शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ठाणे जिल्ह्यात 13 मतदारसंघाची मतदानात घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 21:45 IST

राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते.

- नारायण जाधवठाणे : राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून येथील एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीत दिवसेंदिवस घट होतांना दिसत आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून पथनाटय़, मॅरेथॉन स्पर्धासह चित्रकला, स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांद्वारे जनजागृती केली. मात्र, तरीही यंदाही जिल्ह्यातील 18 पैकी 13 मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 2014 च्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घटले आहे.अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाशी तुलना केली तरी विधानसभेकरिता मतदानात दीड टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 8.96 टक्क्यांची घसरगुंडी ऐरोली मतदारसंघात झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत सर्वात कमी घट शहापूर मतदारसंघात 0.90 टक्के आहे. विशेष म्हणजे सर्वच मतदारसंघात गेल्या खेपेपेक्षा मतदारांची संख्या वाढूनही मतदानाच्या टक्केवारीत ही गंभीर घट झाली आहे. जिल्ह्यात मतदानात वाढ झालेल्या पाच मतदारसंघात सर्वात चांगली वाढ उल्हासनगरात 8.67 टक्के इतकी आहे.जिल्ह्यात बहुभाषिकतेसह उत्तुंग इमारतींचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणा:या ओवळा-माजीवडय़ातही गेल्या वेळच्या तुलनेत 7.34 टक्के तर भिवंडी ग्रामीण सारख्या निमशहरी पट्टय़ातही ती 6.64 टक्के इतकी झाली आहे. डोंबिवली, बेलापूर, मुरबाड, मीरा-भाईंदर सारख्या मतदारसंघातही तिने गेल्या वेळेपेक्षा चार टक्क्याहून अधिकची घसरगुंडी नोंदविली आहे.जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व,  अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा मुंब्रा या पाच मतदारसंघातील मतदान तेवढे वाढले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात एक लाख पाच हजार 610 मतदारांची वाढ होऊन विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 63 लाख 29 हजार मतदारांची नोंद झाली होती. यातून 60 ते 65 टक्के मतदानाची अपेक्षा जिल्हा प्रशासाने व्यक्त केली होती. मात्र, सलग तीन दिवस आलेली सुटी, मतदारांचे झालेल स्थलांतर ही प्रमुख कारण मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या घसरणीमागे असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. यात ऐरोलीत माथाडी कामगार, कल्याण-डोबिवलीत औद्योगिक तर भिवंडीत लूम कामगारांनी स्थलांतर केल्याने टक्का घसरल्याचा दावा जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी व्यक्त केला.

ठाणे जिल्हा -एकूण जागा -18घट 13 मतदारसंघवाढ 5 मतदारसंघ  मतदारसंघ                              2014         2019                              घट/वाढ134  भिवंडी ग्रामीण                 66.24         59.60                      6.64 टक्के घट135  शहापूर .                          65.70         64.80                     0.90 टक्के घट136 भिवंडी पश्चिम                   49.58         50.32                      0.74 टक्के वाढ137 भिवंडी पूर्व                       44.30         47.81                       3.51 टक्के वाढ138 कल्याण पश्चिम                 44.92         41.74                        3.18  टक्के घट139 मुरबाड                          63.17          58.36                         4.81 टक्के घट140 अंबरनाथ                       39.71        42.32                           2.61 टक्के वाढ141 उल्हासनगर                   38.22        46.89                          8.67 टक्के वाढ142 कल्याण पूर्व                  45.19        43.55                            1.64 टक्के घट143 डोंबिवली                       44.74      40.72                            4.02 टक्के घट144 कल्याण ग्रामीण             47.94        46.37                           1.57 टक्के घट145 मीरा-भाईंदर                52.66        48.38                           4.28 टक्के घट146 ओवळा-माजीवडा        50.31        42.97                           7.34 टक्के घट147 कोपरी-पाचपाखाडी     53.10        49.09                           4.0 टक्के घट148 ठाणे                            56.56      52.47                             4.09 टक्के  घट 149 मुंब्रा-कळवा               47.48       49.96                            2.48 टक्के वाढ150  ऐरोली                       51.47          42.51                          8.96 टक्के घट151 बेलापूर                      49.69              45.16                      4.53 टक्के घट

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे