शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

Maharashtra Election 2019 : ठाण्यात चार मतदारसंघांत युतीपुढे बंडखोरांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 04:24 IST

जिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये युतीची सत्ता आहे.

- नारायण जाधवठाणे जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ असून जागावाटपात शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला नऊनऊ जागा आल्या आहेत. मात्र, कल्याण पूर्वसह पश्चिम, बेलापूर आणि मीरा-भार्इंदर या चार मतदारसंघांत बंडखोरांनी युतीची डोकेदुखी वाढविली आहे.ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा अन् भिवंडी ग्रामीण वगळता सर्वच विधानसभा मतदारसंघांत युतीला मोठे मताधिक्य मिळाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे वजन वाढले आहे.जिल्ह्यातील सहापैकी पाच महापालिकांमध्ये युतीची सत्ता आहे. नवी मुंबई ही राष्ट्रवादीची सत्ता असलेली एकमेव महापालिकाही गणेश नाईकांच्या भाजपप्रवेशामुळे भाजपकडे आली आहे. भिवंडीत शिवसेनेने काँगे्रसचा हात पकडून तेथील महापालिकेत सत्तेच्या मलईत खारीचा वाटा उचलला आहे.जिल्ह्यात पुरस्कृत अपक्ष मिळून भाजपचे आठ, शिवसेनेचे सहा आमदार, तर राष्ट्रवादीचे मुंब्रा-कळवा, उल्हासनगर, ऐरोली आणि शहापूर असे चार आमदार होते. त्यातील ऐरोलीचे संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपात प्रवेश केला आहे. पाठोपाठ त्यांचे वडील माजी मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेतील ४२ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला आहे. सध्या जिल्ह्यात काँगे्रस-राष्ट्रवादीकडे मुंब्रा-कळवा वगळता कुठेच तगडा उमेदवार मिळालेला नाही. युतीच्या जागावाटपात नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. मात्र, बेलापूरमधून गणेश नाईकांना डावलून पक्षाने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी दिल्याने शेवटच्या क्षणी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी तिकीट नाकारून आपल्याजागी वडील गणेश नाईकांना उभे केले आहे. उल्हासनगरात भाजपात गेलेल्या ज्योती कलानी यांनी तिकीट नाकारल्याने परत राष्ट्रवादीत उडी मारली आहे. शहापुरात राष्ट्रवादीने शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांना, तर शिवसेनेने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी दिली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी करून नरेंद्र मेहता यांची डोकेदुखी वाढविली आहे. तर, मोदी सरकारच्या धोरणांमुळे भिवंडीत आघाडीला लॉटरी लागू शकते.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह मीरा-भार्इंदरमध्ये युतीत नाराजी२) अंबरनाथमध्ये काँगे्रस-शिवसेना आमनेसामने३) जिल्ह्यात सर्वच शहरांत धोकादायक इमारतींचे पुनर्वसनासह पाणीटंचाई४) बंद पडणारे उद्योग, बेरोजगारी, वाहतुकीसह वाढती प्रदूषणाची समस्या५) ठाणे शहर, मुरबाडसह पाच ठिकाणी मनसेची राष्टÑवादीला टाळीरंगतदार लढतीठाणे शहरात राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेतली असून मनसेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. आधीच असलेली शिवसेनेतील नाराजी अन् राष्ट्रवादीच्या माघारीमुळे आता ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव विरुद्ध भाजपचे संजय केळकर अशी रंगतदार लढत होणार आहे.बेलापूरमधून विजय नाहटांना तिकीट नाकारून ही जागा भाजपला सोडल्याने नाराज शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने येथे भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे अशोक गावडे आणि विजय माने अशी तिरंगी लढत.कल्याण पश्चिमेत तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विश्वनाथ भोईरांच्या विरोधात नरेंद्र पवार यांनी, तर कल्याण पूर्वेत भाजपचे गणपत गायकवाड यांना शिवसेनेचे धनंजय बोडारे अशी लढत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहरbelapur-acबेलापूरkalyan-rural-acकल्याण ग्रामीणkalyan-west-acकल्याण पश्चिमkalyan-east-acकल्याण पूर्वmira-bhayandar-acमीरा-भाईंदरmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाbhiwandi-rural-acभिवंडी ग्रामीणbhiwandi-east-acभिवंडी पूर्वbhiwandi-west-acभिवंडी पश्चिम