शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

Vidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 06:02 IST

Maharashtra Assembly Election 2019 युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे.

ठाणे : युतीत आणि सत्तेत असतानाही रिपाइंला सन्मानाचा वाटा मिळत नाही, ही कार्यकर्त्यांची खंत आहे. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लेखी करार होऊनही भाजपने शब्द पाळला नाही. रिपाइंला सत्तेत १० टक्के वाटा दिला नाही. यंदा भाजप-सेनेची युती झाल्यास पक्षाला २३ जागा आणि युती झाली नाही तर ५० जागा देण्याची मागणी करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १० जागांवरही रिपाइं पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दावा केला.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने भाजपसोबत युती केल्याने भाजपला मागासवर्गीयांजवळ जाण्याची संधी मिळाली आहे. देशभरातील मागासवर्गीयांचे पक्ष भाजपजवळ जात आहेत. आठवले भाजपसोबत गेल्यानंतर मागासवर्गीयांचे नेते रामविलास पासवान, धनगरांचे नेते महादेव जानकर आदी भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे भाजपने रिपाइंला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे सांगून बारशिंग यांनी राज्यात २३ जागांची मागणी केली.सेना-भाजप युती झाली नाही तर, भाजपने रिपाइंला ५० जागा सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपसोबत लेखी करार झाला असतानाही, तो करार पाळत नाहीत, याची खंत वाटत असल्याचेही ते म्हणाले.बुधवारी सायंकाळी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे, नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ, भिवंडी अध्यक्ष महेंद्र गायकवाड, बाळाराम गायकवाड, महिला आघाडीच्या मनीषा करलाद, आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, ऐरोली आदी जागांवर रिपाइंने दावा केला आहे. नालासोपारा मतदारसंघाचीही जागा या पक्षाने मागितली आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019