शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या व्यक्तीचा मुंबईत लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:30 IST

उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे मुंबईतच राहणाऱ्या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यातही ठाणे पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली.

ठळक मुद्देमुंबईतील भावाशी ठाणे पोलिसांनी घडविली भेटकळव्यातील खून प्रकरणाचा शोध घेतांना मिळाले धागेदोरेठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा येथील गोळीबार प्रकरणाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू असताना २० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात युनिट-१ च्या पथकाला शनिवारी यश आले. त्यामुळे मुंबईतच राहणा-या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यात ठाणे पोलिसांना यश आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.कळवा पूर्व येथील शिवाजीनगर भागातील वीर युवराज मेडिकलमध्ये दरोडा टाकण्यासाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. त्यानंतर, दुकानातील एका कर्मचाºयाचा खून करून या चोरट्याने तिथून पलायन केले. याच प्रकरणाच्या तपासातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माहीम दर्गा, मुंबईपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, समीर अहिरराव आणि पोलीस हवालदार आनंदा भिलारे आदींच्या पथकाने माग काढला. तेव्हा माहीम दर्गा परिसरात राहणाºया स्थानिक रहिवाशांनी या सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपी हा दोन वर्षांपूर्वी माहीम दर्गा भागात राहणारा ‘दिल्ली’नामक व्यक्ती असल्याचा दावा केला. त्याच अनुषंगाने या पथकाने दिल्ली याचा बांद्रा, दादरसह इतर ठिकाणी शोध घेतला. तो काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाकोला परिसरातील ब्रिजखाली दिसल्याचे अनेक रहिवाशांनी सांगितले. त्याप्रमाणे वाकोला ब्रिज परिसरात त्याचा शोध घेतला असता, तो या भागात ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ब्रिजखाली मिळाला. मात्र, त्याचा कळव्यातील मेडिकलमधील गोळीबार प्रकरणाशी संबंध नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुºहाडे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळले. तो २० वर्षांपूर्वी मूळ गावाहून मुंबईत पळून आलेला होता. लहानपणी त्याच्या फतेहपूरसिक्री जिल्ह्यातील जनता (ता. बेनकी) येथून पळून आल्याचेही पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने सांगितले. त्याने मूळगावी आईवडिलांकडे जाण्याचीही इच्छा या पथकाकडे व्यक्त केली. तेव्हा उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतीने दिल्ली याच्या मूळ गावी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर, त्याचा मोठा भाऊ शफीक शेख (रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला ठाण्यातील युनिट-१ च्या कार्यालयात बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली. तो आपलाच लहान भाऊ असल्याचे शफिकने ओळखले. आपल्या लहान भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारीही त्याने घेतल्यानंतर ठाणे पोलिसांनी दिल्ली हुसेन याला त्याच्या भावाच्या ताब्यात दिले. एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना, समांतरपणे मानवतावादी दृष्टिकोन जपल्याने बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाइकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं