IST

टँकरने दिवसाआड पाणीपुरवठा : पाणी गोळा करण्यातच दिवस खर्च

वसंत पानसरेकिन्हवली: शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकेश्वर परिसरातील मानेखिंड ग्रामपंचायतीतील सर्वच गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाण्याच्या टंचाईमुळे महिला तसेच इतर ग्रामस्थांचा संपूर्ण दिवस केवळ पाणी भरण्यासाठी जातो. यामुळे रोजगाराची इतर कुठलीही कामे न करता फक्त पाणी भरण्यासाठी वणवण फिरणे हेच काम त्यांच्यामागे लागले आहे.

काही सेवाभावी नागरिकांमार्फत येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या वतीने कूपनलिका बसवण्यात आल्या आहेत. परंतु, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाणी कमीच येत आहे.

शहापूर तालुक्यात किन्हवली जिल्हा परिषद गटातील मानेखिंड, साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, आंबेखोर पठार, कुंभाईचीवाडी, टाकीचीवाडी आणि मधलीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई असून महिलांना रात्रभर जागून तीन ते चार किमी अंतरावरून पाणी आणावे लागतेआहे. याबाबत, जिल्हा परिषद सदस्या कांचन साबळे, पंचायत समिती सदस्या शारदा रसाळ, पंचायत समिती कनिष्ठ सहा. किशोर गायकवाड यांच्या प्रशासकीय स्तरावरील प्रयत्नाने येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. परंतु, टँकर दिवसाआड येत असल्याने नागरिकांना टंचाई भेडसावते आहे. जनावरांनादेखील पाण्यासाठी भटकावे लागत असून काही जनावरांचा पाण्याअभावी मृत्यूदेखील झाला.

साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, टाकेश्वर येथेही कूपनलिका बसवल्या आहेत. आदिवासी जनतेला पाणीटंचाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. येथील मानेखिंड ग्रामपंचायत परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी कूपनलिका मारून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. - किशोर गायकवाड, कनिष्ठ सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर पंचायत समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणी