शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रखडलेली १७५ कोटींची देणी मिळवण्यासाठी मफतलालच्या कामगारांचा आता एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:19 IST

मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही.

ठळक मुद्देकळवा येथील मफतलाल कंपनी बंद होऊन ३० वर्षे लोटलीयातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुलासाडे तीन हजार कामगारांना अंदाजे १७५ कोटींची देणीअपेक्षित

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा येथील मफतलाल कंपनी मागील ३० वर्षापासून बंद पडली आहेत. यातील साडे तीन हजार कामगारांची सुमारे १७५ कोटींची देणी अद्यापही त्यांना मिळालेली नाही.आशा बाळगून असलेल्या एक हजार ५०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. देशोधडीला लागलेला हा कामगार आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्याच्या प्रयत्नात आहे. याची रणनिती २६ मे रोजीच्या कामगार मेळाव्यात ऐरोली येथे आखली जाणार आहे.मफतलाल कंपनी बंद पडल्यानंतर यातील कामगार राज्यभरासह गुजरात, युपी, बिहार आदी राज्यात विखुला आहे. शेकडो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कष्ठाची व हक्काची रक्कम मिळण्याची आधा धरून असलेल्यां काहींचा मृत्यूही झाला आहे. मात्र अजूनही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची देणी दिलेली नाही. साडे तीन हजार कामगारांना अंदाजे १७५ कोटींची देणीअपेक्षित आहे. या रक्कमेसाठी कळवा येथे असलेली कंपनीची शेकडो एकर जमीन विकण्याचा घाट घातला आहे. तीन वेळा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमिनीचे एकरी सरकारी मूल्य ५ कोटी असताना ते ५० कोटी सांगितले जात आहे. यामुळे या जमिनीचा लिलाव तिन्ही वेळा होऊ शकला नाही. हेतुपुरस्सर जास्त रक्कम सांगितल्या जात असल्यामुळे विकासक ही जमीन घेण्यास धजावत नसल्याची खंत मफतलाल कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश पारख यांनी लोकमतला सांगितले.कामगारांना त्यांची हक्काची देणी मिळवून देण्यासाठी आता एल्गार लढा पुकारून आंदोलन तीव्र करण्यासाठी रविवारी होणाऱ्या कामगार मिळाव्यात आंदोलनाची दिशा व रणनिती सर्वांच्या साक्षिने ठरवण्यात येत असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी कामगार नेते सुरेश म्हात्रे, कृष्णा भगत यांचेही नेतृत्व लाभले असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले. कंपनी बंद पडल्यापासून कामगार विखुरलेला आहे. पण आता त्यांना एकित्रत करून तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून येत्या रविवार ऐरोली येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.कळवा येथील मफतलाल कंपनी बंद होऊन ३० वर्षे लोटली आहेत. तरी देखील या हक्काच्या देणीपासून या कंपनीतील सुमारे तीन हजार कामगार आजपर्यंत वंचित आहेत. हक्काची रक्कम आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असतानाचा काहींचा मृत्यूही झाला आहे. या मफतलाल कंपनीच्या शेकडो एकर भूखंडावर अनेकांचा डोळा असल्याने कंपनीच्या कामगारांमध्ये वारंवार फूट पाडून त्यांना एकत्र येऊ दिले जात नाही. पण आता हा लढ तीव्र करून कामगारांची देणी मिळेपर्यंत लढण्यात येणार आहे. नऊ वर्षानंतर प्रथमच हा कामगारांचा मेळावा घेऊन लढ्याची दिशा निश्चित करणार असल्याचे पारख यांनी सांगितले. या मेळाव्यास ५०० पेक्षा अधिक कामगारांची उपस्थिती असणार असल्याचे पारख यांनी सांगितले. हा मेळावा २६ मे रोजी सकाळी ११ वाजता ऐरोली येथील कुर्ग असोसिएशन हॉल, सेक्टर ३, येथील ऐरोली बस डेपोजवळ पार पडणार आहे.

 

टॅग्स :thaneठाणेkalwaकळवा