शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातही महाआरतीचे आयोजन आव्हाडांनी गायले रामाचे गोडवे

By अजित मांडके | Updated: January 20, 2024 16:16 IST

आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ठाणे :  प्रभू श्रीराम हे मांसाहारी असे वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड नाहक राग ओढवून घेतला असतांना त्यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघात त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी राम नामाचा जयघोष सुरु केला आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या सोशल मिडीया अंकाऊटला राम नामाचा नारा दिला आहे. शिवाय २२ जानेवारी कळव्यातही विराट कलश पुजन आमि राम दरबार पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे आव्हाडांचे मत परिवर्तन झाले का? की त्यांचा विरोध मावळला अशी चर्चा सुरु झाली आहे.

येत्या २२ जानेवारी आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिरात मूतीर्ची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. तदपूर्वी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशेष अधिवेशनात प्रवक्ते म्हणून बोलताना, आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी होते असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली एवढेच नाही तर त्यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे.  भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करत आगामी लोकसभेची तयार तसेच मतांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच २२ जानेवारी ला विविध कार्यक्रम होणार असून साहजिकच सर्वच नागरिक त्यामध्ये न सांगता सहभागी होणार आहे.  त्यानुसार कळव्यातही शरद पवार गटातील राष्टÑवादीच्या माजी नगरसेवकांनी राम नामाचा जागर करीत आव्हाडांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यातही येथील घराघरात ८ हजाराहून अधिक झेंड्याचे वाटपही करण्यात आले. त्यानुसार कळवा देखील राममय करण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु आता आमदार आव्हाड यांनी देखील राम नामाचा जागर सुरु केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मिडियावर देखील रामाचे विविध स्वरुपाचे फोटे पोस्ट केले आहेत. तसेच त्यांचा महिमा देखील वर्णन केला आहे. याशिवाय राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी कळवा भागात आव्हाड यांच्या वतीने आनंद विहार खारेगाव फाटक कळवा पूर्व येथे काशीमधील पाच ब्राम्हणांच्या माध्यमातून विराट कलश पुजन व राम दरबार पुजन आणि महाआरती देखील घेतली जाणार आहे. त्याची तयारी आता सुरु झाली आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. एकूणच आव्हाडांना देखील आता रामल्ललाची भुरळ पडली का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRam Mandirराम मंदिरkalwaकळवा