शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Vidhan sabha 2019 : एकमेकांना जोखण्याची युतीमध्ये लागली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 00:49 IST

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असला तरी भाजपची स्थानिक मंडळी मतदारसंघावर दावा करीत आहेत. अंबरनाथ मतदारसंघ आम्ही मागितला असल्याचे मीडियाला वरचेवर सांगण्यामागे शिवसेनेवरील दबाव वाढवणे हाच हेतू आहे. कदाचित संपूर्ण राज्यभर हेच दबावतंत्र भाजप राबवत असू शकते.

- पंकज पाटीलअंविधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र गेल्या विधानसभेत युती तुटल्याने शिवसेना आणि भाजप यांना स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत लढत जोरदार झाली. मात्र विजय हा शिवसेनेचाच झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती निश्चित मानली जात असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल हे उघड आहे. मात्र भाजपचे स्थानिक पुढारी शिवसेनेच्या विरोधात जाऊन उमेदवारीचा दावा करीत आहेत. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचा आमदार असतांनाही उमेदवारीसाठी चर्चा मात्र भाजपची होतांना दिसत आहे.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा शिवसेनेचे डॉ. बालाज किणीकर यांचा विजय झाला आहे. पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र असे असतांनाही भाजप अंबरनाथसाठी जोर लावत आहे. गेल्या निवडणुकीतील काँटे ेकी टक्करचा संदर्भ देत अंबरनाथवर दावा केला आहे. अर्थात भाजपचा हा दावा पक्ष श्रेष्ठीकडे कमी पत्रकारांकडे जास्त केला जात आहे.पत्रकार परिषदेत आग ओकणारे स्थानिक पुढारी वैयक्तिक गप्पांमध्ये युतीचा धर्म पाळावाच लागेल अशी भूमिका मांडत आहेत. अंबरनाथ विधानसभेची कोअर कमिटी उमेदवारीचा आपला दावा अद्याप धरुन आहे. भाजपकडे भक्कम उमेदवार नसला तरी इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यातच गेल्या वर्षभरापासून उमेदवारीसाठी काम करणारे सुमेध भवार यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. जागा सुटली तर उमेदवारी त्यांना मिळेल असे निश्चित मानले जात आहे.मात्र जागाच सुटली नाही तर भवार यांच्यावरही पक्षादेश बंधनकारक असेल. भाजपची मंडळी ज्या पद्धतीने केवळ मीडियाकडे दावे करीत आहे ते पाहता ठिकठिकाणी शिवसेनेवरील दबाव वाढवण्याची ही भाजपची खेळी असावी. जागावाटपात शिवसेनेनी नमते घ्यावे याकरिता भाजपने ही खेळी खेळली असावी.उमेदवारीवरील दाव्याच्या नादात अंबरनाथची भाजप आपली ताकद शिवसेनेला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र शिवसेनेत सारे आलबेल नाही. त्यांच्यातील अंतर्गत नाराजीमुळे भाजपला ठोस उत्तर दिले जात नाही. वरिष्ठ पातळीवर शिवसेना आणि भाजप जमवून घेत असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात बोलतांना दिसतात.शिवसेनेकरिता भाजपची वाढती ताकद हीच अडचणीचा मुद्दा ठरत आहे. परंतु भाजपला रोखण्यासाठी कोणतीच व्यूहरचना शिवसेनेकडे दिसत नाही. परिणामी भाजपचे स्थानिक नेते शिवसेनेला उघडपणे आव्हान देत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत युती झाली तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली दरी त्रासदायक ठरु शकते. सध्या विरोधक इतके दुर्बळ झाले आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील सुंदोपसुंदीचा ते फायदा उठवू शकत नाहीत.युतीचा धर्म पाळण्याची वेळ आल्यावर शिवसेना उमेदवाराकडून योग्य मान मिळावा यासाठी भाजपचे पदाधिकारी विरोधाची भूमिका घेऊन दबाव वाढवत आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसेना, भाजपमध्ये एकमेकांची ताकद जोखण्याची चुरस सुरु असल्याने अंबरनाथ हेही त्यास अपवाद नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ