शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

Maharashtra election 2019 : 5 वर्षांच्या मुलाला विचारले तरी तो सांगेल कोण येणार?- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 21:53 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे.

ठाणेः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी अनेक विकासाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. 5 वर्षांच्या मुलाला देखील विचारले तरी तो सांगेल कोण येणार आहे, राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले कारण त्यांनाही माहिती आहे कोण येणार?, असं म्हणत त्यांनी आघाडीला टोला लगावला आहे. ठाण्यातल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे. इकडे आड तर तिकडे विहीर आहे. आघाडीला समजलं त्यांच्या किती जागा निवडून येणार आहेत, त्यामुळेच सुशील कुमार यांनी एकत्र येण्याचं सल्ला दिल्याचा टोलाही फडणवीस यांनी हाणला आहे.मेट्रोचे जाळे पसरले आहे, संपूर्ण क्षेत्र मेट्रोच्या माध्यमातून तयार केली पाहिजेत. ठाण्यात हायब्रीडच्या माध्यमातूनदेखील इंटर मेट्रो आणू, असंही त्यांनी सांगितलं आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी ठाणे ते बोरिवली रोपवे आणणार आहे. कोपरी उड्डाणपूल आठ पदरी करणार आहे. वाहतूक कोंडी दूर करणार आहे. टिकुजिनी वाडी ते बोरिवली या ठिकाणच्या बोगद्याचं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. अंतर्गत जल वाहतूक करण्यासाठी गडकरी यांनी मंजुरी दिली आहे, लवकरात लवकर ही सेवा सुरू होईल आणि वाहतूक कोंडी दूर होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

आज सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण हजारो कोटींची कामे करत आहोत, नागरिकांना दिलासा देण्याचे काम आपण करीत आहे. ज्या वेळी निधी लागला ते युतीच्या माध्यमातून देत आलो आहे. येत्या काळात ठाणेकरांसाठी क्लस्टरच्या योजना येणार आहेत. मोदीजींच्याकडून गरिबांना घरे देण्याचे काम युतीकडून होत आहे. गरिबांना एसआरएमधून 300 स्क्वेअर फूटची घरे देणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे अशा कॉरिडॉरचा प्रकल्प आणत आहे. 100 टक्के डंपिंग बंद करण्यात येणार असून, प्रदूषणमुक्त आणि चांगली कामे आपण हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींचे काम होणार आहे. गेल्या 5 वर्षात अनेक कामे केली असून,  14व्या क्रमांकावरून महाराष्ट्र 3 नंबरवर आणून ठेवला आहे. तसेच भविष्यात महाराष्ट्र एक नंबरवर येईल.  उद्योगात देशात पाहिले राज्य महाराष्ट्र आले आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र पहिला आहे. देशातील एकूण 25% रोजगार महाराष्ट्रात आणले. या सरकारमध्ये कधीही घोटाळे झाले नाहीत. अजून चांगले काम आपल्याला करायचे आहे. मोदींच्या कार्यक्रमाला अमेरिकेत अनेक लोक उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक नेते असे मोदींना संबोधले आहे. भारत हे मजबूत राष्ट्र होत असल्याचं पाकिस्तानलाही समजले आहे. भारत आणि जम्मू काश्मीर बघितले, तर पाकिस्तान रोज कारवाया करत होता आणि मोदी यांनी 370 कलम आणून जम्मू काश्मीरमुक्त केले. भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019