शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 06:52 IST

Maharashtra Election 2019: भिवंडीत मनसे उमेदवाराची गाडी फोडली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतांची टक्केवारी वाढावी, याकरिता केलेल्या प्रयत्नानंतरही ठाणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. उच्चभ्रूंच्या वस्त्यांमधील मतदार अभावाने मतदानाला बाहेर पडले तर झोपडपट्ट्या, गावठाणांमधून तुलनेने अधिक मतदान झाले. मात्र लोकसभेला दिसला तेवढाही उत्साह विधानसभेला दिसला नाही. भिवंडीत मनसेच्या उमेदवाराच्या मोटारीची अनोळखी व्यक्तींनी केलेली तोडफोड व ठाण्यात मतदान केंद्रात झालेली शाईफेकीची घटना वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक रिंगणातील २१२ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीन्समध्ये सोमवारी लॉक झाले. २०१४ च्या निवडणुकीत ५९ लाख ९० हजार ७३४ मतदारांपैकी ५०.६१ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. यावेळी मतांची टक्केवारी त्याच्याच आसपास राहण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी पूर्वचे मनसेचे उमेदवार मनोज गुळवी यांच्या गाडीची रविवारी रात्री अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. सोमवारी ठाण्यातील एका मतदानकेंद्रावर बहुजन नेते सुनील खांबे यांनी केलेली शाईफेकीची घटना आणि मतदानयंत्रातील बिघाडाचे काही प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.

यंदाच्या निवडणुकीत ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित होते. गेले दोन दिवस ठाण्यात पाऊस पडत होता. पण सोमवारी चक्क ऊन पडले होते. मात्र तरीही घोडबंदर रोड व तत्सम उच्चभ्रू वस्त्यांमधील मतदान केंद्रावर तुरळक मतदार आढळले. त्याचवेळी मुंब्रासारख्या परिसरातील मतदान केंद्रांवर गर्दी होती.

मात्र तेथील अनेक मतदारांकडे तीन- तीन ओळखपत्रे मागितली जात असल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. रविवारला जोडून मतदान असल्याने काही मतदारांनी चक्क पर्यटनस्थळ गाठले होते. त्यामुळे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर मतदार तेवढेच मतदानाला घराबाहेर पडल्याचे चित्र होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत जेमतेम चार ते पाच टक्के मतदान झाले असल्याने अनेक उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व कार्यकर्ते वेगवेगळ््या विभागात जाऊन मतदारांना मतदानाकरिता घराबाहेर पडण्याची विनंती करीत होेते.जिल्ह्यात सर्वपक्षीय नेते, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह मराठी मालिका आणि चित्रपटातील अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला व मतदानाचे आवाहन केले. मात्र तरीही जवळपास निम्मे ठाणेकर मतदार घरातून बाहेर पडले नाहीत.

रायगडच्या ग्रामीण भागांत मतदारांचा चांगला प्रतिसाद

अलिबाग : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी दाखविवेल्या उत्साहामुळे रायगड जिल्ह्याचा मतदानाच टक्का ६५ टक्क्यांवर गेला. तो मागील वर्षीच्या तुलनेत घटलेला आहे. काही दिवस पाऊस पडत असल्याने मतदानाच्या दिवशी पाऊस खोळंबा करणार, अशी चिंता उमेदवार- कार्यकर्त्यांना होती. मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने मतदारांना विनाव्यत्यय घराबाहेर पडून मतदान करता आले. दुपारी उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने मतदारांना जोर थोडा कमी झाला.

उन्हे उतरताच पुन्हा मतदान वाढले. रेवस-बोडणी परिसरातील मासेमारी करण्यासाठी गेलेले मासेमार रविवारी सायंकाळीच मतदानासाठी परतले होते. त्यामुळे किनाऱ्याला सुमारे ५०० बोटी नांगरुन ठेवल्या होत्या. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघातील चाकरमानीही रविवारीच परतले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानthane-acठाणे शहर