शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:40 IST

Maharashtra Election 2019: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे.

- प्रा. सुनीता कुलकर्णी

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे. अनेक सुशिक्षित माणसे या काळात सहलीला जातात. वास्तविक, टी.व्ही व अन्य प्रसारमाध्यमांतून मतदानाचे महत्त्व व आवाहन वरचेवर केले जाते. तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदारांच्या मनात इतकी उदासीनता का आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.या उदासीनतेची काही कारणे अशी आहेत.

१) उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी२) घराणेशाही३) राजकीय पक्षांनी दिलेली खोटी आश्वासने.

एकूणच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सेवेपेक्षा व्यवसाय असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशांचा वाढता वापर हा गुंतवणूक व त्यातून परतावा या तत्त्वानुसार केला जात आहे. कोणीही निवडून आले तरी स्थितीत फरक पडत नाही, हा अनुभव असल्याने ही उदासीनता आणखीन वाढली आहे.

त्यातच ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, त्यामुळेही लोक मतदानाला उत्साहाने जात नाहीत. ही स्थिती बदलावी, याकरिता ठाणे मतदाता जागरण अभियान सतत प्रयत्नशील असते. नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य त्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. याकरिता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना उत्तरदायी करण्याचा आग्रह नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही धरत असतो.

अभियानाने महापालिका निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार देऊन एक प्रयत्न केला. त्यांचा सर्व प्रचार कमीतकमी पैशांत होऊ शकतो, हे प्रत्यक्ष करून दाखवले. मतदारांची वृत्ती बिघडवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी पक्ष करीत असतात, आमिष दाखवून मते घेणे हे होत असले तरी अंतिमत: ते नागरिकांच्या हिताविरोधी असते हे आता कळायला लागले आहे. चिरागनगरमध्ये महिलांनी उमेदवारांना फक्त १० मिनिटे पाणीपुरवठा का करण्यात येतो, यावरून सतत प्रश्न विचारले. तसेच तरुणांनी आरेमधील वृक्षतोडविरोधी आवाज उठवला.

जेलमध्ये गेले, ही उदाहरणे बदल घडत आहेत, याची आहेत. याबाबत केवळ निवडणुकीच्या वेळी नाही तर सतत पुढील काळातही जनजागृती करणे ही अभियानाची भूमिका आहे. आपल्या मत देण्याने फरक पडू शकतो, याची जाणीव महत्त्वाची आहे. नागरिकांना गृहीत धरण्याची वृत्ती राजकारण्यांनी सोडायला हवी. संघटित मतदार हे करू शकतात, या दिशेनेच ठाणे मतदाता जागरण अभियानाचे काम सुरू आहे. प्रत्येकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मतदान करावे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन