शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - नाशिक महामार्गात पावसामुळं खड्याचे साम्राजामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्य सचिवांनी केला लोकलने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 15:30 IST

महामार्गांवरील खड्डे व वाहतूक कोंडी पासून वाचण्यासाठी मुख्य सचिवांनी आज कसारा रेल्वे स्थानकावरून लोकलने जाणे पसंद केले.

कसारा दि. 30 शाम धुमाळ

मुंबई - नाशिक महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे होऊन खड्ड्याचे साम्राज पसरले आहे. तर दुसरीकडे महामार्गावरील आसनगाव  हद्दीत  संत गतीने चालू असलेले रेल्वे ब्रिजचे व वशिंद मध्येही  चालू असलेले उढाण पुलाचे काम त्यामुळे  मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील  चेरपोलीघाट, शहापूर, आसनगाव ते वशिंद पर्यंत लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात नियमित ची ही वाहतूक कोंडी मुळे मोठ्याप्रमाणात होत आहे. परिणामी या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहीका, स्कुलबस् यांना बसत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान या वाहतूक कोंडी चा फटका राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना देखील बसला असून महामार्गांवरील खड्डे व वाहतूक कोंडी पासून वाचण्यासाठी त्यांनी आज कसारा रेल्वे स्थानकावरून लोकल ने जाणे पसंद केले. आज नाशिकहून येत असताना त्यांनी आपला ताफा कसारा रेल्वे स्थानका कडे वळवून कसाराहून मुबई साठी दुपारी दीड च्या लोकल ने त्यांनी प्रवास सुरु केला.

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणा हवेतच  मुंबई नाशिक महामार्गांवरील खड्डे आणि महामार्गाचे संतगतीने सुरू असलेल्यामूळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून २८ जुलै २०२३  रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित यंत्रणांना आदेश देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. मात्र त्यांचे आदेश आजही कागदावरच असल्याचे पहिल्याच पावसात दिसून आल्याने  खड्याचे साम्राजामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून चालकांना त्याचा नाहक त्रास करावा लागत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच .असल्याची चर्चा वाहन चालक करताना दिसत आहे. .  

गेल्या ८ ते १० वर्षापासून मुंबई नासिक मार्गमार्गचे आठ पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम संतगतीने सुरू असून नाशिक, ठाणे, मुंबई या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.  त्यातच नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी विरुद्ध  दिशेने वाहने टाकल्याने दोन्ही लेन पूर्ण जाम होत आहे

 दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ जुलै २०२३  संबंधित यंत्रणांना दिले होते. तसेच  मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या,  रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे याकडे लक्ष द्या, वाहतुकीचे नियमन करा तसेच  खड्डेमुक्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स यापुर्वीच स्थापन करण्यात आला होता.  या टास्क फोर्सने नियमित बैठका घेऊन खड्डेमुक्तीच्या मोहिमेला गती द्यावी. वाहतुकीच्या नियंत्रण-नियमनाकडेही लक्ष द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत देऊन  ते म्हणाले की, अवजड वाहने व माल वाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करा. हाईट बॅरियर लावण्यात यावीत. महामार्गांच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात यावीत. वाहतुक नियमनासाठी वॅार्डनसची नियुक्ती करण्यात यावी.अशा अनेक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या परंतु मुख्यमंत्र्यांच्या या सुचने ला राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरण ने केराची टोपली मुंबई-  मुंबई- नाशिक महामार्गाच्या निकृष्ठ कामा मुळे  ठेकेदार,पोट ठेकेदार यांना मागील वर्षी 5 कोटी चा दंड प्रसासनाकडून करण्यात आला होता परंतु दंड वसूल न करता त्याचं ठेकेदारांना अभय देण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  करीत असल्याचा आरोप होत आहे.. एकीकडे पाऊस दुसरीकडे वाहतूक कोंडी यामुळे पोलिसांचे हाल.दरम्यान एकीकडे भरमसाठ टोल वसूल केला जातो परंतु या महामार्गांवर खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे त्यामुळे 2 किमी पर्यत वाहणांच्या रांगा लागल्या जात आहेत ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची मात्र दमछाक होत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्ग