शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:40 IST

Maharashtra Election 2019: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे.

- प्रा. सुनीता कुलकर्णी

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे. अनेक सुशिक्षित माणसे या काळात सहलीला जातात. वास्तविक, टी.व्ही व अन्य प्रसारमाध्यमांतून मतदानाचे महत्त्व व आवाहन वरचेवर केले जाते. तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदारांच्या मनात इतकी उदासीनता का आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.या उदासीनतेची काही कारणे अशी आहेत.

१) उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी२) घराणेशाही३) राजकीय पक्षांनी दिलेली खोटी आश्वासने.

एकूणच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सेवेपेक्षा व्यवसाय असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशांचा वाढता वापर हा गुंतवणूक व त्यातून परतावा या तत्त्वानुसार केला जात आहे. कोणीही निवडून आले तरी स्थितीत फरक पडत नाही, हा अनुभव असल्याने ही उदासीनता आणखीन वाढली आहे.

त्यातच ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, त्यामुळेही लोक मतदानाला उत्साहाने जात नाहीत. ही स्थिती बदलावी, याकरिता ठाणे मतदाता जागरण अभियान सतत प्रयत्नशील असते. नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य त्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. याकरिता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना उत्तरदायी करण्याचा आग्रह नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही धरत असतो.

अभियानाने महापालिका निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार देऊन एक प्रयत्न केला. त्यांचा सर्व प्रचार कमीतकमी पैशांत होऊ शकतो, हे प्रत्यक्ष करून दाखवले. मतदारांची वृत्ती बिघडवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी पक्ष करीत असतात, आमिष दाखवून मते घेणे हे होत असले तरी अंतिमत: ते नागरिकांच्या हिताविरोधी असते हे आता कळायला लागले आहे. चिरागनगरमध्ये महिलांनी उमेदवारांना फक्त १० मिनिटे पाणीपुरवठा का करण्यात येतो, यावरून सतत प्रश्न विचारले. तसेच तरुणांनी आरेमधील वृक्षतोडविरोधी आवाज उठवला.

जेलमध्ये गेले, ही उदाहरणे बदल घडत आहेत, याची आहेत. याबाबत केवळ निवडणुकीच्या वेळी नाही तर सतत पुढील काळातही जनजागृती करणे ही अभियानाची भूमिका आहे. आपल्या मत देण्याने फरक पडू शकतो, याची जाणीव महत्त्वाची आहे. नागरिकांना गृहीत धरण्याची वृत्ती राजकारण्यांनी सोडायला हवी. संघटित मतदार हे करू शकतात, या दिशेनेच ठाणे मतदाता जागरण अभियानाचे काम सुरू आहे. प्रत्येकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मतदान करावे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन