शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

भाईंदर रेल्वे स्थानक बाहेर बेकायदा मुताऱ्यांचा महिला व पुरुष प्रवाश्याना जाच 

By धीरज परब | Updated: January 18, 2023 20:15 IST

एकीकडे स्वच्छतेच्या मोहिमा चालवल्या जात असताना भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस रेल्वे पुला खालच्या कोपऱ्यांचा वापर चक्क मुताऱ्या म्हणून केला

मीरारोड -

एकीकडे स्वच्छतेच्या मोहिमा चालवल्या जात असताना भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस रेल्वे पुला खालच्या कोपऱ्यांचा वापर चक्क मुताऱ्या म्हणून केला जात असल्याने सर्वसामान्य हजारो महिला व पुरुष प्रवाश्याना दुर्गंधी सहन करत मूत्रातून मार्ग काढावा लागत आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानकात ये - जा करण्यासाठी मध्यभागी रेल्वेचा मोठा जिना आहे . तर बालाजी नगर येथून आणखी एक नवीन रेल्वे पादचारी पुल बांधण्यात आला आहे .  ह्या दोन्ही पुलांचे जिने अरुंद चिंचोळ्या गल्लीत उतरतात . त्याच चिंचोळ्या गल्लीतून रोजचे हजारो प्रवासी ये जा करतात . परंतु मध्यभागी असलेल्या पुलाच्या लगत तसेच नवीन बांधलेल्या पुलाच्या जिन्या खालील कोपऱ्यात दिवस रात्र अनेक  निर्लज्ज प्रवासी हे उघडणपणे लघवी करत असतात . ठिकठिकाणी लघवी केली जात असल्याने त्याची दुर्गंधी ह्या संपूर्ण परिसरात पसरते . दुर्गंधी सहन करत वा नाकावर रुमाल बांधत महिला व पुरुष प्रवाश्याना रोजची ये - जा करावी लागते . 

बेकायदा मुताऱ्यांची दुर्गंधी तर सहन करावी लागतेच पण लघवीचा प्रवाह येण्या जाण्याच्या अरुंद गल्लीत पसरत असल्याने मूत्रातून कसाबसा मार्ग महिला व पुरुष प्रवाश्याना काढावा लागतो . रात्रीच्या वेळी तर गल्लीत सर्वत्र मूत्र पसरलेले असल्याने महिलांना घाणीतून चालणे उबग आणणारे ठरत आहे . 

या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही . तर जिन्या खालील कोपरे सुद्धा मोकळे असल्याने रात्रीच्या काळोखात तर सर्रास लघवी करणाऱ्या पासून मद्यपान आदी प्रकार सुद्धा चालतात . मध्यंतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने प्रवाश्याना ये - जा करणे त्रासाचे ठरत होते . दुचाकी आता बंद झाल्या असल्या तरी बेकायदा मुताऱ्यांचा जाच त्रासदायक ठरत आहे . 

रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा बल सह रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्या कडून ह्या बेकायदा मुताऱ्यांच्या गलिच्छ व जाचक प्रकारा कडे दुर्लक्ष केले जात असल्या बद्दल प्रवाश्यां कडून नाराजी व्यक्त होत आहे .  तर संबंधित बेजबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांसह लघवी करणाऱ्या लोकांवर कारवाई करा व परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी उपविभाग प्रमुख रविन्द्र भोसले यांनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर