शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
3
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
4
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
5
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
6
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
7
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
8
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
9
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
10
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
11
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
12
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
13
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
14
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
15
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
16
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
17
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
18
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
19
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
20
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:11 IST

Maharashtra Election 2019: समस्यांच्या नावाने बोंबाबोंब, मतदानालाही ठेंगा

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील विविध नागरी समस्यांप्रकरणी स्थानिक नागरिकांची नेहमीच ओरड राहिली आहे. परंतु, मतदानाचा हक्क बजावून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची मानसिकता मतदारांची नाही. हे मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बंडखोरी झालेल्या या मतदारसंघात घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाच्या मुळावर उठते, हे चित्र गुरुवारी मतमोजणीतून समोर येईल.

कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात आहेत. गणपत गायकवाड (भाजप), प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस), मिलिंद बेळमकर (बहुजन समाज पार्टी), अश्विनी थोरात-धुमाळ (वंचित बहुजन आघाडी) सचिन चिकणे (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक) अभिजीत त्रिभुवन (बहुजन मुक्ती पार्टी), उदय रसाळ (प्रहार जनशक्ती पक्ष), हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) यांच्यासह ११ अपक्ष उमेदवार येथे आहेत. यात शिवसेनेचे धनंजय बोडारे आणि काँग्रेसचे शैलेश तिवारी हे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

कल्याण पूर्वेतील समस्या नेहमीच चर्चेत असतात. तलावांची दूरवस्था, डम्पिंग नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग, पावसाळ्यात तुंबणारी गटारे, ड्रेनेजचा अभाव, नादुरुस्त आणि अरुंद रस्ते, अतिक्रमण, बेकायदा बांधकामे, धोकादायक इमारतींचा प्रश्न, सरकारी रुग्णालयाची वानवा, उद्यान आणि मैदानांची कमतरता, पाणीसमस्या, विरंगुळा केंद्र नसणे, विकासकामांमुळे बाधित होणाºया रहिवाशांच्या पुनर्वसनाची बोंब, यामुळे येथील नागरिक त्रासलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारातही हे मुद्दे अग्रस्थानी राहिले. त्याचबरोबर आरक्षणाच्या जागा बळकावण्यासह बेकायदा बांधकाम आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उमेदवारांकडून झाडल्या गेल्याचेही दिसून आले.

पूर्व मतदासंघात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपचे मनोज तिवारी, श्वेता शालिनी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा झाली. एवढेच नव्हे तर प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदारसंघात पायधुळ झाडली आहे. यासर्वच नेत्यांनी मतदारांना भरघोस मतदान करा, असे आवाहन केले होते. निवडणूक आयोगानेही मतदान जागृतीचे कार्यक्रम राबवून मतदान करा, अशी हाक दिली होती.

मात्र, समस्यांच्या मुद्यावर याठिकाणी भरघोस मतदान करून मतदार आपल्यातील संताप व्यक्त करतील, असा दावा जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. परंतु, मतदारांनी पाठ दाखवून तो फोल ठरविला आहे. याठिकाणी तीन लाख ४५ हजार ६६६ एकूण मतदार आहेत. यापैकी केवळ एक लाख ५० हजार ५३५ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, एक लाख ९५ हजार १३१ मतदारांनी मात्र मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाची मतदानाची टक्केवारी ४३.५५ इतकी मर्यादित राहिली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तीन लाख १२ हजार ५४४ मतदार होते. त्यावेळी एक लाख ४१ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतांची टक्केवारी ४५.१९ इतकी होती. परंतु, यंदा मतदारांची संख्या वाढूनही मतदान वाढलेले नाही. ४३.५५ टक्के मतदान झाले असून दीड टक्क्याच्या आसपास टक्केवारी घसरली आहे.

मतदारांनी फिरवलेली पाठ लोकशाहीसाठी मारक

पूर्वेतील मतदार विविध नागरी समस्यांमुळे पिचलेला आहे. केडीएमसी असो अथवा केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असतानाही कोणतीही विकासाची कामे पूर्वेत झालेली नाहीत. त्यामुळे नाराजीतून मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. त्यात एकीकडे महागाई, खड्ड्यांमुळे नागरिक त्रासले असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा मुद्दा काश्मीर ३७० कलम रद्द करणे, असो अथवा दहशतवाद, यासारख्या विषयाभोवतीच आवर्जून राहिला. यामुळे मतदार नाराज झाले आणि त्याचे चित्र मतदानाच्या टक्केवारीतून दिसून आले.- जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी आमदार, विधानपरिषद

नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावलेच पाहिजे. लोकांचा मतदानाबाबत असलेला निरुत्साह दूर झाला पाहिजे. जर मतदानच केले नाही तर निरुत्साह कसा दूर होईल. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पक्षांकडून नेहमीच मतदान करा, असे आवाहन केले जाते. परंतु, मतदार त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लोकशाहीसाठी मारक आहे.- गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाध्यक्ष, शिवसेना

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान