शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

मानेखिंड ग्रामस्थांना बसत आहेत पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:56 IST

टँकरने दिवसाआड पाणीपुरवठा : पाणी गोळा करण्यातच दिवस खर्च

वसंत पानसरेकिन्हवली: शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकेश्वर परिसरातील मानेखिंड ग्रामपंचायतीतील सर्वच गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाण्याच्या टंचाईमुळे महिला तसेच इतर ग्रामस्थांचा संपूर्ण दिवस केवळ पाणी भरण्यासाठी जातो. यामुळे रोजगाराची इतर कुठलीही कामे न करता फक्त पाणी भरण्यासाठी वणवण फिरणे हेच काम त्यांच्यामागे लागले आहे.

काही सेवाभावी नागरिकांमार्फत येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या वतीने कूपनलिका बसवण्यात आल्या आहेत. परंतु, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाणी कमीच येत आहे.

शहापूर तालुक्यात किन्हवली जिल्हा परिषद गटातील मानेखिंड, साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, आंबेखोर पठार, कुंभाईचीवाडी, टाकीचीवाडी आणि मधलीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई असून महिलांना रात्रभर जागून तीन ते चार किमी अंतरावरून पाणी आणावे लागतेआहे. याबाबत, जिल्हा परिषद सदस्या कांचन साबळे, पंचायत समिती सदस्या शारदा रसाळ, पंचायत समिती कनिष्ठ सहा. किशोर गायकवाड यांच्या प्रशासकीय स्तरावरील प्रयत्नाने येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. परंतु, टँकर दिवसाआड येत असल्याने नागरिकांना टंचाई भेडसावते आहे. जनावरांनादेखील पाण्यासाठी भटकावे लागत असून काही जनावरांचा पाण्याअभावी मृत्यूदेखील झाला.

साखरवाडी, भल्याचीवाडी, कवटेवाडी, टाकेश्वर येथेही कूपनलिका बसवल्या आहेत. आदिवासी जनतेला पाणीटंचाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. येथील मानेखिंड ग्रामपंचायत परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी कूपनलिका मारून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. - किशोर गायकवाड, कनिष्ठ सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर पंचायत समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणी