शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव; एम्स फाउंडेशन आली धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 18:51 IST

विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते.

- विशाल हळदेलोकमत न्यूज नेटवर्क,ठाणे : शहापूर तालुक्यातील गुंडे ग्रामपंचायतीमधील विद्यार्थ्यांना भितारवाडीच्या शाळेत जाण्याकरिता भरपावसात दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडावी लागते, या 'लोकमत'च्या धक्कादायक बातमीची दखल ठाण्यातीलच एम्स फाउंडेशनचे फिटनेस कोच अजित कुलकर्णी यांनी घेतली. या गावातील विद्यार्थ्यांकरिता तसेच नागरिकांकरिता नदीवर एक साकव २२ दिवसांत बांधून देण्याचे आश्वासन एम्स फाउंडेशनने दिले.

विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते. भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची शाळा आहे. २७ जणांची पटसंख्या असलेल्या या शाळेत भितारवाडी आणि कोठेवाडी येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना नदी ओलांडून यावे लागते. पाऊस जास्त झाल्यावर डोंगर भागातून येणाऱ्या पाण्यामुळे नदीची पातळी वाढते आणि मुले शिक्षणापासून वंचित राहतात. गावातील मोठी मुले या लहान मुलांना धरून नदीच्या पात्रातून धरून शाळेच्या बाजूला सोडतात, शाळा सुटल्यावर परत आणतात. यामुळे मुलांच्या जीवाला धोका होता. येथील लोकांना साकव बांधून देण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सचिव प्रकाश खोडका यांनी केली होती.

 

मी गेल्या २० वर्षांपासून या गावात राहात आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुलांच्या शिक्षणाची परवड होते. इतक्या वर्षात आमच्या गावातील समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. आम्ही 'लोकमत'चे आणि एम्स फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो.- विनायक हिंदुराव, स्थानिक

....आणि डोळ्यात पाणी आले 'लोकमत'ने प्रसिद्ध केलेली बातमी वाचली आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. लागलीच आम्ही ठरवले की, चाफ्याच्या वाडीत एक साकव बांधून द्यायचा. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मुंबई शेजारील ठाणे जिल्ह्यात अशी अवस्था असेल तर कठीण आहे. मी आणि माझे सहकारी यांनी नदीवर जाऊन पाहणी केली. आम्ही या ठिकाणी ८० फूट लांबीचा, नदीच्या पात्रापासून १० फूट उंच आणि तीन फूट रुदीचा ब्रिज २२ दिवसात उभारणार आहोत. येत्या तीन दिवसात हे सर्व काम सुरु होईल. यापुढे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

- अजित कुलकर्णी, संस्थापक, एम्स फाउंडेशन 

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे