शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 06:20 IST

बालेकिल्ला राखण्यासाठी केलेल्या खणखणीत युक्तिवादाचे मिळाले फळ

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे जर भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत तर शिवसेनेचेही येतील. त्याबद्दल भाजपच्या कुठल्याही नेत्याच्या मनात शंका आहे का, असा रोकडा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना अखेरच्या बैठकीत केला. त्यामुळे अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेसेनेला सुटला. १९९६ मध्ये स्व. आनंद दिघे यांनीही अशाच पद्धतीने आक्रमक पवित्रा घेत भाजपला निरुत्तर केले होते. शिंदे यांनी दिघे यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन अखेर आपला बालेकिल्ला राखला.

ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. भाजपचे काही नेते प्रचार करू लागले होते. त्यामुळे शिंदेसेना बुचकळ्यात पडली होती. ठाणे मतदारसंघाची चर्चा सुरू झाल्यावर शिंदेसेनेच्या वेगवेगळ्या उमेदवारांबद्दल वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात होते. शेवटी अखेरच्या बैठकीत शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना थेट सवाल केला की, मोदींचा करिष्मा जर भाजपच्या उमेदवारांना निवडून देणार असेल तर शिंदेसेनेच्या उमेदवारांना तो निवडून देण्याबाबत कुणाच्या मनात शंका आहे का? उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची युती असताना मोदींच्या करिष्म्यामुळे शिवसेनेचे खासदार विजयी झाले व त्यानंतर ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन केली.

हाच जर भाजपचा आक्षेप आहे तर मग आता ठाण्यात शिंदेसेनेचा उमेदवार असण्याला विरोध का? मी शिवसेनेतून एवढ्या मोठ्या संख्येने खासदार, आमदार घेऊन सोबत आलो. निवडणूक चिन्ह, पक्षाचे नाव सारे काही खेचून आणले. आता हे सर्व टिकवायचे तर मला पुरेशा जागा देणे ही भाजपचीही गरज नाही का? मला पक्षाची मान्यता टिकवण्याकरिता विशिष्ट मतांची टक्केवारी मिळवायला हवी. त्याकरिता तेवढ्या जागा भाजपने सोडायला हव्या, असा युक्तिवाद शिंदे यानी भाजप नेत्यांसमोर केला. या बिनतोड युक्तिवादामुळे भाजप नेते निरुत्तर झाले.

 ठाणे लोकसभा मतदारसंघ १९९६ मध्ये जेव्हा शिवसेनेने भाजपकडे मागितला तेव्हा राम कापसे व स्थानिक भाजप, रा. स्व. संघाच्या नेत्यांनी विरोध केला.

 मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आनंद दिघे यांनी आक्रमक पवित्रा घेत ठाणे जर सेनेला सोडले नाही तर, पुन्हा भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही, असा कठोर पवित्रा घेतला होता.

 त्यामुळे मुंबई, ठाणे काबीज करणे ही भाजपची गरज नव्हती. कारण तेथे शिवसेना भक्कम होती व महाजन यांना ठाण्याकरिता युतीवर विस्तव ठेवायचा नव्हता. शिंदे यांनी दिघे यांचेच अनुकरण करून पुन्हा ठाणे राखल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४