शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उत्तर प्रदेश येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या व्यक्तीचा मुंबईत लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:30 IST

उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे मुंबईतच राहणाऱ्या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यातही ठाणे पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली.

ठळक मुद्देमुंबईतील भावाशी ठाणे पोलिसांनी घडविली भेटकळव्यातील खून प्रकरणाचा शोध घेतांना मिळाले धागेदोरेठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा येथील गोळीबार प्रकरणाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू असताना २० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात युनिट-१ च्या पथकाला शनिवारी यश आले. त्यामुळे मुंबईतच राहणा-या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यात ठाणे पोलिसांना यश आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.कळवा पूर्व येथील शिवाजीनगर भागातील वीर युवराज मेडिकलमध्ये दरोडा टाकण्यासाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. त्यानंतर, दुकानातील एका कर्मचाºयाचा खून करून या चोरट्याने तिथून पलायन केले. याच प्रकरणाच्या तपासातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माहीम दर्गा, मुंबईपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, समीर अहिरराव आणि पोलीस हवालदार आनंदा भिलारे आदींच्या पथकाने माग काढला. तेव्हा माहीम दर्गा परिसरात राहणाºया स्थानिक रहिवाशांनी या सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपी हा दोन वर्षांपूर्वी माहीम दर्गा भागात राहणारा ‘दिल्ली’नामक व्यक्ती असल्याचा दावा केला. त्याच अनुषंगाने या पथकाने दिल्ली याचा बांद्रा, दादरसह इतर ठिकाणी शोध घेतला. तो काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाकोला परिसरातील ब्रिजखाली दिसल्याचे अनेक रहिवाशांनी सांगितले. त्याप्रमाणे वाकोला ब्रिज परिसरात त्याचा शोध घेतला असता, तो या भागात ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ब्रिजखाली मिळाला. मात्र, त्याचा कळव्यातील मेडिकलमधील गोळीबार प्रकरणाशी संबंध नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुºहाडे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळले. तो २० वर्षांपूर्वी मूळ गावाहून मुंबईत पळून आलेला होता. लहानपणी त्याच्या फतेहपूरसिक्री जिल्ह्यातील जनता (ता. बेनकी) येथून पळून आल्याचेही पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने सांगितले. त्याने मूळगावी आईवडिलांकडे जाण्याचीही इच्छा या पथकाकडे व्यक्त केली. तेव्हा उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतीने दिल्ली याच्या मूळ गावी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर, त्याचा मोठा भाऊ शफीक शेख (रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला ठाण्यातील युनिट-१ च्या कार्यालयात बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली. तो आपलाच लहान भाऊ असल्याचे शफिकने ओळखले. आपल्या लहान भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारीही त्याने घेतल्यानंतर ठाणे पोलिसांनी दिल्ली हुसेन याला त्याच्या भावाच्या ताब्यात दिले. एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना, समांतरपणे मानवतावादी दृष्टिकोन जपल्याने बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाइकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं