शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:40 IST

Maharashtra Election 2019: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे.

- प्रा. सुनीता कुलकर्णी

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे. अनेक सुशिक्षित माणसे या काळात सहलीला जातात. वास्तविक, टी.व्ही व अन्य प्रसारमाध्यमांतून मतदानाचे महत्त्व व आवाहन वरचेवर केले जाते. तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदारांच्या मनात इतकी उदासीनता का आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.या उदासीनतेची काही कारणे अशी आहेत.

१) उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी२) घराणेशाही३) राजकीय पक्षांनी दिलेली खोटी आश्वासने.

एकूणच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सेवेपेक्षा व्यवसाय असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशांचा वाढता वापर हा गुंतवणूक व त्यातून परतावा या तत्त्वानुसार केला जात आहे. कोणीही निवडून आले तरी स्थितीत फरक पडत नाही, हा अनुभव असल्याने ही उदासीनता आणखीन वाढली आहे.

त्यातच ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, त्यामुळेही लोक मतदानाला उत्साहाने जात नाहीत. ही स्थिती बदलावी, याकरिता ठाणे मतदाता जागरण अभियान सतत प्रयत्नशील असते. नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य त्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. याकरिता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना उत्तरदायी करण्याचा आग्रह नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही धरत असतो.

अभियानाने महापालिका निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार देऊन एक प्रयत्न केला. त्यांचा सर्व प्रचार कमीतकमी पैशांत होऊ शकतो, हे प्रत्यक्ष करून दाखवले. मतदारांची वृत्ती बिघडवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी पक्ष करीत असतात, आमिष दाखवून मते घेणे हे होत असले तरी अंतिमत: ते नागरिकांच्या हिताविरोधी असते हे आता कळायला लागले आहे. चिरागनगरमध्ये महिलांनी उमेदवारांना फक्त १० मिनिटे पाणीपुरवठा का करण्यात येतो, यावरून सतत प्रश्न विचारले. तसेच तरुणांनी आरेमधील वृक्षतोडविरोधी आवाज उठवला.

जेलमध्ये गेले, ही उदाहरणे बदल घडत आहेत, याची आहेत. याबाबत केवळ निवडणुकीच्या वेळी नाही तर सतत पुढील काळातही जनजागृती करणे ही अभियानाची भूमिका आहे. आपल्या मत देण्याने फरक पडू शकतो, याची जाणीव महत्त्वाची आहे. नागरिकांना गृहीत धरण्याची वृत्ती राजकारण्यांनी सोडायला हवी. संघटित मतदार हे करू शकतात, या दिशेनेच ठाणे मतदाता जागरण अभियानाचे काम सुरू आहे. प्रत्येकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मतदान करावे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन