शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

ठाण्यात मतदार यादीतून नावं गायब; अनेक मतदार मतदानापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 14:22 IST

ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लीप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला आहे.चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (58) आणि नानजी छाडवा (63) या दाम्पत्याला मात्र मतदान यादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

ठाणे - ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लीप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला आहे.

चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (58) आणि नानजी छाडवा (63) या दाम्पत्याला मात्र मतदान यादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही. चरईतील दगडी शाळेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रंही होती. गेल्या 30 वर्षापासूनचे छाडवा कुटूंब चरईत वास्तव्यास आहे. गेल्या 2014 च्या निवडणूकीत मतदान केलेलं असताना यावेळी मात्र मतदार यादीतील नावच गायब झाल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते. मतदार चिठ्ठी घेऊनही त्यांच्याकडे निवडणूक कार्यालयातील कोणी फिरकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

अशोक जैन (48) हे चरईतील कृष्णा हेरिटेज इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांनी संतोषीदेवी (46) तसेच चिराग (26) आणि सुमित (24) या दोन मुलांचाही पत्ता बदलल्याचे पत्र मे 2018 मध्येच दिले. मात्र आठ ए च्या फार्म ची प्रक्रिया बाकी असल्याचं त्यांना एप्रिल 2019 मध्ये सांगण्यात आले. विशेष म्हणजे पत्नी आणि मुलांची नावे मतदार यादीत आली. पण अशोक यांचे स्वत:चे नाव मात्र यादीत आलेच नसल्यामुळे त्यांनीही निवडणूक आयोगाच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानासाठी आतापर्यंत मतदारांनी काहीसा निरुत्साह दाखवला आहे. महाराष्ट्रात दुपारी 12 वाजेपर्यंत 17.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्याईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणेthane-pcठाणेVotingमतदान