शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ऐन हंगामात शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट, दुकानदारांचे उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST

यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यात पाऊस पडत असल्याने भातलावणीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. पावसाच्या सुरुवातीला व लावणीनंतर भातपिकांसाठी शेतकऱ्यांना खतांची गरज असते. सरकारकडून बांधावर खतवाटप केले जाईल, असे सांगितलेले असताना प्रत्यक्षात ते उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांना दुकानात खरेदीसाठी जावे लागते. २८० रु पयांची खताची एक बॅग घेण्यासाठी ३०० रु पये मोजावे लागत आहेत. शिवाय, कुणाचेही नियंत्रण नसल्याने या दुकानदारांची मनमानी सुरू असल्याचे शेतकºयांनी सांगितले.शेतकºयांनी किमतींबाबत विचारले तर त्याला पुढील दुकानात जा, असे सांगतात. आता खते, औषधे येतील की नाही सांगता येत नाही, किमतीही वाढतील, याची भीती दाखवून खरेदी करण्यास भाग पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी पावसाने अद्याप चांगली हजेरी लावली नसल्याने गवत वाढून रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी दुकानदार सांगतील त्या किमतीला कीटकनाशके विकत घेत आहेत. यामुळे दुकानदारांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.कृषी खाते केवळ सल्ले देण्यात मश्गूल आहे. रोग पडलाय हे खरेदी करा, अशी लागवड करा. केवळ बांधावरचे सल्ले दिले जातात. कोणत्याही खते व औषधांच्या दुकानात जाऊन काय परिस्थिती आहे, हे पाहिले जात नाही, जेणेकरून शेतकºयांना वस्तूंच्या किमती माहीत होऊन तेथे त्यांना मार्गदर्शन होऊन चार पैसे वाचतील. सरकारी दुकानांमध्येही शेतकºयांची लूट सुरूच आहे. खताच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी लागणारे भाडे आणि ती बॅग घरापर्यंत आणण्यासाठी लागणारा खर्च साडेतीनशे ते पावणेचारशेपर्यंत जातो. शिवाय, वेळेचाही अपव्यय होतो.दरवर्षी खतांच्या किमती या वाढतच आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५० रु पये अधिक खर्च होत आहेत. शिवाय, कोरोनाच्या भीतीपोटी दुकानदारांची गेली अनेक वर्षे न संपलेली बोगस कंपन्यांची औषधेही या दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा किमतीला विकली.कारण, शेतकरी अडचणीत सापडल्याने खते, बियाणे, औषधे लवकर घेण्यास सांगतात. त्यामुळे किंमत, संपलेल्या मुदतीकडे शेतकºयांचे दुर्लक्ष केले होते.अधिक द्यावीलागत आहे मजुरीतालुक्यात मजुरांची वानवा असली, तरी शेतकºयांना मजूर आणि या मजुरांना काम याची नितांत गरज आहे. कोरोनाची भीती असल्याने जो तो अधिकची मजुरी देऊन शेतीची कामे लवकर करण्याची घाई करीत आहेत.मजूर कामाला येतात मात्र कुण्या एकाच शेतकºयाच्या शेतात त्याची लागवड झाली की, मग ते घरी राहणेच पसंत करीत असल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाई यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र, कार्यालयाचे कामकाज पाहणारे पंढरी पाटील यांनी सांगितले की, खताची प्रतिबॅग २६६ रुपयांना असून अधिक दराने खरेदी करू नये.

टॅग्स :Farmerशेतकरी