शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

पत्रकारितेचा वसा श्वासाइतका सांभाळा

By admin | Updated: January 4, 2016 01:55 IST

‘डोळस माणसाला उजेड दाखिवते ती पत्रकारिता आणि हा वसा श्वासाइतकाच सांभाळावा लागतो’, असे सांगून बायलाईन प्रमाणेच आपली ‘लाईफ लाईन’ अखंड असावी,

ठाणे : ‘डोळस माणसाला उजेड दाखिवते ती पत्रकारिता आणि हा वसा श्वासाइतकाच सांभाळावा लागतो’, असे सांगून बायलाईन प्रमाणेच आपली ‘लाईफ लाईन’ अखंड असावी, अशी अपेक्षा कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केली. सिध्दी फ्रेण्ड्स पब्लिकेशनतर्फे साहित्यिक विनोद पितळे यांच्या ‘बायलाईन व आयटम’ या कोळीगीतांच्या आॅडिओ सीडीचे प्रकाशनावेळी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ते बागवे बोलत होते. यावेळी अक्षर सिध्दी नववर्ष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बागवे यांनी पत्रकार हे खुप क्रिएटिव्ह असतात; परंतु कारंज्याला जसे कुंपण असते तसेच पत्रकाराला वेळेची, शब्दांची मर्यादा असते. त्यामुळे एखाद्या कलाकाराप्रमाणे त्याला चिंतन करता येत नसल्याचे सांगून पत्रकाराला प्रतिभा आणि प्रज्ञा म्हणजेच बुद्धीचा वापर एकाचवे ळी करता येतो. याचे कौतुक आम्हा कलाकरांना वाटते, असेही बागवे यांनी नमूद केले. कुसुमाग्रज हे देखील पत्रकार होते आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे रात्रपाळीची पत्रकारिता करताना सुचले होते, ही आठवण त्यांनी सांगितली. मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी नवीन पत्रकारांनी अवतीभवती चौकसपणे बघावे आणि संतासारखे वागू नये, असा सल्ला दिला.यावेळी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी पर्यावरणाचा व्हास होऊ नये यासाठी सरकारकडे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला कसाब भारतात येणार असल्याचे चार दिवसापूर्वीच कळले होते आणि तसे निरोपही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना देण्यात आले होते. तरीही याकडे दुर्लक्ष केले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोळी समाज मुंबईतून हद्दपार झाला तर मुंबई उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, संगीतकार मंगेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.