शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ठाणे जिल्ह्यात 13 मतदारसंघाची मतदानात घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 21:45 IST

राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते.

- नारायण जाधवठाणे : राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून येथील एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीत दिवसेंदिवस घट होतांना दिसत आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून पथनाटय़, मॅरेथॉन स्पर्धासह चित्रकला, स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांद्वारे जनजागृती केली. मात्र, तरीही यंदाही जिल्ह्यातील 18 पैकी 13 मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 2014 च्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घटले आहे.अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाशी तुलना केली तरी विधानसभेकरिता मतदानात दीड टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 8.96 टक्क्यांची घसरगुंडी ऐरोली मतदारसंघात झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत सर्वात कमी घट शहापूर मतदारसंघात 0.90 टक्के आहे. विशेष म्हणजे सर्वच मतदारसंघात गेल्या खेपेपेक्षा मतदारांची संख्या वाढूनही मतदानाच्या टक्केवारीत ही गंभीर घट झाली आहे. जिल्ह्यात मतदानात वाढ झालेल्या पाच मतदारसंघात सर्वात चांगली वाढ उल्हासनगरात 8.67 टक्के इतकी आहे.जिल्ह्यात बहुभाषिकतेसह उत्तुंग इमारतींचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणा:या ओवळा-माजीवडय़ातही गेल्या वेळच्या तुलनेत 7.34 टक्के तर भिवंडी ग्रामीण सारख्या निमशहरी पट्टय़ातही ती 6.64 टक्के इतकी झाली आहे. डोंबिवली, बेलापूर, मुरबाड, मीरा-भाईंदर सारख्या मतदारसंघातही तिने गेल्या वेळेपेक्षा चार टक्क्याहून अधिकची घसरगुंडी नोंदविली आहे.जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व,  अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा मुंब्रा या पाच मतदारसंघातील मतदान तेवढे वाढले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात एक लाख पाच हजार 610 मतदारांची वाढ होऊन विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 63 लाख 29 हजार मतदारांची नोंद झाली होती. यातून 60 ते 65 टक्के मतदानाची अपेक्षा जिल्हा प्रशासाने व्यक्त केली होती. मात्र, सलग तीन दिवस आलेली सुटी, मतदारांचे झालेल स्थलांतर ही प्रमुख कारण मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या घसरणीमागे असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. यात ऐरोलीत माथाडी कामगार, कल्याण-डोबिवलीत औद्योगिक तर भिवंडीत लूम कामगारांनी स्थलांतर केल्याने टक्का घसरल्याचा दावा जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी व्यक्त केला.

ठाणे जिल्हा -एकूण जागा -18घट 13 मतदारसंघवाढ 5 मतदारसंघ  मतदारसंघ                              2014         2019                              घट/वाढ134  भिवंडी ग्रामीण                 66.24         59.60                      6.64 टक्के घट135  शहापूर .                          65.70         64.80                     0.90 टक्के घट136 भिवंडी पश्चिम                   49.58         50.32                      0.74 टक्के वाढ137 भिवंडी पूर्व                       44.30         47.81                       3.51 टक्के वाढ138 कल्याण पश्चिम                 44.92         41.74                        3.18  टक्के घट139 मुरबाड                          63.17          58.36                         4.81 टक्के घट140 अंबरनाथ                       39.71        42.32                           2.61 टक्के वाढ141 उल्हासनगर                   38.22        46.89                          8.67 टक्के वाढ142 कल्याण पूर्व                  45.19        43.55                            1.64 टक्के घट143 डोंबिवली                       44.74      40.72                            4.02 टक्के घट144 कल्याण ग्रामीण             47.94        46.37                           1.57 टक्के घट145 मीरा-भाईंदर                52.66        48.38                           4.28 टक्के घट146 ओवळा-माजीवडा        50.31        42.97                           7.34 टक्के घट147 कोपरी-पाचपाखाडी     53.10        49.09                           4.0 टक्के घट148 ठाणे                            56.56      52.47                             4.09 टक्के  घट 149 मुंब्रा-कळवा               47.48       49.96                            2.48 टक्के वाढ150  ऐरोली                       51.47          42.51                          8.96 टक्के घट151 बेलापूर                      49.69              45.16                      4.53 टक्के घट

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे