शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कळव्यातही महाआरतीचे आयोजन आव्हाडांनी गायले रामाचे गोडवे

By अजित मांडके | Updated: January 20, 2024 16:16 IST

आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ठाणे :  प्रभू श्रीराम हे मांसाहारी असे वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड नाहक राग ओढवून घेतला असतांना त्यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघात त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी राम नामाचा जयघोष सुरु केला आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे आव्हाडांचे मत परिवर्तन झाले का? की त्यांचा विरोध मावळला अशी चर्चा सुरु झाली आहे.

येत्या २२ जानेवारी आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिरात मूतीर्ची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. तदपूर्वी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात प्रवक्ते म्हणून बोलताना, आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली एवढेच नाही तर त्यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे.  भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत आगामी लोकसभेची तयार तसेच मतांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच २२ जानेवारी ला विविध कार्यक्रम होणार असून साहजिकच सर्वच नागरिक त्यामध्ये न सांगता सहभागी होणार आहे.  त्यानुसार कळव्यातही शरद पवार गटातील राष्टÑवादीच्या माजी नगरसेवकांनी राम नामाचा जागर करीत आव्हाडांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यातही येथील घराघरात ८ हजाराहून अधिक झेंड्याचे वाटपही करण्यात आले. त्यानुसार कळवा देखील राममय करण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु आता आमदार आव्हाड यांनी देखील राम नामाचा जागर सुरु केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मिडियावर देखील रामाचे विविध स्वरुपाचे फोटे पोस्ट केले आहेत. तसेच त्यांचा महिमा देखील वर्णन केला आहे. याशिवाय राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी कळवा भागात आव्हाड यांच्या वतीने आनंद विहार खारेगाव फाटक कळवा पूर्व येथे काशीमधील पाच ब्राम्हणांच्या माध्यमातून विराट कलश पुजन व राम दरबार पुजन आणि महाआरती देखील घेतली जाणार आहे. त्याची तयारी आता सुरु झाली आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. एकूणच आव्हाडांना देखील आता रामल्ललाची भुरळ पडली का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRam Mandirराम मंदिरkalwaकळवा