शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

मलंग रोड गेला खड्ड्यांत

By admin | Updated: November 14, 2016 04:04 IST

पूर्वेतील चक्कीनाका ते मलंगगड या सात ते आठ किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे.

मुरलीधर भवार / कल्याणपूर्वेतील चक्कीनाका ते मलंगगड या सात ते आठ किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. या खड्ड्यांच्या डागडुजीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार या रस्त्याने मार्गक्रमण करणारे नागरिक व वाहनचालक करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत अंबरनाथ व कल्याण तालुक्यांतील २७ गावे १ जून २०१५ ला समाविष्ट करण्यात आली. या निर्णयामुळे कल्याण येथील चक्कीनाक्यापासून ते मलंगगडपर्यंतचा नेवाळीनाकामार्गे हा रस्ता महापालिकेत समाविष्ट झाला. या रस्त्याची हद्द मलंगगडपर्यंत असली तरी चक्कीनाका ते भालगावापर्यंत हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता महापालिका हद्दीत समाविष्ट झाला. २७ गावे महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित होता. बांधकाम खात्याने याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी २०१४ मध्ये एक कोटी ५६ लाख रुपये खर्च केला आहे. त्यासाठी निधी ‘नाबार्ड’ने दिला होता. रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी एक कोटी ९५ लाख रुपये खर्च होता. ‘नाबार्ड’ने दिलेल्या कर्जामुळे हा रस्ता तयार करण्यात आला. रस्ता बनवण्याचे कंत्राट साई सिद्धान्त कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. त्यांनी काम २०१५ मध्ये पूर्ण केले. परंतु, या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चूनही त्याची एक वर्षात वाट लागली आहे. हा रस्ता इतका खराब झाला आहे की, त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गळक्या पाणीपुरवठा वाहिन्यांमुळे काही खड्ड्यांमध्ये पाण्याचे तळ साचून चिखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदार कंपनीकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची हमी घेत नाहीत. त्यामुळे कंपनीने योग्य प्रकारे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्याची एका वर्षात वाट लागली आहे. आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्याने या विभागाला जाब विचारण्याचे कारण नाही. चक्कीनाका ते भालगावापर्यंतच्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने करणे अपेक्षित आहे. या रस्त्यावर पावसाळ्यादरम्यान प्रियंका फुलोरे या तरुणीचा दुचाकीवरून जात असताना मृत्यू झाला होता. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ती दुचाकीवरून पडली. त्यात ती एका गाडीखाली सापडून मरण पावली. तिच्या मृत्यूनंतर रस्ता चांगला करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. प्रत्यक्षात त्या आश्वासनाचा महापालिका प्रशासनास विसर पडलेला आहे.