शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन 

By अजित मांडके | Updated: May 18, 2024 17:04 IST

ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा मी गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अजित मांडके,ठाणे :  ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. ठाण्यात १४ पैकी १२ वेळा महायुती जिंकली आहे. त्यामुळे आताची निवडणुक ही प्रतिष्ठेची असून ठाणे जिंकून बालेकिल्ला सिध्द करा, मी गुलाल उधळायला येतो असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठाण्यात शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले. ठाण्याची जागा अधिक मताधिक्याने येणार असल्याच्या आकडेवारीत आहेत. परंतु त्यामुळे गाफील राहू नका, अधिकाधिक मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा असेही ते म्हणाले. २० तारखेला आराम करायचा नाही. आधी स्वत: कुटुंबासह मतदान करायचे त्यानंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही. जास्तीत जास्त मतांनी ठाण्याची जागा आली पाहिजे. 

महायुतीला मतदान करायचे हे जनतेनं ठरवलं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी ठाणे जिकांयचे असल्याचेही ते म्हणाले. परंतु दुसरीकडे नगरसेवकांनी देखील या निवडणुकीत काम करुन दाखविले पाहिजे, पुढील काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे आता पासून त्याची तयारी करा अन्यथा तुमचे प्रगती पुस्तक कसे असेल हे लक्षात ठेवा, त्या प्रगतीपुस्तकावरच तुमचे काय करायचे हे ठरविले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांचा देखील खरपुस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणतात, ४८ पैकी ४८ जागा जिंकणार. परंतु ते ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात का? अशी खिल्ली त्यांनी उडवली. तसेच देशाची काय दिशा असेल ते मोदींनी मुंबईत येऊन सांगितले. पुढील १० वर्ष भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते. महायुती विकासाचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शिव्यापासून सुरुवात करतात आणि शिव्याच देतात आमची शिवसेना आणि त्यांची शिव्या सेना आहे अर मुख्यमंत्री म्हणाले. मोदी नकली सेना म्हणाले तर मग उद्धव ठाकरेंना मिरची का झोंबली. तुमको मिरची लगी तो मी क्या करू? असा खोचक टोलाही फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

दरम्यान, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे ती टिपू सुलतानचे नारे लावू शकते का? याकूब मेमन कबर, पाकिस्तानचे झेंडे वापरत आहे, प्रचारात व्होट जिहाद मागत आहे. मग ती काय आहे? असली शिवसेना कसली नकलीच शिवसेना आहे. असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत पण विचाराचे नाही. राज ठाकरे, एकनाथ शिंदे हे विचाराचे वारसदार आहे. उद्धव ठाकरेंना आरएसएस ध्वज फडके वाटते, शिव भगवे ध्वज फडके वाटू लागेल. आज भारत कोणालाही रोखू शकतो. आपण नवभारतासाठी काम करत आहोत. लोकांच्या मनात मोदी असल्याचे सांगत  तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान बनवायचे असंही फडणवीसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे