शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

Vidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 06:02 IST

Maharashtra Assembly Election 2019 युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे.

ठाणे : युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लेखी करार होऊनही भाजपने शब्द पाळला नाही. रिपाइंला सत्तेत १० टक्के वाटा दिला नाही. यंदा भाजप-सेनेची युती झाल्यास पक्षाला २३ जागा आणि युती झाली नाही तर ५० जागा देण्याची मागणी करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १० जागांवरही रिपाइं पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दावा केला.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने भाजपसोबत युती केल्याने भाजपला मागासवर्गीयांजवळ जाण्याची संधी मिळाली आहे. देशभरातील मागासवर्गीयांचे पक्ष भाजपजवळ जात आहेत. आठवले भाजपसोबत गेल्यानंतर मागासवर्गीयांचे नेते रामविलास पासवान, धनगरांचे नेते महादेव जानकर आदी भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे भाजपने रिपाइंला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे सांगून बारशिंग यांनी राज्यात २३ जागांची मागणी केली.सेना-भाजप युती झाली नाही तर, भाजपने रिपाइंला ५० जागा सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपसोबत लेखी करार झाला असतानाही, तो करार पाळत नाहीत, याची खंत वाटत असल्याचेही ते म्हणाले.बुधवारी सायंकाळी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे, नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ, भिवंडी अध्यक्ष महेंद्र गायकवाड, बाळाराम गायकवाड, महिला आघाडीच्या मनीषा करलाद, आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, ऐरोली आदी जागांवर रिपाइंने दावा केला आहे. नालासोपारा मतदारसंघाचीही जागा या पक्षाने मागितली आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019