शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

गुजरात-राजस्थानातून येणारे बोगस मतदार, काळ्या पैश्यांना रोखण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी 

By धीरज परब | Updated: November 18, 2024 22:18 IST

यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महानगरात खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरात - राजस्थान मधून बोगस मतदार व काळा पैसा आणला जात  असल्याने याप्रकरणी निवडणुका आयोगासह पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महानगरात खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. १४५ मीरा.भाईंदर या मतदार संघात, नजीकच्या काही महिन्यातच ६८ हजार पेक्षा अधीक मतदारांची नवीन नावे नोंदणी झाली आहे. याचे आकलन केले असता, ६०% नावे बोगस असल्याचे समजते. ही बहुतेक नावे धारण करणारी मंडळी, गुजरात, राजस्थान राज्यातून निवडणूकीच्या दिवशी येणार असून, दि. १९ ते २०  रोजी महाराष्ट्र राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार आपल्या राज्यात शेजारच्या राज्यातून प्रवेश कराणार असल्याचे माहीती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आहे असे एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रदिप सामंत यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे.

या दिवशी बोगस मतदान होण्यासाठी, मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी, मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक ठेवण्यासाठी, वरील दोन दिवसंच्या कालावधीत, गुजरात, राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणा-या खाजगी (बस) प्रवासी वाहनांवर बंदी घालण्यात यावी. छोट्या चार चाकी वाहनांची व त्यामधील प्रवाशांची कसून चौकशी करावी. त्यांचा राज्यात प्रवेश करण्याचा हेतू तपासून घ्यावा.

पश्चिम दृतगती महामार्ग (चारोटी चेकनाका) व डांग प्रांतातून नाशिकच्या दिशेने येणा-या महामार्गावर विशेष तपासणी चौक्या उभारणे अतिशय आवश्यक आहे. सुरत वरुन डहाणू मार्गे रेल्वेगाड्यातून येणा-या प्रवाशांना रोखणे व तपासणी आवश्यक आहे.

कोविड टाळेबंदीच्या काळात जंतू संसर्ग होऊ नये, म्हणून अशी नाकेबंदी करण्यात आली होती, राज्याच्या सिमा सिलबंद करण्यात आल्या होत्या. त्या अनुभवावरुन, निवडणूक आयोगाला वरीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे सहज शक्य आहे.

 राज्यातील निवडणूक प्रक्रिया बोगस मतदानाने व आर्थिक प्रलोभनाने प्रभावित होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली  आहे. मीरा भाईंदर च्या २०१४ सालच्या विधानसभा निडणुक वेळी राई खाडी येथे गुजरातच्या नागरिकांची असंख्य बनावट पॅनकार्ड, यादी आदि सापडले होते याची आठवण सामंत यांनी करून दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mira Bhayanderमीरा-भाईंदरthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024mira-bhayandar-acमीरा-भाईंदर