शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

Lok Sabha Election 2019: आनंद परांजपे यांना ढकलले चक्रव्यूहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 23:08 IST

बाबाजी पाटील यांचा विधानसभेवर डोळा

- अजित मांडके ठाणे : मागील निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आनंद परांजपे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी दिल्यास पक्षाने त्यांना चक्रव्यूहात ढकलण्यासारखे आहे, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाबाजी पाटील यांना उमेदवारी घोषित होणे, याचा अर्थ कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची दावेदारी भक्कम करण्यासारखे ठरणार आहे.आ. जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत अचानक आनंद परांजपे यांना पाचारण करून निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्षप्रवेश घडवला होता. त्यानंतर, ठाण्यात शहराध्यक्ष या नात्याने परांजपे यांनी आंदोलने केली. त्यामुळे आता पक्षाने ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. या मतदारसंघातून संजीव नाईक हे मागील वेळेस लढले होते. यावेळी नाईक यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे राष्ट्रवादीतील एका गटाचे म्हणणे आहे, तर संजीव यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. परांजपे यांच्यावर ‘आव्हाड गटाचे’ असा शिक्का बसला असल्याने आता नाईक आपली किती ताकद त्यांच्या पाठीमागे उभी करतात, याबद्दल साशंकता आहे. पवार यांनी ठाण्यातील वेगवेगळ्या दिशेला तोंडे असणाऱ्या नेत्यांमध्ये दिलजमाई घडवून आणली असली, तरी ती किती तकलादू आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. जितेंद्र आव्हाड यांना परांजपे यांच्याकरिता आपली शक्ती पणाला लावायला लागेल. मात्र, आव्हाड यांची खेळपट्टी ठाणे शहर नसून कळवा-मुंब्रा येथील परिसर आहे. शिवाय, सहा महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याने आव्हाड यांच्या सढळ पाठिंब्याला मर्यादा आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक आहेत. राबोडी हा राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचा गड असून मुल्ला यांनीच परांजपे यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी आघाडी उघडली होती. राष्ट्रवादीतील मुल्लांसकट चार नगरसेवक परांजपे यांच्याविरोधात असल्यामुळे मुल्ला हे परांजपे यांना किती आधार देतील, याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आनंद यांच्याकरिता आपले वडील दिवंगत खा. प्रकाश परांजपे यांच्या कामाची पुण्याई व आपले नौपाडा वगैरे उच्चभ्रू परिसरात ट्रम्पकार्ड ठरणारे ‘परांजपे’ हे आडनाव आणि स्वच्छ प्रतिमा हीच जमेची बाजू राहणार आहे.कल्याण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असलेले बाबाजी पाटील हे ठाण्यातील नगरसेवक आहेत. पाटील यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु, कल्याण मतदारसंघ हा त्यांच्यासाठी पूर्णपणे नवा मतदारसंघ आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत यांची प्रतिष्ठा त्या मतदारसंघात पणाला लागलेली असल्याने शिंदे सर्व मार्गांचा अवलंब करतील, अशीच चर्चा आहे. अर्थात, बाबाजी पाटील हेही दिल्लीत जाण्याकरिता उतावीळ असल्याचे संकेत प्राप्त होत नाहीत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सुभाष भोईर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यात पाटील यांना रस आहे. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक लढवण्यामागे राष्ट्रवादीकडून विधानसभेतील उमेदवारीची हमी मिळवून घेणे, हाच त्यांचा मर्यादित हेतू असू शकेल, अशी चर्चा आहे. त्यांना कळवा आणि मुंब्य्रातील मतदारांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.बाबाजी पाटील यांना कळवा, मुंब्य्रात असलेल्या राष्टÑवादीच्या २६ नगरसेवकांचा फायदा मिळू शकणार आहे. कल्याणमध्ये राष्टÑवादीचे दोनच तर काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. अंबरनाथ नगर परिषदेत राष्टÑवादीचे पाच आणि काँग्रेसचे नऊ नगरसेवक आहेत. पाटील यांच्यामागे हीच कुमक आहे.कल्याणमध्ये राष्टÑवादीची परिस्थिती फारच वाईट असून यापूर्वीच अनेकांनी राष्टÑवादीचे घड्याळ काढून शिवसेना, भाजपात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदही राष्टÑवादीच्या ताब्यात नाही. त्यामुळे बाबाजी यांच्यासाठी ही खूप कठीण लढाई आहे.नगरसेवकांची अत्यल्प कुमकठाणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास नवी मुंबईवगळता ठाण्यात राष्टÑवादीचे केवळ आठ नगरसेवक आहेत. तर, मीरा-भार्इंदरमध्ये राष्टÑवादी भुईसपाट झाली आहे. त्यामुळे परांजपे हे खरोखरच चक्रव्यूहात अडकले आहेत.कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असा विचार बाबाजी पाटील यांनी करुन लोकसभा उमेदवारी स्वीकारली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस