शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रभू श्रीराम हे खाजगी मालमत्ता नाही ; उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका

By धीरज परब | Updated: December 25, 2023 13:29 IST

मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले .

मीरारोड - मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले . मग काय महाराष्ट्रातल्या हिंदूंना मोफत दर्शन मिळणार नाही का ? श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणाला मत दिले हे विचारून दर्शन देणार का ? प्रभू श्रीराम हे तुमची खाजगी मालमत्ता नाही अशी टीकेची झोड माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मीरारोड येथील गोवर्धन पूजा सोहळ्यात केली . यावेळी भाजपा महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर नेत असल्या बद्दल ठाकरे यांनी टीका केली . 

मीरा भाईंदर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रामदेव पार्क भागात गोवर्धन पूजा कार्यक्रमात रविवारी रात्री ठाकरे दर्शनासाठी आले होते . यावेळी  खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , लक्ष्मण जंगम , माजी नगरसेविका तारा घरत, पवन घरत सह यादव संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष रंगबहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर.बी. यादव आदी उपस्थित होते.

श्रीरामाचे मंदिर होतेय गर्वाची गोष्ट आहे. जय श्रीराम हे हजारो वर्षां पासून म्हटले जात आहे . तुम्ही तर आता आलात . जय श्रीराम , जय बजरंगबली म्हटले कि सर्व हिंदू त्यांच्या बरोबर जातील असे त्यांना वाटते . ते हिंदूंच्या विरोधात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत . पण तुमची हुकूमशाही संपवण्याची शक्ती प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण देईल.  

शिवसेनेचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे. नैसर्गिक आपत्ती , दंगे , अपघात कोणतीही आपत्ती आली तेव्हा शिवसैनिक जीवाची परवा न करता पुढे असतो व तेच आमचे हिंदुत्व आहे . हाच फरक आहे त्यांच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात. ९२ च्या दंगलीत शिवसेनेने हिंदूंना वाचवले . त्यावेळी भाजप कुठे होती ? मुंबई जळत होती तेव्हा एकटे बाळासाहेब आणि शिवसेना होती . अधर्माच्या विरुद्ध धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे . देशासाठी प्राण देणारे, देशाला आपले मानणारे हे सर्व आपलेच आहेत . आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असे ठाकरे म्हणाले . 

मुंबईत सर्व पोटापाण्यासाठी आले . पण आता काम कुठे करणार  ? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्व उद्योग धंदे गुजरात मध्ये नेत आहेत . मग आता काय सर्व उठून गुजरात मध्ये कामासाठी जाणार का ?  इकडे राहणारे गुजराती पण  गुजरात मध्ये जाणार का ? गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा म्हणता, मग काय महाराष्ट्र , उत्तर प्रदेश व अन्य राज्ये मजबूत झाली तर देश मजबूत नाही होणार काय ?  असे सवाल ठाकरे यांनी केले . गुजरात मजबूत होत असेल करा त्या बद्दल आमचा विरोध नाही उलट आनंद आहे पण महाराष्ट्राचे हिरावून नको असे ठाकरे म्हणाले .  

कोरोनाच्या संकटकाळात आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने जनतेसाठी देवीदेवतांच्या आशीर्वादाने मोठे प्रभावी काम केले .  मराठी आणि उत्तरभारतीय यांच्या ऐक्यात मीठ टाकण्याचे काम करणाऱ्यां पासून सावध रहा . आज पर्यंत शिवसेनेने आणि मी मुख्यमंत्री असताना जे कार्य केले त्याचा अनुभव लक्षात  ठेवत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अधर्माचा नाश करून धर्माचे सरकार आणायचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले .