शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lockdown : लॉकडाऊनच्या धास्तीने कामगार-उद्योजक हबकले!, परप्रांतीय मजुरांचे पाय वळू लागले गावाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 23:41 IST

Maharashtra Lockdown : परप्रांतीय कामगारांअभावी काही कारखान्यांतील उत्पादन व काही बांधकाम क्षेत्रावर खूप परिणाम झाल्याने तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- पंकज राऊत

बोईसर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने घातलेले थैमान आणि कधीही लॉकडाऊन जाहीर होण्याची स्थिती असल्याने जिल्ह्यातील औद्योगिक व बांधकामासह अनेक क्षेत्रात काम करणारे परप्रांतीय कामगार धास्तावले असून ते त्यांच्या मूळगावी परतायला लागले आहेत. यामुळे कामगारांअभावी उद्योजकांना मुदतीत पूर्ण न होणाऱ्या उत्पादनाची तर विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसायावर होणाऱ्या संभाव्य परिणामाची चिंता वाटू लागली असून ते धास्तावले आहेत.मागील वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार कुटुंबासह डोक्यावर बोजाबिस्तारा घेऊन कुणी चालत तर कुणी जे वाहन मिळेल त्याचा आधार घेऊन प्रचंड हालअपेष्टा सहन करून आपापल्या गावी गेले होते. ते दिवाळीनंतर हळूहळू परतले आहेत. दरम्यान परप्रांतीय कामगारांअभावी काही कारखान्यांतील उत्पादन व काही बांधकाम क्षेत्रावर खूप परिणाम झाल्याने तीच परिस्थिती पुन्हा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कामगार कुठे व किती ?जिल्ह्यामध्ये तारापूर, पालघर, वसई, वाडा व डहाणू येथे औद्योगिक क्षेत्र असून लहान-मोठे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत, तर महत्त्वाच्या सर्व शहरांमध्ये व तालुक्याच्या ठिकाणी इमारती व व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू असून हॉटेल तर गावागावात असून अशा विविध क्षेत्रात काम करीत असलेले लाखो परप्रांतीय कामगार आज द्विधा मनस्थितीत आहेत. 

सर्वच क्षेत्रांचे होणार नुकसानकोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध आणि लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांशिवाय पर्याय नाही. मात्र स्टील, केमिकल कारखाने, कापड उद्योगासह बांधकाम क्षेत्रातही परप्रांतीय कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून ते धास्तावून गावी परतू लागले आहेत. याचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परराज्यातील कामगार चिंतित आहेत. ते आपल्या राज्यात जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते. त्यांना थोपवून ठेवणे जिकिरीचे असून  ते कामगार त्यांच्या गावी गेल्यानंतर उत्पादनावर निश्चितच परिणाम होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच सक्षमपणे संबंधित यंत्रणेने रोखणे आवश्यक आहे. तारापूरच्या उद्योजकांनी आपल्या कारखान्यातील कामगारांची रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू केली आहे, मात्र सदर टेस्ट किटच्या उपलब्धतेवर  मर्यादा  असल्याचे जाणवते. एकूण परिस्थिती गंभीर वळण घेत  असल्याचे  दिसते म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.- डी.के. राऊत, अध्यक्ष  तारापूर इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन(टिमा)

कधीही लॉकडाऊन होण्याची शक्यता व आमच्या मनामध्ये कोरोनाविषयी असलेल्या प्रचंड भीतीबरोबरच येथे आमच्याजवळचे फारसे नातेवाईकही नसल्याने आम्हाला आमच्या गावी परतावेसे वाटते. आम्ही त्या दृष्टीने तयारीलाही लागलो आहोत.- सतू शर्मा, कामगार

मागील वर्षी गावी परतताना आमचे झालेले प्रचंड हाल पाहता आता रेल्वे गाड्या व इतर वाहतूक सुरू असल्याने आम्ही सुखरूप व लवकर आमच्या घरी पोहचू. कारण जर लॉकडाऊन सुरू झाले तर येथील आमचे काम कमी किंवा बंद होण्याची शक्यता असून आमच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल.- विनोद साह, कामगार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर