शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Vidhan Sabha 2019: खर्चाचा तपशील दिला नाही तर आमदारकी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:22 IST

तीन वर्षे निवडणूक लढवण्यासही अपात्र; २८ लाखांपर्यंत खर्चाची मुभा

ठाणे : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लाखांपर्यंत खर्च करण्याची अनुमती आहे. या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा तसेच निवडणूक खर्चाची माहिती विहित मुदतीमध्ये निवडणूक यंत्रणेकडे द्यावी. अन्यथा, जिंकून आलेला उमेदवारही अपात्र ठरू शकतो. तसेच त्याला तीन वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यालाही प्रतिबंध येऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी मुदतीत आणि दिलेल्या वेळेतच निवडणूक विभागाकडे खर्चाची माहिती देण्याचे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या खर्चाचा लेखाजोखा उमेदवारांना जिल्हा निवडणूक विभागास देणे बंधनकारक आहे. प्रत्येक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून प्रतिदिवसाचा खर्च दिलेल्या नमुन्यामध्ये नोंदून ठेवायचा आहे. उमेदवाराला निवडणुकीसाठी २८ लाखांच्या खर्चाची मर्यादा आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. उमेदवाराने ते नामनिर्देशनापूर्वी उघडणे आवश्यक असून त्याचा क्र मांक नामनिर्देशन भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. तसेच निवडणूकविषयक सर्व खर्च याच खात्यातून करणेही अपेक्षित आहे.उमेदवाराकडून कोणत्याही एका व्यक्तीस अथवा संस्थेस निवडणूक प्रक्रि येदरम्यान देय रक्कम १० हजारांपेक्षा अधिक असल्यास धनादेश अथवा धनाकर्ष किंवा बँक ट्रान्सफरनेच करता येणार आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी आलेल्या सर्व रकमा या खात्यात जमा करणे आणि सर्व निवडणूक खर्च त्याच खात्यातून करणे अपेक्षित आहे. उमेदवार जी रक्कम रोखीने खर्च करणार आहे, ती रक्कम प्रथम बँकेतून काढणे आवश्यक आहे. रोखीने केलेल्या व्यवहाराची नोंद उमेदवाराच्या बँक नोंदवही तसेच रोख नोंदवहीमध्ये घेणे आवश्यक आहे. जर उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत खर्चाचा तपशील सादर न केल्यास तीन वर्षांसाठी संबंधित उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतो.खर्च निवडणूक निरीक्षकांची करण्यात आली नियुक्तीउमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सहा खर्च निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तीन विधानसभा मतदारसंघासाठी एक याप्रमाणे सहा खर्च निवडणूक निरीक्षक काम पाहणार आहेत. यामध्ये विवेकानंद यांची १३४-भिवंडी ग्रामीण, १३६-भिवंडी पश्चिम आणि १३७-भिवंडी पूर्वसाठी नियुक्ती झाली आहे. तर, आशीष चंद्र मोहंती यांची १३५- शहापूर, १३८-कल्याण पश्चिम आणि १३९-मुरबाडच्या निरीक्षकपदी नियुक्ती आहे. एस.आर. कौशिक यांची १४०-अंबरनाथ, १४१-उल्हासनगर आणि १४२-कल्याण (पूर्व) या तीन मतदारसंघांसाठी नियुक्ती असून शिवस्वरूप सिंग यांची १४३-डोंबिवली, १४४- कल्याण ग्रामीण आणि १४८- ठाणे या मतदारसंघासाठी नियुक्ती आहे. याशिवाय, उमेश पाठक १४५- मीरा-भार्इंदर, १४६-ओवळा-माजिवडा आणि १४७- कोपरी- पाचपाखाडी, तर के. रमेश यांची १४९-मुंब्रा-कळवा, १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.खर्चाच्या नोंदीसाठी छायानोंदवहीजिल्हा निवडणूक यंत्रणेकडूनसुद्धा प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची छायानोंदवही (शॅडो रजिस्टर) तयार केली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही नोंदींमध्ये तफावत नसावी. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या सर्व खर्चाच्या नोंदी अचूकपणे निवडणूक यंत्रणेला सादर कराव्यात. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी खर्चाची माहिती वेळोवेळी निवडणूक यंत्रणेला सादर करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.निवडणूक निकालानंतर एक महिन्यातच खर्च निरीक्षकांकडून उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचा तपशील काटेकोरपणे तपासला जाईल. त्यात जर तफावत आढळली, तर संबंधित उमेदवाराला आधी नोटीस बजावली जाईल. त्याने त्याचा योग्य तपशील न दिल्यास मात्र त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. शिवाय, तो तीन वर्षे निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरू शकतो.- राजेश नार्वेकर, जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019