शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

आघाडीचे ठरता ठरेना, त्याच त्याच उमेदवारांवाचून पान हलेना! तिन्ही पक्षांचा भिवंडीवर दावा

By नितीन पंडित | Updated: June 10, 2023 06:20 IST

युतीतील दोन्ही पक्षांचे बाळ्या मामांच्या भूमिकेकडे लक्ष

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडीलोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. सलग दोन वेळा कपिल पाटील यांना मिळालेली खासदारकी आणि आता त्यांच्यामुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेले स्थान यामुळे त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीला तेवढ्याच क्षमतेचा उमेदवार द्यावा लागणार आहे. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेत येथील उमेदवारीवरून चुरस असली, तरी दोन्ही पक्षांकडून त्याच त्याच नावांचा उल्लेख होत असल्याने आणि त्याबाबत आघाडीचे काहीही धोरण ठरत नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आणि आता ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या पाटील यांनी भिवंडी, भोवतालचा ग्रामीण भाग, त्याचबरोबर शहापूर, मुरबाडमधील राजकारणावर चांगलीच पकड घेतली आहे. रेल्वेचे प्रश्न मांडून दळणवळणावर लक्ष केंद्रित केले. 

त्याचवेळी पुण्यात नुकताच झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी लोकसभेत राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचा दावा करत त्यावर दावा केला. मात्र उमेदवार कोण हे एकाही नेत्याला सांगता आलेले नाही. भिवंडीवर दीर्घकाळ दावा सांगणाऱ्या काँग्रेसकडेही माजी खासदार सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांच्याशिवाय इतर उमेदवार नाहीत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्याशिवाय सध्या दुसरा चेहरा नाही. 

भिवंडी लोकसभेत भाजपला विशेषतः कपिल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत टक्कर देणारा चेहरा म्हणून यापूर्वी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याकडे पाहिले जात होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्याशी तसा संपर्कही साधला होता. मात्र नंतर ते राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे पाटील यांच्यापुढील थेट आव्हान टळले. सध्या बाळ्या मामा यांनी थेट कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. मात्र त्यांनी तशी काही भूमिका घेतली, तर त्यातून राजकीय अडचण होऊ नये यासाठी युतीतील शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांचे त्यांच्याकडे लक्ष आहे.

या लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन भाजपकडे, दोन शिवसेनेकडे, एक समाजवादी पक्षाकडे, तर एक राष्ट्रवादीकडे आहे. मात्र मुरबाडमधील भाजप आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद कळीचा ठरतो आहे.

समाजवादी, बविआची  भूमिका महत्त्वाची 

- काँग्रेसची भिस्त समाजवादी पक्षाच्या मदतीवर आहे, तर समाजवादी पक्षाला स्वतःलाच या मतदारसंघात ताकद अजमावयाची आहे. 

- वसई-विरारचे राजकारण करता करता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या उमेदवाराला ५१ हजार मते मिळाली असली, तरी मतविभागणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

- कायमच सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणाऱ्या बविआची यावेळची राजकीय भूमिकाही या घडामोडींत कळीची ठरेल.

मतांचे गणित कसे ? 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांनी चार लाख ११ हजार ७० मते मिळवली. त्यांचे त्या वेळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना तीन लाख १ हजार ६२० मते मिळाली होती. २०१९च्या निवडणुकीत पाटील यांच्या मतांत वाढ होऊन ती पाच लाख २३ हजार ५८३ वर पोहोचली, तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना तीन लाख ६७ हजार २५४ मते मिळाली होती. भाजपची मते चार टक्क्यांनी तर काँग्रेसची मते दोन टक्क्यांनी वाढली होती.

 

टॅग्स :Bhiwandiभिवंडीlok sabhaलोकसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा