शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST

यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यात पाऊस पडत असल्याने भातलावणीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. पावसाच्या सुरुवातीला व लावणीनंतर भातपिकांसाठी शेतकऱ्यांना खतांची गरज असते. सरकारकडून बांधावर खतवाटप केले जाईल, असे सांगितलेले असताना प्रत्यक्षात ते उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना दुकानात खरेदीसाठी जावे लागते. २८० रु पयांची खताची एक बॅग घेण्यासाठी ३०० रु पये मोजावे लागत आहेत. शिवाय, कुणाचेही नियंत्रण नसल्याने या दुकानदारांची मनमानी सुरू असल्याचे शेतकºयांनी सांगितले.शेतकºयांनी किमतींबाबत विचारले तर त्याला पुढील दुकानात जा, असे सांगतात. आता खते, औषधे येतील की नाही सांगता येत नाही, किमतीही वाढतील, याची भीती दाखवून खरेदी करण्यास भाग पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी दुकानदार सांगतील त्या किमतीला कीटकनाशके विकत घेत आहेत. यामुळे दुकानदारांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.कृषी खाते केवळ सल्ले देण्यात मश्गूल आहे. रोग पडलाय हे खरेदी करा, अशी लागवड करा. केवळ बांधावरचे सल्ले दिले जातात. कोणत्याही खते व औषधांच्या दुकानात जाऊन काय परिस्थिती आहे, हे पाहिले जात नाही, जेणेकरून शेतकºयांना वस्तूंच्या किमती माहीत होऊन तेथे त्यांना मार्गदर्शन होऊन चार पैसे वाचतील. सरकारी दुकानांमध्येही शेतकºयांची लूट सुरूच आहे. खताच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी लागणारे भाडे आणि ती बॅग घरापर्यंत आणण्यासाठी लागणारा खर्च साडेतीनशे ते पावणेचारशेपर्यंत जातो. शिवाय, वेळेचाही अपव्यय होतो.दरवर्षी खतांच्या किमती या वाढतच आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५० रु पये अधिक खर्च होत आहेत. शिवाय, कोरोनाच्या भीतीपोटी दुकानदारांची गेली अनेक वर्षे न संपलेली बोगस कंपन्यांची औषधेही या दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा किमतीला विकली.कारण, शेतकरी अडचणीत सापडल्याने खते, बियाणे, औषधे लवकर घेण्यास सांगतात. त्यामुळे किंमत, संपलेल्या मुदतीकडे शेतकºयांचे दुर्लक्ष केले होते.अधिक द्यावीलागत आहे मजुरीतालुक्यात मजुरांची वानवा असली, तरी शेतकºयांना मजूर आणि या मजुरांना काम याची नितांत गरज आहे. कोरोनाची भीती असल्याने जो तो अधिकची मजुरी देऊन शेतीची कामे लवकर करण्याची घाई करीत आहेत.मजूर कामाला येतात मात्र कुण्या एकाच शेतकºयाच्या शेतात त्याची लागवड झाली की, मग ते घरी राहणेच पसंत करीत असल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाई यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र, कार्यालयाचे कामकाज पाहणारे पंढरी पाटील यांनी सांगितले की, खताची प्रतिबॅग २६६ रुपयांना असून अधिक दराने खरेदी करू नये.

टॅग्स :Farmerशेतकरी