शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

Lockdown News: छावण्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांचे भवितव्य अधांतरीच; अर्धपोटी काढतात दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 01:53 IST

सर्वांनाच लागली गावी जाण्याची आस

सुरेश लोखंडे  

ठाणे : कोरोनाच्या संचारबंदीत जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांसह गावखेड्यांत हजारो कामगार, मजूर आजही अडकलेले आहेत. त्यांच्यासाठी असलेले कम्युनिटी किचनचे जेवण शहरांमधील झोपडपट्ट्यांत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाटप होत आहे. मात्र, निवारा केंद्र, छावण्यांमधील कामगार, मजुरांचे जेवणाअभावी हाल असून ते अर्धपोटी आहेत. अनेकांची अद्यापही वैद्यकिय तपासणी झालेली नाही. त्यातच पदरचा पैकाही संपल्याने, अन् सरकारी यंत्रणेने श्रमिक रेल्वेबाबत विचारणाही न केल्याने हे मजूर अधांतरी लटकलेले आहेत.

या महामारीत वेगवेगळ्या पद्धतीने हात धुवून घेणाऱ्या राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून कम्युनिटी किचनच्या अन्नधान्यातील अपहार, उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल उघडे केल्याच्या दाईत्वात लाखोंची डील कल्याण डोंबिवलीत ऐकवली जात आहे. याप्रमाणेच ठाण्यातही असून औषधोपचाराच्या साहित्य खरेदीतील घोळ आदी सर्वांची संचारबंदी उठल्यानंतर विचारणा करणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यातील काही शहरांमध्ये वाढलेल्या रुग्णांना आळा घालण्यासाठी जनमाणसाचा कानोसा लोकमतने ' वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था रुग्णालयांजवळच करण्याची गरज' या मथळ्याखाली २९ एप्रिलला वृत्त प्रसिद्ध करून शासनाचे लक्ष वेधले होते. परंतु, तब्बल एक आठवड्यानंतर त्याची दखल घेऊन आता कुठे अत्यावश्यक देणाºयांची निवास व्यवस्था मुंबईत केली जात आहे. या कालावधीत वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे लॉकडाउन वाढला आणि ठाणे, केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रात अडकलेले मजूर मरणयातना भोगत आहे.१३ हजार मजुरांची ठाण्यात सोयठाण्यात दादोजी कोंडदेव क्रीडागृहात २७१ जणांची तर पातलीपाडा येथील शाळेत १६, वर्तकनगरच्या शाळेत ४, विटाव्याला ४९, नाइटशेल्टर नौपाडा येथे १६, टेंभीनाका शाळांमध्ये सात तर शहरातील बांधकाम सुरूअसलेल्या इमारतींमध्ये १३ हजार २२५ मजुरांना ठेवण्यात आले आहे. महापालिकेकडून त्यांना रोज खाद्यपदार्थ दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय पाणी, फूड पॅकेट, किराणाही पुरविला जात आहे. परंतु, या सर्वच ठिकाणी ही मदत पोहचेल, याची खात्री नसल्याचे या साइटवरील ठेकेदार आणि मजुरांकडून ऐकायला मिळत आहे.उल्हासनगरात ५० हजार कामगारांना जेवणउल्हासनगर महापालिकेने शहाड, कॅम्प नं-५ येथे टेऊराम व कोनगाव येथे क्वारंटाइन कक्ष उभारला आहे. येथे झोपडपट्टीत राहणाºयांसह स्थलांतरित मजूर ५० हजारांवर आहेत. त्यांना शासनाच्या ठिकठिकाणच्या कम्युनिटी किचनमधील जेवण पुरवले जात आहे. याशिवाय थारासिंंग दरबार, अमृतवेल, झुलेलाल संस्था, वेदान्त आदी सामाजिक संस्था दररोज ६० हजार नागरिकांना मोफत जेवणाचा पुरवठा करीत आहे. महापालिका दररोज ५०० पेक्षा जास्त नागरिकांना स्वखर्चाने जेवणाचे पॉकेट देत असल्याची माहिती पालिका उपायुक्त संतोष देहरकर यांनी दिली. मात्र, हजारो परप्रांतीय मजुरांनी गावी जाण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांसमोर रांगा लावल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.भिवंडीतून चार रेल्वे रवानाकामगार नगरी व कापड उद्योगाचे मँचेस्टर म्हणून भिवंडीची ओळख असल्याने परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येने भिवंडीत वास्तव्यास आहेत. ग्रामीण भागात गोदामपट्टा वाढल्याने भिवंडीतील यंत्रमाग व परप्रांतीयांची संख्या काही लाखांवर गेली आहे. या संचारबंदीत रोजंदारीवर काम करणाºया मजुरांवर उपासमारीची वेळ आली. मजूर पायपीट करून घरचा रस्ता धरत आहेत. शहरात पाच प्रभागांत पाच ठिकाणी व तालुक्यात २२ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू केले आहे. शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. रांजनोलीनाका येथील टाटा आमंत्रण प्रकल्पात सरकारच्या अधिकार कक्षेतील क्वॉरंंटाइन कक्षात सध्या ३१४ जणांना तर शहरात ५५ नागरिकांना क्वॉरंटाइन केले आहे. भिवंडीत परप्रांतीय कामगार अधिक असल्याने गोरखपूर,जयपूर आणि पाटणा अशा चार ट्रेन आतापर्यंत रवाना केल्या आहेत.श्रमिकांसाठी इंटकने उघडले ठाण्यात मार्गदर्शन केंद्र : गावी जाऊ इच्छिणाºया मजुरांना त्याविषयीच्या कार्यालयीन प्रक्रियेची माहिती नसल्याने त्यांची नाहक धावपळ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा नागरिकांच्या मदतीसाठी गुरुवारी ठाण्यात काँग्रेसने मार्गदर्शन व मदत केंद्र सुरू केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंंंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंंदे यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय येथे मदत केंद्र सुरू केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या