शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लोकमत इम्पॅक्ट - वेहळोली गावातील शेतीला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:49 AM

भाताच्या रोपांना जीवदान : पिके करपून गेल्याने शेतकरी चिंतेत, अधिक पावसामुळे भाताचे नुकसान

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या कालव्याच्या पाण्यावर घेत असलेली भाताची रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने वेहळोली येथील शेतकरी अडचणीत सापडले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत अधिक वेगाने पाणी सोडून गुरुवारी शेतीला पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.  तालुक्यातील भातसा नदीच्या उजव्या कालव्याजवळ असणाऱ्या गावातील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. पावसाळ्यात जरी उत्पादन कमी आले, तरी त्याची भरपाई शेतकरी उन्हाळ्यात भरून काढतो. यावर्षी अधिक पावसाने भातपिके हातची गेल्याने आता याची थोडीफार भर कालव्याच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत असतानाच भातसा धरणाच्या कालव्याचे पाणी येईल, या आशेवर वेहळोली गावातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या लागवडीसाठी रोपांची पेरणी केली.

ही पेरणी केली खरी, मात्र शेतीत पाणीच न आल्याने भाताची रोपे जळून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. कालव्याच्या जवळ असलेल्या वेहळोली गावातील शेतकरी बाळू वेखंडे यांनी पावसाळ्यात हातचे पीक गेल्याने निदान आतातरी कालव्याच्या पाण्यावर थोड्याफार प्रमाणात उपलब्ध पाण्याचा उपयोग करून भाताचे उत्पन्न घेऊ, असा विचार मनाशी बाळगून त्यांनी पेरणी केली. मात्र, ही रोपेच पाण्याअभावी करपून गेल्याने त्यांच्यासह ग्रामस्थांच्या समस्या वाढल्या होत्या. मात्र, बुधवारपासून गावातील चारीला पाणी आल्याने भाताच्या रोपांना जीवदान मिळाले आहे.यासंदर्भात भातसा धरण कार्यालयाशी संपर्क साधला असता भातसा धारणापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनली गावाजवळील कालव्याचा बांध फुटल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच बांधाचे काम अधिक वेगाने दुरुस्त करून पाणी सोडण्यात आले.कालव्याचे पाणी गावातील चारीला आल्याने आता शेतात पाणी साठायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे रोपे जगून भातपिके घेण्यास नक्कीच उपयोग होणार आहे.- बाळू वेखंडे, शेतकरी

टॅग्स :thaneठाणे