शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

प्रभू श्रीराम हे खाजगी मालमत्ता नाही ; उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका

By धीरज परब | Updated: December 25, 2023 13:29 IST

मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले .

मीरारोड - मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले . मग काय महाराष्ट्रातल्या हिंदूंना मोफत दर्शन मिळणार नाही का ? श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणाला मत दिले हे विचारून दर्शन देणार का ? प्रभू श्रीराम हे तुमची खाजगी मालमत्ता नाही अशी टीकेची झोड माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मीरारोड येथील गोवर्धन पूजा सोहळ्यात केली . यावेळी भाजपा महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर नेत असल्या बद्दल ठाकरे यांनी टीका केली . 

मीरा भाईंदर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रामदेव पार्क भागात गोवर्धन पूजा कार्यक्रमात रविवारी रात्री ठाकरे दर्शनासाठी आले होते . यावेळी  खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , लक्ष्मण जंगम , माजी नगरसेविका तारा घरत, पवन घरत सह यादव संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष रंगबहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर.बी. यादव आदी उपस्थित होते.

श्रीरामाचे मंदिर होतेय गर्वाची गोष्ट आहे. जय श्रीराम हे हजारो वर्षां पासून म्हटले जात आहे . तुम्ही तर आता आलात . जय श्रीराम , जय बजरंगबली म्हटले कि सर्व हिंदू त्यांच्या बरोबर जातील असे त्यांना वाटते . ते हिंदूंच्या विरोधात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत . पण तुमची हुकूमशाही संपवण्याची शक्ती प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण देईल.  

शिवसेनेचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे. नैसर्गिक आपत्ती , दंगे , अपघात कोणतीही आपत्ती आली तेव्हा शिवसैनिक जीवाची परवा न करता पुढे असतो व तेच आमचे हिंदुत्व आहे . हाच फरक आहे त्यांच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात. ९२ च्या दंगलीत शिवसेनेने हिंदूंना वाचवले . त्यावेळी भाजप कुठे होती ? मुंबई जळत होती तेव्हा एकटे बाळासाहेब आणि शिवसेना होती . अधर्माच्या विरुद्ध धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे . देशासाठी प्राण देणारे, देशाला आपले मानणारे हे सर्व आपलेच आहेत . आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असे ठाकरे म्हणाले . 

मुंबईत सर्व पोटापाण्यासाठी आले . पण आता काम कुठे करणार  ? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्व उद्योग धंदे गुजरात मध्ये नेत आहेत . मग आता काय सर्व उठून गुजरात मध्ये कामासाठी जाणार का ?  इकडे राहणारे गुजराती पण  गुजरात मध्ये जाणार का ? गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा म्हणता, मग काय महाराष्ट्र , उत्तर प्रदेश व अन्य राज्ये मजबूत झाली तर देश मजबूत नाही होणार काय ?  असे सवाल ठाकरे यांनी केले . गुजरात मजबूत होत असेल करा त्या बद्दल आमचा विरोध नाही उलट आनंद आहे पण महाराष्ट्राचे हिरावून नको असे ठाकरे म्हणाले .  

कोरोनाच्या संकटकाळात आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने जनतेसाठी देवीदेवतांच्या आशीर्वादाने मोठे प्रभावी काम केले .  मराठी आणि उत्तरभारतीय यांच्या ऐक्यात मीठ टाकण्याचे काम करणाऱ्यां पासून सावध रहा . आज पर्यंत शिवसेनेने आणि मी मुख्यमंत्री असताना जे कार्य केले त्याचा अनुभव लक्षात  ठेवत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अधर्माचा नाश करून धर्माचे सरकार आणायचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले .