शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

गावात कुपोषण, शहरांत अतिपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : एकीकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषणाने कोरोनाकाळात ९९ मुले त्यामुळे दगावली आहेत. असे असतानाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : एकीकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषणाने कोरोनाकाळात ९९ मुले त्यामुळे दगावली आहेत. असे असतानाच शहरी भागात अतिपोषण ही समस्या डोकेवर काढत आहे. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबच्यासमोर मुलांचा अधिकतर वेळ जातो. त्यातच एकाच जागी असल्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे. बसल्या जागी खायला मिळत असल्यामुळे लहान मुलांमधील स्थूलता हा चिंतेचा विषय बनला आहे.

जाणकारांच्या मते शहरी भागात कोरोनाच्या लॉकडाऊनपासून ते आता निर्बंध शिथिल होण्यापर्यंत मुलांमध्ये अतिस्थूलतेचे प्रमाण हे सुमारे ४ टक्क्यांनी वाढले आहे. मार्च २०१९ पूर्वी ज्या मुलांचे वजन सुमारे २५ किलो होते त्या मुलांमध्ये आता ७ ते १० किलो वजन वाढले असून ती आता ३२ ते ३५ किलो वजनाची झाली आहेत. वजन वाढणे हे कधीही घातक असून शरीराची त्यामुळे हानी होते, त्यासाठी तातडीने जंकफूड बंद करणे गरजेचे असून, आहाराच्या वेळा ठरवून घ्यायला हव्यात. अन्यथा लहान मुलांमध्येदेखील बीपी, शुगरसह अन्य आजार आढळून येतील, अशी गंभीर स्थिती आहे. हे वेळीच थांबवायचे असेल तर पालकांनी सतर्क व्हायला हवे, जे मागेल ते मुलांना खायला न देता, जे त्याना गरजेचे आहे ते देणे जास्त आवश्यक आहे. मुलांच्या स्थूलपणाला पालकदेखील काहीअंशी जबाबदार असल्याचे जाणकार सांगतात. पूर्वी कधीतरी बाहेरून खाद्यपदार्थ आणले जायचे आता मात्र सर्रास ते आणले जातात, त्याचे अपाय समोर येत असून ते चांगले नसल्याचे सांगण्यात आले.

-----------------------

जिल्ह्यातील कुपोषित बालके

कुपोषित - १४३४

कुपोषित असल्याने दगावली - ९९

--------------------

शहरांत स्थूलता ही नवी समस्या

अति खाणे, आवश्यकता नसताना खाणे, अवेळी खाणे या सोबतच शारीरिक हालचाल न करणे, जंकफूड जास्त प्रमाणात खाणे यामुळे स्थूलता वाढत आहे. खाण्याच्या वेळांमध्ये अंतर न ठेवणे, सकस आहार न घेणे आणि स्वच्छता, व्यायाम यासाठी आळस करण्यामुळे शहरी भागात स्थूलता दिसून येत आहे. सतत मोबाइल, संगणक, टॅब यामुळे शरीराची हालचाल नाही. त्यात बसल्या जागी नाश्ता, जेवण मिळते. त्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे वजन वाढते, असे दिसून आले आहे.

-----------------;--

मसालेदार खाणे, पिझ्झा, बर्गर, मांसाहार खाणे. दोन वेळच्या खाण्यात वेळेचे अंतर न ठेवणे. गरज नसताना खाणे. जेवताना टीव्ही, गेम खळेणे. कोणतेही शारीरिक कष्ट पडणारे खेळ न खेळणे यांसह सतत मोबाइल, संगणक, टॅब यामुळे एका जागी बसून काम करत रहाणे. या सर्व सवयींमुळे स्थूलता वाढत आहे. त्यासाठी पालकांनी सतर्क राहून मुलांना शारीरिक हालचाल करायला लावणे गरजेचे आहे. घरगुती व्यायाम करवून घ्यायला हवा. आठवड्यातून अपवाद वगळता बाहेरचे अन्नपदार्थ देऊ नयेत. सकस आहार द्यावा. बिट, गाजर, हिरव्या भाज्या, मुळा, कोशिंबीर आवर्जून खायला द्या. प्रथिन, कार्बेहायड्रेटसाठी मोड आलेली कडधान्ये पण द्यावीत. -

डॉ. कपिल मगरे, मुलांची वाढती स्थूलता विषयावरील तज्ज्ञ अभ्यासक.

-------------

पालकांचीही चिंता वाढली

लवकरात लवकर मुलांच्या शाळा सुरू व्हायला हव्यात. जेणेकरून त्यांची शारीरिक हालचाल वाढेल. बौद्धिक विकास होईल, एकाच ठिकाणी बसून शरीरावर होणारे अपाय कमी होतील. सतत मोबाइल, संगणक बघून डोळ्यांचे विकार होत आहेत, तसेच शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. डोकं दुखणे, डोळे दुखणे, शरीर अवजड होणे असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष द्यायला हवे.

- सुप्रिया कुलकर्णी, जागरूक पालक