शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
3
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
4
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
5
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
6
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
7
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
8
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
10
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
11
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
12
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
13
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
14
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
15
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
16
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
17
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
18
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
19
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
20
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : वांद्रे-वरळी सी लिंकचा 'वनवास', 14 वर्षांचा लांबलचक काळ - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 21:36 IST

भगवान राम सीतामातेला अयोध्येला आणण्याइतकी 14 वर्षं वांद्रे-वरळी सी लिंकला लागली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

डोंबिवलीः भगवान राम सीतामातेला अयोध्येला आणण्याइतकी 14 वर्षं वांद्रे-वरळी सी लिंकला लागली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. काय कराल प्रगतीचं, काय कराल विकासाचं, जग कुठे गेलंय आणि अजूनही आपण कुठल्या गोष्टींवरून निवडणुका लढवतोय आणि निवडणुकीत सांगतोय चांगले रस्ते देऊ, खरंच तुमच्या आणि आमच्या मूलभूत गरजा काय असतात, 8 ते 10 गोष्टींपेक्षा जास्ती गरजा नसतात, चांगले रस्ते हवेत, चांगला वीजपुरवठा हवा, उत्तम कॉलेज, दवाखाना असावा, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ते डोंबिवलीतल्या सभेत बोलत होते. कल्याण-डोंबिवली शहराला 6500 कोटी रुपये देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. सुशिक्षित डोंबिवलीची बकाल शहर ओळख झाली. मराठी उद्योजक महाराष्ट्र सोडून परदेशात जात आहेत. सत्ताधाऱ्यांना मराठी कलाकारांचा विसर पडला आहे. शेतकरी आत्महत्येसाठी जिल्ह्याची ओळख असणं लाजिरवाणी बाब आहे. सुविधांचा अभाव असून, शहराचा विकास वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. फडणवीसांनी दीड लाख विहिरी कुठे बांधल्या?, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही हल्लाबोल केला आहे.आरएसएसला मानणारा मोठा वर्ग डोंबिवलीत आहे, सत्ताधाऱ्यांनी शहरं घाण करून टाकली आहेत, मेक इन महाराष्ट्राचा भाजपाकडून बोजवारा उडाला आहे, पीएमसी बँकेचा भ्रष्ट व्यवहार आहे. या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राला खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेवर तुम्ही गप्प का?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019