शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लोकमत इम्पॅक्ट - ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांकडून ‘स्मार्ट सिटी’साठी अखेर ठाणे महापालिका प्रशासनाची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 15:08 IST

- सुरेश लोखंडेठाणे -  ‘ठाण्यात स्मार्ट सिटीची केवळ पायाभरणी...’ या मथळ्याखाली लोकमतने ऑनलाईनसह २८ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून ठाणेकरांचे लक्ष वेधले, याची दखल घेत ठाणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी झाडाझडती घेऊन पालिका प्रशासनाला धारेवर धरले आणि स्मार्टच्या निधीसह प्रकल्पांच्या कामांची वस्तुस्थिती ठाणेकरांसमोर सोमवारी मांडायला भाग पाडले.जिल्ह्यातील स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत ठाण्यासह कल्याण ...

- सुरेश लोखंडेठाणे -  ‘ठाण्यात स्मार्ट सिटीची केवळ पायाभरणी...’ या मथळ्याखाली लोकमतने ऑनलाईनसह २८ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून ठाणेकरांचे लक्ष वेधले, याची दखल घेत ठाणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी झाडाझडती घेऊन पालिका प्रशासनाला धारेवर धरले आणि स्मार्टच्या निधीसह प्रकल्पांच्या कामांची वस्तुस्थिती ठाणेकरांसमोर सोमवारी मांडायला भाग पाडले.

जिल्ह्यातील स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत ठाण्यासह कल्याण -डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई या तीन महानगरांचा समावेश होता; परंतु नवी मुंबईचा प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर आता ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत आहेत. दोन वर्षाच्या कालावधीत या प्रकल्पाच्या केवळ पायाभूत आराखड्यासह प्रस्ताव मंजुरी आणि सल्लागार कंपन्यांच्या नियुक्ती पलिकडे या दोन्ही महापालिकांचा स्मार्टपणा दिसून आलेला नाही. यासाठी मंजूर झालेल्या निधीची कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याची खंत दिशाच्या आढावा बैठकीत खुद्द खासदार कपील पाटील यांनी देखील व्यक्त करून तीव्र नापसंती दर्शविली होती. याप्रमाणेच ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेवून शनिवार, रविवार सुटीचे दोन दिवस वगळता सोमवारी स्मार्टपणे पालिका प्रशासनाला जाब विचारून बोलते केले.

केंद्र शासन पुरस्कृत ‘स्मार्ट सिटी’ सुमारे पाच हजार ४०४ कोटी खर्चून ठाणे शहरात उदयाला येणार आहे. यासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड ( टीएससीएल) कंपनीला दोन वर्षात केंद्र शासनाचा १८६ कोटी, राज्य शासनाचा ९३ कोटी आणि महापालिकेचे स्वत:चे १०० कोटी आदी ३७९ कोटींचा निधी पडून आहेत. राज्याचे प्रधानसचिव यादीदेखील या निष्काळी व दुर्लक्षितपणाची दखल घेऊन महापालिकेला धारेवर धरले आहे. प्राप्त निधीतून स्मार्ट सिटीच्या कोणत्याही कामाला ठोसपणे अद्याप प्रारंभ करता आला नाही. असे टीएससीएलचे सीईओ ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना महापौर मिनाक्षी शिंदे, सभाग्रुह नेते नरेश म्हस्केआदी सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाने पत्रकारांसमोर बोलायला भाग पाडले. हा कित्ता केडीएमसीने देखील गिरवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. एक हजार ४४४ कोटीं ४५ लाखांच्या स्मार्ट सिटीसाठी केडीएमसीने आतापर्यंत केवळ डीपीआर तयार करण्यासाठी केवळ सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. कल्याण स्टेशन परिसर सुधारणेच्या प्रकल्प अहवालासाठी सल्लागार कंपनी नियुक्त झाली. तर पॅनसिटी अंतर्गतच्या माहिती तंत्रज्ञान प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती अद्याप गुलदस्त्यात आहे.