शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मतदान शांततेत; अंदाजे ४२ टक्के मतदान, कुठेही अनुचित घटना नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 02:34 IST

Maharashtra Election 2019: डोंबिवली मतदारसंघासाठी ३२३ मतदानकेंद्रांवर सोमवारी कुठेही गालबोट न लागता शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली.

डोंबिवली : डोंबिवली मतदारसंघासाठी ३२३ मतदानकेंद्रांवर सोमवारी कुठेही गालबोट न लागता शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांचा ओघ कमी होता. त्यात दुपारी काही प्रमाणात वाढ झाली, तरी मतदारांचा निरुत्साह स्पष्ट दिसत होता. दिवसभरात केवळ अंदाजे ४२ टक्के मतदान झाले. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानात घट झाल्याचे दिसत आहे.

कुठेही मतदानप्रक्रियेला गालबोट न लागता मतदान झाले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था तंतोतंत पाळली गेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार म्हणाले. या मतदारसंघात एकूण तीन लाख ५१ हजार ५२६ मतदार होते. त्यामध्ये एक लाख ८१ हजार ६८१ पुरुष, एक लाख ६९ हजार ८४५ महिला मतदारांचा समावेश होता.

ठाकुर्ली येथील महिला समिती शाळेतील मतदानकेंद्रांवरील एका ईव्हीएम मशीनच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही यंत्रे बदलण्यात आली. अन्य दोन ठिकाणीही यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पवार म्हणाले. तसेच, १४ ठिकाणच्या व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. बोगस मतदानाचीही कुठेही तक्रार आली नसल्याचेही पवार म्हणाले.

या मतदारसंघामध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण, मनसेचे मंदार हळबे, काँग्रेसच्या राधिका गुप्ते, बसपाचे दामोदर काकडे, संभाजी ब्रिगेड पार्टीचे डॉ. अमितकुमार गोईलकर आणि अपक्ष भागवत गायकवाड या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदानयंत्रात बंद झाले. भाजप विरुद्ध मनसे अशी लढत असली, तरी काँग्रेसने महिला उमेदवार दिल्याने त्या किती मते घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संथगतीने मतदान झाले. त्यानंतर, दुपारी ३ ते सायंकाळी ६ यादरम्यान मतदानाला वेग आला. ठिकठिकाणच्या केंद्रांवर मतदारांची पुन्हा गर्दी झाली होती. सकाळी पावसाचे सावट होते, मात्र ९ वाजल्यानंतर आकाश निरभ्र झाल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दिव्यांगांसाठी आठ रिक्षांची सुविधा करण्यात आली होती. केंद्रांवर ज्येष्ठांना विशेष सुविधा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. प्रचारात शहरातील खड्डे, अस्वच्छता आदी मुद्दे गाजले.

उमेदवारांनी केले सहकुटुंब मतदान

रवींद्र चव्हाण, मंदार हळबे, राधिका गुप्ते यांच्यासह सगळ्याच उमेदवारांनी त्यांच्या कुटुंबीयांसह सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. पश्चिमेला कानाकोपऱ्यांमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले.

ज्येष्ठ नागरिक जखमी

भालचंद्र नाटेकर (७८) या ज्येष्ठ नागरिक मतदाराला भोवळ आली आणि त्यांचा तोल जाऊन ते टिळकनगर येथील मतदानकेंद्रात मतदानाला जात असताना पायऱ्यांवरून खाली पडले. हे पाहताच पोलिसांनी धाव घेत त्यांच्यावर प्रथमोपचार करून मतदानकेंद्राजवळ नेले. त्यांच्या डोक्याला, कोपराला खरचटले असून मलमपट्टी करण्यात आली आहे. मतदान करून ते घरी गेले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान