शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

ब्रह्मदेवाने साकारला गांधींचा जीवनपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 3:59 AM

भार्इंदर - येथील स्थानिक व जागतिक स्तरावरील कुंभारकलेत पारंगत असलेले पद्मश्री पुरस्कारविजेते ब्रह्मदेव पंडित यांनी बिहारच्या पाटणा येथील गांधी सभागृहात सिरॅमिक म्युरलद्वारे गांधीजींचा जीवनपट साकारला.

- राजू काळेभार्इंदर - येथील स्थानिक व जागतिक स्तरावरील कुंभारकलेत पारंगत असलेले पद्मश्री पुरस्कारविजेते ब्रह्मदेव पंडित यांनी बिहारच्या पाटणा येथील गांधी सभागृहात सिरॅमिक म्युरलद्वारे गांधीजींचा जीवनपट साकारला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांचा विशेष सत्कार करून तेथील सरकारी इमारतींत अशाच प्रकारच्या कलाकृती साकारण्याचे आमंत्रण दिले.बिहारमध्ये सध्या चंपारण सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्याअनुषंगाने तेथील सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार २०१७ मध्ये मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आले असता त्यांची ब्रह्मदेव यांच्याशी भेट झाली. ब्रह्मदेव हे सुद्धा मूळचे बिहारमधील नवादा गया येथील रहिवासी असून त्यांचा जन्म कुंभार कुटुंबात झालेला आहे. पिढीजात कुंभार व्यवसायात नावीण्यपूर्ण कलाकृती साकारल्याने त्यांना १९७० मध्ये बिहारमधीलच लोकनेता जयप्रकाश नारायण आश्रमाद्वारे विशेष शिष्यवृत्ती देण्यात येऊन मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेव्हापासून त्यांनी कुंभार व्यवसायात वेगवेगळ्या आकर्षक कलाकृती साकारून त्या जागतिक स्तरावर पोहोचवल्या. त्यांच्या या कलाकृतींची दखल घेत त्यांना २०१५ मध्येभारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले. त्यांच्या कलाकृती राष्टÑपती भवनातील म्युझियममध्येसुद्धा पाहावयास मिळतात. त्यांच्या या कलाकृतीमुळेच नितीशकुमार यांनी त्यांना बिहारमध्ये आमंत्रित करून पाटणामधील एका सरकारी इमारतीतील गांधी सभागृहात म्युरल साकारण्यास सांगितले. त्यानुसार, ब्रह्मदेव यांनी आपला मुलगा अभय यांच्या मदतीने सुमारे ८ ते ११ महिन्यांत गांधीजींचा जीवनपट सिरॅमिकच्या तीन म्युरलवर साकारला. त्यात गांधीजींनी आपल्या आयुष्यात वापरलेला चरखा, पेन, रेल्वेगाडीतील प्रवास, पादत्राणे अशा साहित्यांसह त्यांच्यावर प्रभाव पाडणारे विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण या महापुरुषांच्या छबी व सत्याग्रहाच्या कलाकृती साकारल्या आहेत.या कलाकृतींनी प्रभावित होऊन नितीशकुमार यांनी ब्रह्मदेव यांचा पाटणा येथील एका कार्यक्रमात विशेष सत्कार करून पुन्हा बिहारमध्ये सरकारी इमारतींत बिहारच्या संस्कृतीच्या कलाकृती साकारण्याचे निमंत्रण दिले आहे.चंपारणमध्ये सत्याग्रहब्रिटिश राजवटीत बिहारमधील चंपारणमध्ये नीळ या द्रवपदार्थाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात होते. त्यासाठी ब्रिटिश सरकार स्थानिक शेतकऱ्यांवर त्याच्या शेतीसाठी शेतकºयांवर जबरदस्ती करत होते. यामुळे सुपीक शेतजमीन नापीक होऊ लागल्याने ब्रिटिशांच्या या जाचाविरोधात गांधीजींनी चंपारणमध्ये सत्याग्रह सुरू केला. त्याअनुषंगाने नीळयुक्त हिरव्या रंगात म्युरल साकारल्याचे ब्रह्मदेव यांनी सांगितले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीthaneठाणे