शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Vidhan sabha 2019 : एकमेकांना जोखण्याची युतीमध्ये लागली स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 00:49 IST

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असला तरी भाजपची स्थानिक मंडळी मतदारसंघावर दावा करीत आहेत. अंबरनाथ मतदारसंघ आम्ही मागितला असल्याचे मीडियाला वरचेवर सांगण्यामागे शिवसेनेवरील दबाव वाढवणे हाच हेतू आहे. कदाचित संपूर्ण राज्यभर हेच दबावतंत्र भाजप राबवत असू शकते.

- पंकज पाटीलअंविधानसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मात्र गेल्या विधानसभेत युती तुटल्याने शिवसेना आणि भाजप यांना स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत लढत जोरदार झाली. मात्र विजय हा शिवसेनेचाच झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती निश्चित मानली जात असल्याने ही जागा शिवसेनेलाच जाईल हे उघड आहे. मात्र भाजपचे स्थानिक पुढारी शिवसेनेच्या विरोधात जाऊन उमेदवारीचा दावा करीत आहेत. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचा आमदार असतांनाही उमेदवारीसाठी चर्चा मात्र भाजपची होतांना दिसत आहे.अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा शिवसेनेचे डॉ. बालाज किणीकर यांचा विजय झाला आहे. पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र असे असतांनाही भाजप अंबरनाथसाठी जोर लावत आहे. गेल्या निवडणुकीतील काँटे ेकी टक्करचा संदर्भ देत अंबरनाथवर दावा केला आहे. अर्थात भाजपचा हा दावा पक्ष श्रेष्ठीकडे कमी पत्रकारांकडे जास्त केला जात आहे.पत्रकार परिषदेत आग ओकणारे स्थानिक पुढारी वैयक्तिक गप्पांमध्ये युतीचा धर्म पाळावाच लागेल अशी भूमिका मांडत आहेत. अंबरनाथ विधानसभेची कोअर कमिटी उमेदवारीचा आपला दावा अद्याप धरुन आहे. भाजपकडे भक्कम उमेदवार नसला तरी इच्छुकांची संख्या कमी नाही. त्यातच गेल्या वर्षभरापासून उमेदवारीसाठी काम करणारे सुमेध भवार यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. जागा सुटली तर उमेदवारी त्यांना मिळेल असे निश्चित मानले जात आहे.मात्र जागाच सुटली नाही तर भवार यांच्यावरही पक्षादेश बंधनकारक असेल. भाजपची मंडळी ज्या पद्धतीने केवळ मीडियाकडे दावे करीत आहे ते पाहता ठिकठिकाणी शिवसेनेवरील दबाव वाढवण्याची ही भाजपची खेळी असावी. जागावाटपात शिवसेनेनी नमते घ्यावे याकरिता भाजपने ही खेळी खेळली असावी.उमेदवारीवरील दाव्याच्या नादात अंबरनाथची भाजप आपली ताकद शिवसेनेला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र शिवसेनेत सारे आलबेल नाही. त्यांच्यातील अंतर्गत नाराजीमुळे भाजपला ठोस उत्तर दिले जात नाही. वरिष्ठ पातळीवर शिवसेना आणि भाजप जमवून घेत असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात बोलतांना दिसतात.शिवसेनेकरिता भाजपची वाढती ताकद हीच अडचणीचा मुद्दा ठरत आहे. परंतु भाजपला रोखण्यासाठी कोणतीच व्यूहरचना शिवसेनेकडे दिसत नाही. परिणामी भाजपचे स्थानिक नेते शिवसेनेला उघडपणे आव्हान देत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत युती झाली तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली दरी त्रासदायक ठरु शकते. सध्या विरोधक इतके दुर्बळ झाले आहेत की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील सुंदोपसुंदीचा ते फायदा उठवू शकत नाहीत.युतीचा धर्म पाळण्याची वेळ आल्यावर शिवसेना उमेदवाराकडून योग्य मान मिळावा यासाठी भाजपचे पदाधिकारी विरोधाची भूमिका घेऊन दबाव वाढवत आहेत. राज्यात ठिकठिकाणी शिवसेना, भाजपमध्ये एकमेकांची ताकद जोखण्याची चुरस सुरु असल्याने अंबरनाथ हेही त्यास अपवाद नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ambernath-acअंबरनाथ