शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

`मजबुरी नाही तर मजबुती का नाम महात्मा गांधी!’ हे पटवून देणारे नाटक, ‘गांधी: अंतिम पर्व’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 17:03 IST

‘गांधी: अंतिम पर्व’ मधून `मजबुरी नाही तर मजबुती का नाम महात्मा गांधी!’ हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.   

ठळक मुद्दे`मजबुरी नाही तर मजबुती का नाम महात्मा गांधी!’ हे पटवून देणारे नाटक ‘गांधी: अंतिम पर्व’अभिवाचनानंतरच्या चर्चेत अनेक नामवंत मान्यवर सहभागी

ठाणे : " गांधी अंतिम पर्व या गांधीजींवरील नाटकाच्या प्रभावी अभिवाचनाने तो काळ रत्नाकर मतकरी व त्यांच्या सह - कलाकारांनी डोळ्यासमोर जीवंत उभा केला. गांधीविचार आजच्या काळातही तितकेच लागू आहेत, हे ही यातून स्पष्ट  झालं. आणि मुख्य म्हणजे, मजबुरी का नाही तर मजबुती का नाम है महात्मा गांधी, हे अधोरेखित झालं", अशा शब्दात प्रसिद्ध लेखिका प्रा. वृषाली विनायक यांनी गांधीजींवरील नाट्य वाचनाचा समारोप केला. समता विचार प्रसारक संस्था, विद्यादान सहायता मंडळ आणि जाग, ठाणे यांनी संयुक्त विद्यमाने ‘महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त’ आयोजित रत्नाकर मतकरी यांच्या ‘गांधी: अंतिम पर्व’ नाटकाचे स्वतः रत्नाकर मतकरी व सहका-यांच्या नाट्य अभिवाचनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

      "सत्याचा, नीतीमत्तेचा, न्यायाचा, अहिंसेचा पुजारी - महात्मा गांधीजींना देशाच्या फाळणीला आणि त्यावेळी देशात झालेल्या हिंसेला जबाबदार धरण्यात आले. धर्म हा मानवासाठी निर्माण झाला आहे. पण धर्मांच्या कडवट अतिरेकाने मानवाचाच अंत होत आहे. अल्पसंख्यांकांचे रक्षण करणे हे देशाचे कर्तव्य आहे. अशी भूमिका मांडणा-या महात्मा गांधींविषयीच्या अनेक पथदर्शक आणि मानवतावादी विधानांनी ओतप्रोत भरलेल्या जेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या, संपूर्णपणे सत्यावर आधारित नव्या कोर्‍या ‘गांधी: अंतिम पर्व’ या दोन अंकी नाटकाचे स्वतः रत्नाकर मतकरी यांनी केलेले अभिवाचन काल ठाण्यात संपन्न झाले. त्यांच्याबरोबर संजीव तांडेल, अपूर्वा परांजपे, रोहित मावळे, आदित्य कदम, दिप्ती दांडेकर आणि वंचितांच्या रंगमंचाचे अभिषेक साळवी आणि योगेश खांडेकर या त्यांच्या युवा साथीदारांनी अतिशय प्रभावी अभिवाचन सादर केले. गांधींनी दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये घालवलेल्या शेवटच्या काही दिवसात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी यावर हे नाटक रचलेले आहे. फाळणीनंतर झालेल्या हिंसाचाराने व्यथित होवून तो थांबवण्यासाठी प्राणांतिक उपोषण करणारे गांधीजी,  त्यांना पाकिस्तानास अनुकूल आणि फाळणीस जबाबदार धरणार्‍या कट्टर हिंदू, मुस्लिम आणि शीख यांच्या रोषास प्राप्त झालेले गांधीजी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये फूट पडू नये म्हणून झटणारे गांधीजी, सामजिक ऐक्य, शांतता नसेल तर स्वातंत्र्य मिळूनही आपण गुलामगिरीतच आहोत असे मानणारे गांधीजी या अभिवाचनाच्या अप्रतिम सादरीकरणातून श्रोत्यांपुढे सजीव होवून आले आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून खिळवून ठेवले.

अभिवाचनानंतरच्या चर्चेत अनेक नामवंत मान्यवर सहभागी

         अभिवाचनानंतर झालेल्या चर्चेच्या वेळी सुप्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले की, ‘या स्तुत्य प्रयोगाने सर्वजण भारावून गेलेत. गांधीजींच्या विचारात आणि आचारात  असलेली शांतता, बाहेर चालू असलेल्या हिंसाचाराच्या आणि गांधींविरूद्ध रचल्या जाणार्‍या कट कारस्थानाच्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, ठळकपणे मनावर बिंबते. मतकरींनी आपल्या लेखणीतून आणि आवाजातून गांधी त्यांच्या शब्दांनी आमच्यापर्यंत पोहचवला. हे नुसतं अभिवाचन नसून गांधीजींना केलेले अभिवादन आहे!’ यावेळी नामवंत लेखक प्रा. प्रवीण दवणे म्हणाले,’ गांधी हा एक विचार आहे, आणि तो या अभिवाचनातून प्रखरपणे समोर येतो, त्यामुळे मनन चिंतन करण्यास प्रवुत्त करणार्‍या या प्रयोगाकडे वैचारिक स्वातंत्र्याची चळवळ म्हणून पहायला हवे. या उत्कृष्ट अभिवाचनात शब्द तर बोलतातच पण कोर्‍या जागाही बोलतात. मतकरींनी गांधीजींचं मन साध्या सरळ शब्दात अचूक मांडलं आहे,’  प्रसिद्ध नाट्य - चित्रसमीक्षक प्रा. संतोष पठारे यांनी या नाटक लिहिण्यामागची प्रेरणा काय आहे असे विचारता, मतकरी म्हणाले, महात्मा गांधी या व्यक्तिमत्वावर अतिशय प्रेम करणारे आहेत तसेच त्यांचा अतिशय द्वेष करणारे लोकही आहेत. लोकांमध्ये विशेषतः आजच्या तरुण पिढीमधील गांधीजींबद्दलचे गैरसमज दूर व्हावे आणि सत्य लोकांपुढे यावे हा हेतु हे नाटक लिहिण्यामागे आहे. प्रीती छत्रे, भारती पाटणकर, शिवाजी पवार आदींनीही चर्चेत भाग घेतला.  

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता विचार प्रसारक संस्था व जागचे जगदीश खैरालिया यांनी केले. ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेल्या या प्रयोगाला वंदना शिंदे, साहित्यिक सुनील कर्णिक, सतीश चाफेकर, ज्योती भारती, डॉ. गिरीश साळगावकर, अनूपकुमार प्रजापती, गीता शाह, जयंत कुलकर्णी, अतुल गोरे, सुभाष तंवर, महेंद्र मोने, माधवी जोग, स्नेहा शेडगे,शिवाजी पवार, शुभानन आजगावकर, अरविंद परूळेकर, सचीन वेलिंग आदि मान्यवर उपस्थित होते.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थांचे कार्यकर्ते सुनील दिवेकर, अजय भोसले, लतिका सु.मो., मनीषा जोशी, अनुजा लोहार, प्रवीण खैरालिया आदींनी विशेष मेहनत घेतली, असे समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक