शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

"अंगावर आलेले केंद्राच्या माथी मारण्याची महाविकास आघाडीची भूमिका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 23:57 IST

सत्ताधाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा चुकीचा

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, एखादा मुद्दा अंगावर आल्यास तो केंद्र सरकारच्या माथी मारण्याची भूमिका त्यांच्याकडून घेतली जात असल्याची उपरोधिक टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. त्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावाखाली जे आंदोलन सुरू आहे ते मुळात त्यांच्याविरोधात असून राज्यातील सत्ताधारी याला पाठिंबा देतात हे दुर्दैवी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना भाज्या, फळे यांची थेट विक्री करता येत होती. शेतकऱ्यांचा फायदा होत होता. ग्राहकांना रास्त भावात शेतीमाल मिळत होता. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची दलालांच्या कचाट्यातून मुक्तता होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार या विधेयकाला विरोध करीत आहे. पण मुळात हे सरकार सत्तेवर येताच त्यांनी एपीएमसीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा हक्क हिरावला. या विधेयकातील आक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा करणे गरजेचे असताना, ते रद्द करा ही भूमिका काहींची आहे. एपीएमसीत आज शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांचे शोषण थांबेल, असे ते म्हणाले.या वेळी भाजपचे राज्य सचिव संदीप लेले, विलास साठे आणि मनोहर सुगदरे उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपा