शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Maharashtra Election 2019: ठाणे शहराच्या मतदानात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:24 IST

Maharashtra Election 2019: कोणाला बसणार फटका, राजकीय वर्तुळात विश्लेषण

ठाणे : ठाणे शहर मतदारसंघातील पाच उमेदवारांचा फैसला सोमवारी मतपेटीत बंद झाला. मागील वेळेच्या तुलनेत यंदा ४.०९ टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. याची आता वेगवेगळी कारणे पुढे येत असली पर्याय असतानाही शिवसेनेच्या या बालेकिल्यात मतदानाच्या टक्केवारीत घट का झाली याची चर्चा मात्र सुरु झाली आहे. या ठिकाणच्या समस्या सुटलेल्या नाहीत, की विद्यमान आमदाराकडून मतदारांची निराशा झाली, आदींसह इतरही कारणे आता चर्चेला आली आहेत. परंतु, या घटलेल्या टक्केवारीचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाणे शहर मतदारसंघात ५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही भाजप विरुद्ध मनसे अशीच झाली आहे. मागील वेळेस युती व आघाडी न झाल्याने भाजप विरुद्ध शिवसेना तर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होती. परंतु, आताच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने भाजप येथून लढली. मात्र, आघाडीकडून राष्ट्रवादीने अंतिम क्षणी माघार घेऊन मनसेला पाठिंबा दिला. यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी या मतदारसंघाची निवडणूक ही शेवटच्या क्षणी चुरशीची झाल्याचे चित्र पाहावायस मिळाले.

मनसेला राष्ट्रवादीने थेट टाळी दिली, तर काँग्रेसने अखेरच्या क्षणी छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीची समीकरणे काहीशी बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होईल, असेही बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कोणत्या बुथमधून टक्केवारीत घट झाली, याचा उहापोह शिवसेना आणि भाजपच्या गोटातून सुरू झाला आहे. त्यामुळे बुथनिहाय आकडेवारी गोळा करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेताना दिसले. येथे खरी लढत ही भाजपचे संजय केळकर विरुद्ध मनसेचे अविनाश जाधव यांच्यात आहे.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे ५६.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये एकूण ३ लाख २२ हजार १६८ मतदारांपैकी १ लाख ८२ हजार २३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ८२ हजार ८०६ पुरुष आणि ९९ हजार ४२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

विशेष म्हणजे पुरुष मतदात्यांच्या तुलनेत १६ हजार ६२१ अधिक महिलांनी मतदान केले आहे. यंदा या मतदारांची संख्या ३ लाख ३७ हजार ९०९ एवढी होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्यादेखील वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत यंदा ५२.४७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत ४.०९ टक्के मतदानात घट झाली आहे. यावेळी एकूण मतदारांपैकी ९७ हजार ७०० पुरुष तर ७९ हजार ५०० महिलांनी अशा एकूण १ लाख ७७ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकूणच मागील निवडणुकीपेक्षा कमी झालेल्या टक्केवारीची अनेक कारणे आता पुढे आली आहेत. एकतर हा मतदारसंघ सुशिक्षित, संस्कृत मतदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या मतदारसंघात कमी मतदान झाले. याचाच अर्थ या ठिकाणी विद्यमान आमदार मतदारांच्या पंसतीस न उतरल्याने किंवा त्याच्याकडून कामे झाली नसल्याने किंवा या मतदारसंघातील वाहतूककोंडी, जुन्या इमारतींचा प्रश्न, अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आदींच्या समस्या सुटलेल्या नसाव्यात म्हणूनच कदाचित मतदार राजा कमी प्रमाणात उतरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे सक्षम पर्याय म्हणूनही अविनाश जाधव यांना कदाचित पसंती नसल्याचे कारण पुढे आले असून विद्यमान आणि पर्याय हे दोघेही अयोग्य वाटत असल्याने कदाचित मतदानाची टक्केवारी घटली असावी असाही आता कयास लावला जात आहे.

राष्ट्रवादीच्या मतदारांनी पाठ फिरवल्याचा अंदाज

राष्ट्रवादीने मनसेला टाळी दिली असली तरी राष्ट्रवादीला मानणारा मतदार मतदानासाठी कमी संख्येने उतरला असावा अशी चर्चा आहे. काँग्रेस एक वेळेस राष्ट्रवादीला मतदान करू शकते. मात्र ऐन वेळेस श्रेष्ठींनी मनसेला आतून टाळी दिली आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना इंजिनाला मतदान करा, अशा सुचना दिल्या.

या निवडणुकीत पंजाच नसल्याने इंजिनाला मतदान कसे करायचे असा पेच अनेक सर्वसामान्य मतदारांना सतावत होता. त्यामुळेच याचाही फटका बसून टक्केवारी घसरली असावी, असेही बोलले जात आहे. घटलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार, केळकर सेंकड पार्ट लिहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहर