शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:11 IST

Maharashtra Election 2019: समस्यांच्या नावाने बोंबाबोंब, मतदानालाही ठेंगा

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील विविध नागरी समस्यांप्रकरणी स्थानिक नागरिकांची नेहमीच ओरड राहिली आहे. परंतु, मतदानाचा हक्क बजावून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची मानसिकता मतदारांची नाही. हे मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बंडखोरी झालेल्या या मतदारसंघात घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाच्या मुळावर उठते, हे चित्र गुरुवारी मतमोजणीतून समोर येईल.

कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात आहेत. गणपत गायकवाड (भाजप), प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस), मिलिंद बेळमकर (बहुजन समाज पार्टी), अश्विनी थोरात-धुमाळ (वंचित बहुजन आघाडी) सचिन चिकणे (समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक) अभिजीत त्रिभुवन (बहुजन मुक्ती पार्टी), उदय रसाळ (प्रहार जनशक्ती पक्ष), हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) यांच्यासह ११ अपक्ष उमेदवार येथे आहेत. यात शिवसेनेचे धनंजय बोडारे आणि काँग्रेसचे शैलेश तिवारी हे बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

कल्याण पूर्वेतील समस्या नेहमीच चर्चेत असतात. तलावांची दूरवस्था, डम्पिंग नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग, पावसाळ्यात तुंबणारी गटारे, ड्रेनेजचा अभाव, नादुरुस्त आणि अरुंद रस्ते, अतिक्रमण, बेकायदा बांधकामे, धोकादायक इमारतींचा प्रश्न, सरकारी रुग्णालयाची वानवा, उद्यान आणि मैदानांची कमतरता, पाणीसमस्या, विरंगुळा केंद्र नसणे, विकासकामांमुळे बाधित होणाºया रहिवाशांच्या पुनर्वसनाची बोंब, यामुळे येथील नागरिक त्रासलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारातही हे मुद्दे अग्रस्थानी राहिले. त्याचबरोबर आरक्षणाच्या जागा बळकावण्यासह बेकायदा बांधकाम आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उमेदवारांकडून झाडल्या गेल्याचेही दिसून आले.

पूर्व मतदासंघात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, रिपाइंचे रामदास आठवले, भाजपचे मनोज तिवारी, श्वेता शालिनी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह प्रचाराच्या अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा झाली. एवढेच नव्हे तर प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदारसंघात पायधुळ झाडली आहे. यासर्वच नेत्यांनी मतदारांना भरघोस मतदान करा, असे आवाहन केले होते. निवडणूक आयोगानेही मतदान जागृतीचे कार्यक्रम राबवून मतदान करा, अशी हाक दिली होती.

मात्र, समस्यांच्या मुद्यावर याठिकाणी भरघोस मतदान करून मतदार आपल्यातील संताप व्यक्त करतील, असा दावा जाणकारांकडून व्यक्त केला जात होता. परंतु, मतदारांनी पाठ दाखवून तो फोल ठरविला आहे. याठिकाणी तीन लाख ४५ हजार ६६६ एकूण मतदार आहेत. यापैकी केवळ एक लाख ५० हजार ५३५ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. तर, एक लाख ९५ हजार १३१ मतदारांनी मात्र मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाची मतदानाची टक्केवारी ४३.५५ इतकी मर्यादित राहिली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तीन लाख १२ हजार ५४४ मतदार होते. त्यावेळी एक लाख ४१ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतांची टक्केवारी ४५.१९ इतकी होती. परंतु, यंदा मतदारांची संख्या वाढूनही मतदान वाढलेले नाही. ४३.५५ टक्के मतदान झाले असून दीड टक्क्याच्या आसपास टक्केवारी घसरली आहे.

मतदारांनी फिरवलेली पाठ लोकशाहीसाठी मारक

पूर्वेतील मतदार विविध नागरी समस्यांमुळे पिचलेला आहे. केडीएमसी असो अथवा केंद्र आणि राज्यात महायुतीची सत्ता असतानाही कोणतीही विकासाची कामे पूर्वेत झालेली नाहीत. त्यामुळे नाराजीतून मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. त्यात एकीकडे महागाई, खड्ड्यांमुळे नागरिक त्रासले असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा मुद्दा काश्मीर ३७० कलम रद्द करणे, असो अथवा दहशतवाद, यासारख्या विषयाभोवतीच आवर्जून राहिला. यामुळे मतदार नाराज झाले आणि त्याचे चित्र मतदानाच्या टक्केवारीतून दिसून आले.- जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी आमदार, विधानपरिषद

नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावलेच पाहिजे. लोकांचा मतदानाबाबत असलेला निरुत्साह दूर झाला पाहिजे. जर मतदानच केले नाही तर निरुत्साह कसा दूर होईल. प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पक्षांकडून नेहमीच मतदान करा, असे आवाहन केले जाते. परंतु, मतदार त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लोकशाहीसाठी मारक आहे.- गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाध्यक्ष, शिवसेना

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान